शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

आता महामार्गावर राहुट्या

By admin | Updated: December 14, 2014 00:05 IST

मानदेऊळगाव : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती वाढत आहे. परिणामी भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या चोऱ्यांवर नियंत्रण रहावे यासाठी चोऱ्या व लुटमारी

मानदेऊळगाव : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती वाढत आहे. परिणामी भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या चोऱ्यांवर नियंत्रण रहावे यासाठी चोऱ्या व लुटमारी रोखण्यासाठी जालना - राजूर महामार्गावर गस्तीसाठी पोलिसांच्या राहुट्या उभारणार असल्याची माहिती चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या आदेशानुसार या मार्गावर राहुट्या उभारणार आहेत. यात प्रामुख्याने पीरपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, माळशेंद्रा फाटा येथे राहुटी उभारण्यासाठी येथील जागेची पाहणी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी या रस्त्यावर ट्रकवर गोळीबार झाल्याची घटनाही ताजी आहे. माळशेंद्रा फाटा येथे पोलिस राहुटी उभारणार आहेत. माळशेंद्रा, वंझार उम्रद, गोंदेगाव हा मधला मार्ग थेट महामहामार्गाला मिळतो. या महामार्गावरील लूटमार अथवा इतर गुन्हेगारी आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. याविषयी परिसरातील रहिवासी तसेच भीमकायदा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विलास डोळसे म्हणाले, ग्रामसंरक्षक दलाची स्थापना करुन सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी परिसरातील पोलिस पाटील बावणे, गणेश शेवाळे, संजय डोळसे, शरद डोळसे, संतोष लहाने आदींची उपस्थिती होती.या मार्गावर राहुट्या उभाराव्यात अशी परिसरातील ग्रामस्थांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. ही मागणी तसेच दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या राहुट्या उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. राहुट्यांमध्ये शस्त्रधारी चार ते पाच पोलिसांची गस्त असणार आहे. वाटमारीचे प्रकारही यामुळे थांबण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान, देऊळगावराजा महामार्गासह जिल्ह्यातील इतर महामार्गावरही राहुट्या उभारणीचे काम पोलिस दलाने हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. विशेषत: जालना ते नांदेड व जालना ते बीड महामार्गावर राहुट्या उभारण्याची नितांत गरज असल्याचे मत परिसरातील अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)४मानदेऊळगाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या पोलिस राहुट्यांची पाहणी चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केली. साधारणपणे दोन ते तीन ठिकाणी राहुट्या उभारल्या जातील, अंदाज त्यांनी व्यक्त केला. यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण राहील.