शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

आता नेमणुका पडताळणी करूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 01:12 IST

बाळासाहेब जाधव , लातूर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या २०१२ च्या चालक भरतीतील घोटाळा झाल्याचे उघड झाल्याने वरिष्ठ कार्यालयाने सर्व कागदपत्रांच्या पडताळणीचे आदेश दिले आहेत.

बाळासाहेब जाधव , लातूरमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या २०१२ च्या चालक भरतीतील घोटाळा झाल्याचे उघड झाल्याने वरिष्ठ कार्यालयाने सर्व कागदपत्रांच्या पडताळणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १५१ चालकांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. एक महिन्यापासून ही पडताळणी शिक्षण मंडळाकडे प्रलंबित आहे. दरम्यान, आता पुढील भरती कागदपत्रांची पडताळणी करूनच नियुक्ती देण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला आहे.एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून २०१२ मध्ये १९७ चालक पदाच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली़ यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याने पात्र झालेल्या १२४ व इतर उमेदवारांच्या कागदपत्र तपासणीचे प्रस्ताव तब्बल तीन वर्षानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तपासणीसाठी केवळ ८-१० दिवसांचा कालावधी लागत असतानाही एक महिन्यापासून पडताळणी प्रलंबित आहे.लातूर जिल्ह्यातील १ व उस्मानाबाद जिल्ह्यातील १ असे २ उमेदवारांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी लाटली असल्याचे समोर आले आहे़ दुसऱ्या टप्प्यात १५ प्रस्ताव तर तिसऱ्या टप्प्यात २ असे एकूण १५२ उमेदवारांचे प्रस्ताव माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळाकडे कागदपत्र तपासणीसाठी पाठविण्यात आले. परंतु, महिनाभराचा कालावधी होऊनही कागदपत्रांची तपासणी झाली नाही. शिवाय, एसटी महामंडळानेही पडताळणीसाठी शिक्षण मंडळाकडे पाठपुरावा केला नाही.