शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार कामगारच उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:41 IST

माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शाळांमध्ये पोषण आहार शिजविण्याचे काम करणा-या मदतनिसांचे मानधन अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही मिळालेले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शाळांमध्ये पोषण आहार शिजविण्याचे काम करणा-या मदतनिसांचे मानधन अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही मिळालेले नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत या कामगारांना उसनवारी करावी लागली. पोषण आहाराचे मानधन कायम विलंबाने मिळत असल्यामुळे या कामगारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.विद्यार्थ्यांना शाळेतच पोषक आहार मिळावा यासाठी शासनाकडून माध्यान्ह भोजन योजना राबवली जाते. जिल्ह्यातील एक हजार ९०६ शाळांमध्ये पहिली ते चौथी व पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाते. पोषण आहार शिजविण्याचे काम मदतनीस प्रामाणिकपणे अखंडित करत असले तरी त्यांचे मानधन मात्र कधीच वेळेत मिळत नाही. जून महिन्यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर आता आॅक्टोबर उलटला आहे.शिक्षण विभागातील सर्व यंत्रणांचे पगार नियमित होत असले तरी पोषण आहार शिजविणाºया मदतनिसांना गत सहा महिन्यांपासून छदामही मिळालेला नाही. पोषण आहाराची खिचडी शिजविण्यासाठी लागणा-या इंधन, भाजीपाल्याचा खर्चही या कामगारांना करावा लागत असल्याने पैसे आणायचे कुठून, हा प्रश्न या कामगारांसमोर आहे. काही शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी दिवाळीत पदरमोड करून पोषण आहार कामगारांना मदत केली.मात्र, बहुतांश कामगारांनी उधारी-उसनवारी करत दिवाळी साजरी केली. शिक्षण विभागाच्या संबंधित विभागाचे अधिकारी शालेय स्तरावरून बिले वेळेत मिळत नसल्यामुळे पोषण आहाराची देयके काढण्यास उशीर होतो, असे सांगत आहेत. तर बिले वेळेत सादर करूनही या कामगारांचे मानधन वेळेत काढले जात नाही, असे शालेय स्तरावरून सांगण्यात येत आहे. या टोलवा-टोलवीमध्ये पोषण आहार शिजविणाºया कामगारांचे मानधन देण्यास कायम विलंब होत आहे. दरम्यान, पोषण आहार कामगारांचे जून व जुलै महिन्याचे मानधन शाळेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आल्याचे जे.डी. राऊत यांनी सांगितले.