शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

पोषण आहार कामगारच उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:41 IST

माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शाळांमध्ये पोषण आहार शिजविण्याचे काम करणा-या मदतनिसांचे मानधन अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही मिळालेले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शाळांमध्ये पोषण आहार शिजविण्याचे काम करणा-या मदतनिसांचे मानधन अर्धे शैक्षणिक वर्ष उलटूनही मिळालेले नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत या कामगारांना उसनवारी करावी लागली. पोषण आहाराचे मानधन कायम विलंबाने मिळत असल्यामुळे या कामगारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.विद्यार्थ्यांना शाळेतच पोषक आहार मिळावा यासाठी शासनाकडून माध्यान्ह भोजन योजना राबवली जाते. जिल्ह्यातील एक हजार ९०६ शाळांमध्ये पहिली ते चौथी व पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाते. पोषण आहार शिजविण्याचे काम मदतनीस प्रामाणिकपणे अखंडित करत असले तरी त्यांचे मानधन मात्र कधीच वेळेत मिळत नाही. जून महिन्यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर आता आॅक्टोबर उलटला आहे.शिक्षण विभागातील सर्व यंत्रणांचे पगार नियमित होत असले तरी पोषण आहार शिजविणाºया मदतनिसांना गत सहा महिन्यांपासून छदामही मिळालेला नाही. पोषण आहाराची खिचडी शिजविण्यासाठी लागणा-या इंधन, भाजीपाल्याचा खर्चही या कामगारांना करावा लागत असल्याने पैसे आणायचे कुठून, हा प्रश्न या कामगारांसमोर आहे. काही शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी दिवाळीत पदरमोड करून पोषण आहार कामगारांना मदत केली.मात्र, बहुतांश कामगारांनी उधारी-उसनवारी करत दिवाळी साजरी केली. शिक्षण विभागाच्या संबंधित विभागाचे अधिकारी शालेय स्तरावरून बिले वेळेत मिळत नसल्यामुळे पोषण आहाराची देयके काढण्यास उशीर होतो, असे सांगत आहेत. तर बिले वेळेत सादर करूनही या कामगारांचे मानधन वेळेत काढले जात नाही, असे शालेय स्तरावरून सांगण्यात येत आहे. या टोलवा-टोलवीमध्ये पोषण आहार शिजविणाºया कामगारांचे मानधन देण्यास कायम विलंब होत आहे. दरम्यान, पोषण आहार कामगारांचे जून व जुलै महिन्याचे मानधन शाळेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आल्याचे जे.डी. राऊत यांनी सांगितले.