शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

‘रासेयो’ मॉडेल देशभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:53 IST

महाराष्ट्रातील राज्यपाल कार्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (रासेयो) स्वयंसेवकांना केंद्र किंवा राज्य सरकारकडून एकही रुपया न घेता राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या जवानांकडून प्रशिक्षण देते. यात राज्यातील सर्वच विद्यापीठे सहभागी होतात. हा अभिनव उपक्रम आहे. महाराष्ट्राचे हे मॉडेल देशभर राबविणार असल्याची घोषणा दिल्लीतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक वीरेंद्र मिश्रा यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्रातील राज्यपाल कार्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या (रासेयो) स्वयंसेवकांना केंद्र किंवा राज्य सरकारकडून एकही रुपया न घेता राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या जवानांकडून प्रशिक्षण देते. यात राज्यातील सर्वच विद्यापीठे सहभागी होतात. हा अभिनव उपक्रम आहे. महाराष्ट्राचे हे मॉडेल देशभर राबविणार असल्याची घोषणा दिल्लीतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक वीरेंद्र मिश्रा यांनी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यपाल कार्यालयातर्फे आयोजित ‘आव्हान-२०१८’ हे दहादिवसीय शिबीर २५ मे ते ३ जूनदरम्यान पार पडले. रविवारी या शिबिराचा समारोप विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. यावेळी व्यासपीठावर प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, रासेयोचे राज्यसंपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके, एनडीआरएफचे निरीक्षक पुरुषोत्तमसिंग राणा, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, डॉ. गोविंद कथलाकुट्टे, कुलसचिव डॉ. साधना पांडे आदी उपस्थित होते.यावेळी वीरेंद्र मिश्रा म्हणाले, राज्यपाल कार्यालयाने आयोजित केलेल्या या आपत्ती व्यवस्थापनाच्या शिबिरात स्वयंसेवक प्रशिक्षण घेऊन जात आहेत. विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होत आहे. देशाला सध्या कौशल्य विकासाचीच सर्वाधिक गरज आहे. हे कौशल्य विकासाचे मॉडेल देशभर घेऊन जाणार आहे. या मॉडेलचीच पाहणी करण्यासाठी दिल्लीहून येथे आलो आहे.रासेयोची १९६९ साली सुरुवात झाली. तेव्हा ४० हजार स्वयंसेवक होते. आता हाच आकडा ४१ लाखांवर पोहोचला आहे. एवढी मोठी युवाशक्ती रासेयोकडे उपलब्ध असून, महाराष्ट्र राज्य ज्या पद्धतीने केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून एकही रुपया न घेता हजारो विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण शिबीर घेत आहे. हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. अतुल साळुंके, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, पुरुषोत्तमसिंग राणा, किशोर शितोळे यांच्यासह स्वयंसेवक, संघप्रमुखांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. चोपडे यांनी केला. प्रास्ताविक डॉ. टी. आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी मानले.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र