शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

रस्त्यांच्या कामांना कारकुनी कामांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:05 IST

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यांतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी तब्बल तीन महिन्यांपासून ...

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यांतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी तब्बल तीन महिन्यांपासून शासनाकडे पाठपुरावा केला. तेव्हा आता कुठे रस्ते व पुलांच्या दुरुस्तीवर सुमारे ५० कोटी रुपयांचा खर्च करण्यास मान्यता मिळाली असून, बांधकाम विभागाने पूर्व विभागातील २३ कामांची निविदा प्रक्रिया गुरुवारी सुरू केली असली, तरी बहुतांशी कामे तांत्रिक मान्यतेच्या कचाट्यात अडकल्यामुळे त्यासंबंधी निविदा प्रक्रिया अद्याप सुरू करता आलेली नाही.

यासंदर्भात बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे खराब रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून दरवर्षी प्रस्ताव मागविले जातात. त्यानुसार यंदा मराठवाड्यातील खराब रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे ११४ कोटी रुपयांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यात जिल्ह्यात औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, पैठण आणि कन्नड, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद असे पूर्व व पश्चिम दोन विभाग असून, या दोन्ही विभागांकडून प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते. तथापि, या दोन्ही विभागातील रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी शासनाने हिरवा कंदील दाखविल्यामुळे निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यापैकी पश्चिम विभागाने गुरुवारी २३ कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली. उर्वरित २२-२३ कामांची निविदा प्रक्रिया तांत्रिक मान्यतेच्या कचाट्यात अडकली आहे. आज जाहीर केलेल्या निविदांपैकी ९ ते १० दिवसांनंतर पहिली निविदा व त्यानंतर दुसरी निविदा ४ ते ५ दिवसांनंतर उघडली जाईल. तेथून पुढे संबंधित कंत्राटदार संस्थेला कार्यारंभ आदेश वाटप केले जातील. पश्चिम विभागासाठी १७ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे, तर पूर्व विभागासाठी ३० कोटींहून अधिक कामांना मंजुरी मिळालेली आहे.

दरम्यान, या दोन्ही विभागांनी रस्ता दुरुस्तीसाठी शासनाची मान्यता मिळेल, तोपर्यंत रस्ता दुरुस्तीची कामे सुरू करा, असे कंत्राटदारांना सांगितले; परंतु अगोदरचीच बिले रखडलेली असल्यामुळे कंत्राटदारांनी त्याकडे पाठ फिरवली होती.

चौकट....

मार्चअखेरपूर्वी कामे उरकण्याची लगबग

पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीला उन्हाळ्यात सुरुवात होईल. शासनाने आता कुठे रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला असून, मार्चअखेर ती उरकण्याची लगबग सुरू होईल. त्यानंतर लगेच बिले सादर करून ती शासनाकडे पाठविली जातील. या लगबगीत कामांच्या दर्जाकडे बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देतील का, असा प्रश्न या क्षेत्रातील जाणकारांनी उपस्थित केला आहे.