शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

औरंगाबादेतील कोरोना रुग्णसंख्या ५० हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:05 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ५० हजारांचा आकडा केव्हाच पार केला आहे. होय! ५० हजारांचाच. सार्वजनिक आरोग्य ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ५० हजारांचा आकडा केव्हाच पार केला आहे. होय! ५० हजारांचाच. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमअंतर्गत राज्यस्तरावर नोंद झालेली ही आकडेवारी आहे. याउलट जिल्ह्यातील यंत्रणेने २१ फेब्रुवारीपर्यंत एकूण रुग्णसंख्या ४८ हजार ६३८ झाल्याची माहिती दिली. दोन्ही अहवालात तब्बल २ हजार रुग्णसंख्येची तफावत आहे.

राज्यस्तरावर आरोग्य यंत्रणेच्या नोंदीनुसार जिल्ह्यात एकूण बधितांची संख्या ५० हजार ८७४ झाली आहे. यातील ४८ हजार ३४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १२६४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, तर जिल्ह्यातील यंत्रणेने रविवारी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४६ हजार ४६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ९२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नेमके रुग्ण किती आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या आकडेवारीनुसार अहवाल तयार केला जातो. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या आकडेवारीत बदल होऊ शकतो, असे आरोग्य विभागाने नमूद केले आहे.

---

एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीची नोंद रविवारी...

राज्याच्या नोंदीनुसार जिल्ह्यात एकूण १२७० रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. मात्र, जिल्ह्यात आतापर्यंत १२५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी रविवारी जिल्हा माहिती कार्यालयाने दिली. १६ मृत्यू लपवले जात आहे का, असाही प्रश्न पडत आहे. विशेष म्हणजे राज्याच्या रविवारच्या अहवालात नोंद झालेल्या ३५ मृत्यूपैकी १२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. यात औरंगाबादेतील एका मयत रुग्णाचा समावेश आहे.

----

आरोग्य अधिकारी म्हणाले...

आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले, याविषयी अधिक माहिती घेतली जाईल. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके म्हणाले, रुग्णसंख्या लपविण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. घाटी आणि विद्यापीठातील प्रयोगशाळांकडून जे अहवाल येतात, त्यावरून माहिती दिली जाते.

---

राज्याच्या नोंदीनुसार जिल्ह्यातील कोरोना रुग्ण

एकूण बाधित - ५०,८७४

एकूण कोरोनामुक्त - ४८,३४०

उपचार सुरू - १२६४

----

जिल्ह्याच्या नोंदीनुसार कोरोना रुग्ण (२१ फेब्रुवारीपर्यंत)

एकूण बाधित - ४८,६३८

एकूण कोरोनामुक्त - ४६,४६३

उपचार सुरू - ९२१