शहरं
Join us  
Trending Stories
1
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
2
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
3
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
4
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
5
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
6
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
7
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
8
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
9
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
10
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
11
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
12
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
13
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
14
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
15
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
16
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
17
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
18
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
19
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
20
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग

आता उरल्या केवळ आठवणीच

By admin | Updated: June 4, 2014 01:33 IST

जालना : बीड जिल्ह्याच्या सीमेवरील जालना जिल्हावासियांचे ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांच्याबरोबरचे वर्षानुवर्षापासूनचे ऋणानुबंध अखेर नियतीने दुरावले...

 जालना : बीड जिल्ह्याच्या सीमेवरील जालना जिल्हावासियांचे ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांच्याबरोबरचे वर्षानुवर्षापासूनचे ऋणानुबंध अखेर नियतीने दुरावले... ज्येष्ठ नेते मुंडे यांचे जालना जिल्हावासियांशी पूर्वापारपासून नातेसंबंध. विशेषत: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पाठोपाठ जनसंघ व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांचा या जिल्ह्याशी कायम संपर्क होता. ज्येष्ठ नेते मुंडे, स्व. प्रमोद महाजन या दोघांचे शहरासह जिल्ह्यातील अनेक कुटुंबांशी कायम सख्य, ऋणानुबंध होते. त्या काळातील, विशेषत: चळवळीतील आठवणी आजही काही कुटुंबिय आवर्जून सांगत असतात. मराठवाडा विकास आंदोलनातीलही त्या दोघांचे सहकारीही संघर्षाच्या त्या आठवणी ताज्या ठेवत आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने पूर्णत: भारावलेल्या त्या दोघांचे या जिल्ह्यात संघ परिवाराव्यतिरिक्त समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारसरणीच्या कार्यकर्त्यांसह कुटुंबियांबरोबरचा जिव्हाळाही नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या जिल्ह्यातील छोट्या असो वा मोठ्या प्रत्येक निवडणुकीत, पक्ष संघटनेत मुंडे यांची सक्रिय भूमिका राहिली. विशेषत: १९७७ पासून नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मुंडे यांचा मोठा प्रभाव राहिला. त्यामुळेच का होईना; या जिल्ह्यात पक्ष संघटनात्मक बांधणीसह सत्तेत पक्षाने गरूडझेप घेतली. विशेषत: एकापाठोपाठ एक लोकसभा निवडणुकीत नेहमीच मोठा विजय मिळवीत पक्षाने या जिल्ह्यात भक्कम असा पाया रोवला. भाजपाचा बालेकिल्ला म्हणून जालना नकाशावर राहिला. मुंडे यांचेच योगदान हे त्यात कारणीभूत होते, हे निश्चित. माजी खा. पुंडलिक हरी दानवे व माजी खा. उत्तमसिंह पवार या दोघांनी दोनदा विजय मिळविला. पाठोपाठ विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही ओळीने चारदा विजय मिळविला. या तिघाही पुढार्‍यांच्या विजयात मुंडे यांचाच मोठा वाटा होता. त्यामुळेच या जिल्ह्याशी मुंडे यांचे नाते आगळे ठरले. गेल्या दोन वर्षांपूर्वी या जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला होता. त्या दरम्यान, मुंडे यांनीच सर्वप्रथम या जिल्ह्यात धाव घेतली. दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. शेतकर्‍यांबरोबर हितगुज केले. त्यापाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्यासमवेतही ते दौर्‍यावर आले होते. त्यावेळीही आडवळणावरील अर्धा डझन गावांना या दोघांनी भेटी दिल्या. सर्वसामान्य शेतकर्‍यांबरोबर संवाद साधला. त्यांच्यासमवेत भोजनही केले. विशेष म्हणजे संसदेत जालना जिल्ह्यातील दुष्काळी चित्राविषयी आवाज उठविला. तेथूनच जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांना मोठा वेग आला. गेल्या सहा-आठ महिन्यात मुंडे हे या जिल्ह्यात किमान चार वेळा धावता दौरा करून गेले. देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या स्थलांतर सोहळ्या पाठोपाठ, एका रूग्णालयाच्या उद्घाटनास ते आवर्जून उपस्थित होते. अलीकडे म्हणजे गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंडे यांनी खा. रावसाहेब दानवे यांच्या निवडणूक प्रचारार्थ अंबडला २० एप्रिल रोजी हजेरी लावून जाहीर सभा घेतली. तो दौरा अन् ती सभा शेवटची ठरली. (प्रतिनिधी) १९६७-६८ मध्ये विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून प्र.गो. महाजन हे उमेदवार असताना प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, जयसिंगराव गायकवाड यांच्यासमवेत बसून येथील जुन्या कार्यकर्त्यांनी पोलिंग चिठ्ठया लिहिण्याचे काम केले, अशा आठवणी काहीजण सांगतात. मुंडे यांचा विनोदी स्वभाव, हसत खेळत मार्गदर्शन करणे कार्यकर्त्यांना वेड लावून जाणारेच होते. भाजपा-शिवसेना युतीअंतर्गत कोणतीही समस्या उदभवली किंवा काही गैरसमज निर्माण झाले की गोपीनाथ मुंडे जालन्यात धावून येत. सर्वांशी चर्चा करून निर्माण झालेल्या समस्येवर मात करत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये मुंडे यांचा शब्द अंतिम मानला जात होता. शहरातील उद्योजकांशीही त्यांचे सौख्याचे संबंध होते.