शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

‘रासेयो’ मॉडेल देशभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:53 IST

महाराष्ट्रातील राज्यपाल कार्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (रासेयो) स्वयंसेवकांना केंद्र किंवा राज्य सरकारकडून एकही रुपया न घेता राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या जवानांकडून प्रशिक्षण देते. यात राज्यातील सर्वच विद्यापीठे सहभागी होतात. हा अभिनव उपक्रम आहे. महाराष्ट्राचे हे मॉडेल देशभर राबविणार असल्याची घोषणा दिल्लीतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक वीरेंद्र मिश्रा यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्रातील राज्यपाल कार्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (रासेयो) स्वयंसेवकांना केंद्र किंवा राज्य सरकारकडून एकही रुपया न घेता राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या जवानांकडून प्रशिक्षण देते. यात राज्यातील सर्वच विद्यापीठे सहभागी होतात. हा अभिनव उपक्रम आहे. महाराष्ट्राचे हे मॉडेल देशभर राबविणार असल्याची घोषणा दिल्लीतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक वीरेंद्र मिश्रा यांनी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यपाल कार्यालयातर्फे आयोजित ‘आव्हान-२०१८’ हे दहादिवसीय शिबीर २५ मे ते ३ जूनदरम्यान पार पडले. रविवारी या शिबिराचा समारोप विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. यावेळी व्यासपीठावर प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, रासेयोचे राज्यसंपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके, एनडीआरएफचे निरीक्षक पुरुषोत्तमसिंग राणा, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, डॉ. गोविंद कथलाकुट्टे, कुलसचिव डॉ. साधना पांडे आदी उपस्थित होते.यावेळी वीरेंद्र मिश्रा म्हणाले, राज्यपाल कार्यालयाने आयोजित केलेल्या या आपत्ती व्यवस्थापनाच्या शिबिरात स्वयंसेवक प्रशिक्षण घेऊन जात आहेत. विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होत आहे. देशाला सध्या कौशल्य विकासाचीच सर्वाधिक गरज आहे. हे कौशल्य विकासाचे मॉडेल देशभर घेऊन जाणार आहे. या मॉडेलचीच पाहणी करण्यासाठी दिल्लीहून येथे आलो आहे.रासेयोची १९६९ साली सुरुवात झाली. तेव्हा ४० हजार स्वयंसेवक होते. आता हाच आकडा ४१ लाखांवर पोहोचला आहे. एवढी मोठी युवाशक्ती रासेयोकडे उपलब्ध असून, महाराष्ट्र राज्य ज्या पद्धतीने केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून एकही रुपया न घेता हजारो विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण शिबीर घेत आहे. हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. अतुल साळुंके, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, पुरुषोत्तमसिंग राणा, किशोर शितोळे यांच्यासह स्वयंसेवक, संघप्रमुखांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. चोपडे यांनी केला. प्रास्ताविक डॉ. टी. आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी मानले.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र