शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

अखेरच्या श्वासातही अडथळे!

By admin | Updated: December 16, 2015 23:11 IST

वसमत : येथील सार्वजनिक वैकुंठधाम स्मशानभूमीवर लाखो रुपये खर्च झाला. मात्र हायमास्ट बंद, पाण्याची मोटार बंद, सभागृहाचा वापर नाही.

वसमत : येथील सार्वजनिक वैकुंठधाम स्मशानभूमीवर लाखो रुपये खर्च झाला. मात्र हायमास्ट बंद, पाण्याची मोटार बंद, सभागृहाचा वापर नाही. बागेतील हिरवळ करपून गेली, असे चित्र आहे. तर इतर समाजाच्या स्मशानभूमी विकासासाठी निधी नसल्याने तेथे सुविधा नसल्याचे चित्र आहे. वसमत शहरात एक सार्वजनिक वैकुंठधाम स्मशानभूमी आहे. तर विविध समाजाच्या स्वतंत्र स्मशानभूमी आहेत. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीला साधी संरक्षक भिंतही नाही. पाणी, वीज आदींचा तर प्रश्नच नाही. इतर समाजाच्या स्मशानभूमीचेही असेच चित्र आहे. वैकुंठधाम स्मशानभूमीत विकासावर खर्च मोठा झाला. या खर्चातून स्मशानभूमीचे रूप पालटले. पेवर ब्लॉक, उद्यान, हायमास्ट, प्रार्थनागृह, पाण्याची टाकी आदी सुविधा देण्यात आल्या. स्मशानभूमी सुशोभिकरणावर भर देण्यात आला. स्मशानभूमीच्या बागेत हिरवळही चांगली वाढली होती. परंतु आता पाण्याची मोटार बंद झाल्याने हिरवळ करपून गेली आहे. अल्पसंख्यांक निधीतून उभा केलेला हायमास्ट शोभेचा खांब म्हणून उभा आहे. बिल निघाल्यानंतर हायमास्टचा प्रकाशच पडला नाही. प्रार्थनागृहाचे बांधकाम झाले. मात्र दरवाजाला पट्ट्या लावून बंद केल्याने त्याचा वापर करता येत नाही. पाण्याची टाकी बांधली मात्र आजपर्यंत या टाकीत पाणीच पडले नाही. परिणामी, केलेल्या खर्चाचा फायदा अद्याप झालेला पहावयास मिळत नाही. केवळ गुत्तेदाराचे बिल काढण्यापुरतीच कामे होतात की काय? असा प्रश्न पडत आहे. झालेल्या खर्चातून वसमतची स्मशानभूमी एखाद्या गार्डनसारखी होणे अपेक्षित आहे. इतर स्मशानभूमीच्या तुलनेत वैकुंठधाम स्मशानभूमी व्यवस्थित आहे. उद्यानामुळे रमणीय झाली आहे. मात्र ज्या- ज्या सुविधेसाठी खर्च केल्या त्या सुविधांचा वापर पूर्णपणे होत नसल्याचे चित्र आहे.