शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘रासेयो’ मॉडेल देशभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:53 IST

महाराष्ट्रातील राज्यपाल कार्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (रासेयो) स्वयंसेवकांना केंद्र किंवा राज्य सरकारकडून एकही रुपया न घेता राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या जवानांकडून प्रशिक्षण देते. यात राज्यातील सर्वच विद्यापीठे सहभागी होतात. हा अभिनव उपक्रम आहे. महाराष्ट्राचे हे मॉडेल देशभर राबविणार असल्याची घोषणा दिल्लीतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक वीरेंद्र मिश्रा यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्रातील राज्यपाल कार्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (रासेयो) स्वयंसेवकांना केंद्र किंवा राज्य सरकारकडून एकही रुपया न घेता राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या जवानांकडून प्रशिक्षण देते. यात राज्यातील सर्वच विद्यापीठे सहभागी होतात. हा अभिनव उपक्रम आहे. महाराष्ट्राचे हे मॉडेल देशभर राबविणार असल्याची घोषणा दिल्लीतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक वीरेंद्र मिश्रा यांनी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यपाल कार्यालयातर्फे आयोजित ‘आव्हान-२०१८’ हे दहादिवसीय शिबीर २५ मे ते ३ जूनदरम्यान पार पडले. रविवारी या शिबिराचा समारोप विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. यावेळी व्यासपीठावर प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, रासेयोचे राज्यसंपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके, एनडीआरएफचे निरीक्षक पुरुषोत्तमसिंग राणा, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, डॉ. गोविंद कथलाकुट्टे, कुलसचिव डॉ. साधना पांडे आदी उपस्थित होते.यावेळी वीरेंद्र मिश्रा म्हणाले, राज्यपाल कार्यालयाने आयोजित केलेल्या या आपत्ती व्यवस्थापनाच्या शिबिरात स्वयंसेवक प्रशिक्षण घेऊन जात आहेत. विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होत आहे. देशाला सध्या कौशल्य विकासाचीच सर्वाधिक गरज आहे. हे कौशल्य विकासाचे मॉडेल देशभर घेऊन जाणार आहे. या मॉडेलचीच पाहणी करण्यासाठी दिल्लीहून येथे आलो आहे.रासेयोची १९६९ साली सुरुवात झाली. तेव्हा ४० हजार स्वयंसेवक होते. आता हाच आकडा ४१ लाखांवर पोहोचला आहे. एवढी मोठी युवाशक्ती रासेयोकडे उपलब्ध असून, महाराष्ट्र राज्य ज्या पद्धतीने केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून एकही रुपया न घेता हजारो विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण शिबीर घेत आहे. हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. अतुल साळुंके, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, पुरुषोत्तमसिंग राणा, किशोर शितोळे यांच्यासह स्वयंसेवक, संघप्रमुखांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. चोपडे यांनी केला. प्रास्ताविक डॉ. टी. आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी मानले.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र