शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

रस्त्यांच्या कामांना कारकुनी कामांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:05 IST

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यांतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी तब्बल तीन महिन्यांपासून ...

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यांतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी तब्बल तीन महिन्यांपासून शासनाकडे पाठपुरावा केला. तेव्हा आता कुठे रस्ते व पुलांच्या दुरुस्तीवर सुमारे ५० कोटी रुपयांचा खर्च करण्यास मान्यता मिळाली असून, बांधकाम विभागाने पूर्व विभागातील २३ कामांची निविदा प्रक्रिया गुरुवारी सुरू केली असली, तरी बहुतांशी कामे तांत्रिक मान्यतेच्या कचाट्यात अडकल्यामुळे त्यासंबंधी निविदा प्रक्रिया अद्याप सुरू करता आलेली नाही.

यासंदर्भात बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे खराब रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून दरवर्षी प्रस्ताव मागविले जातात. त्यानुसार यंदा मराठवाड्यातील खराब रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे ११४ कोटी रुपयांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यात जिल्ह्यात औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, पैठण आणि कन्नड, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद असे पूर्व व पश्चिम दोन विभाग असून, या दोन्ही विभागांकडून प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते. तथापि, या दोन्ही विभागातील रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी शासनाने हिरवा कंदील दाखविल्यामुळे निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यापैकी पश्चिम विभागाने गुरुवारी २३ कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली. उर्वरित २२-२३ कामांची निविदा प्रक्रिया तांत्रिक मान्यतेच्या कचाट्यात अडकली आहे. आज जाहीर केलेल्या निविदांपैकी ९ ते १० दिवसांनंतर पहिली निविदा व त्यानंतर दुसरी निविदा ४ ते ५ दिवसांनंतर उघडली जाईल. तेथून पुढे संबंधित कंत्राटदार संस्थेला कार्यारंभ आदेश वाटप केले जातील. पश्चिम विभागासाठी १७ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे, तर पूर्व विभागासाठी ३० कोटींहून अधिक कामांना मंजुरी मिळालेली आहे.

दरम्यान, या दोन्ही विभागांनी रस्ता दुरुस्तीसाठी शासनाची मान्यता मिळेल, तोपर्यंत रस्ता दुरुस्तीची कामे सुरू करा, असे कंत्राटदारांना सांगितले; परंतु अगोदरचीच बिले रखडलेली असल्यामुळे कंत्राटदारांनी त्याकडे पाठ फिरवली होती.

चौकट....

मार्चअखेरपूर्वी कामे उरकण्याची लगबग

पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीला उन्हाळ्यात सुरुवात होईल. शासनाने आता कुठे रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला असून, मार्चअखेर ती उरकण्याची लगबग सुरू होईल. त्यानंतर लगेच बिले सादर करून ती शासनाकडे पाठविली जातील. या लगबगीत कामांच्या दर्जाकडे बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देतील का, असा प्रश्न या क्षेत्रातील जाणकारांनी उपस्थित केला आहे.