शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

चौकशी समितीसाठी आता पुन्हा हालचाली

By admin | Updated: June 12, 2016 00:02 IST

नजीर शेख, औरंगाबाद पीएच.डी.च्या बाजारप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तीन महिने चालढकल केल्यानंतर शुक्रवारी समिती नेमण्याची हालचाल सुरू केली.

नजीर शेख, औरंगाबादपीएच.डी.च्या बाजारप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तीन महिने चालढकल केल्यानंतर शुक्रवारी समिती नेमण्याची हालचाल सुरू केली. ‘लोकमत’मध्ये यासंबंधीचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध होताच विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले. दरम्यान, विद्यापीठाच्या कुलगुरूंनी एकदा जाहीर केलेली गोष्ट करायला पाहिजे, आपली प्रतिष्ठा गमावू नये, असे मत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे यांनी व्यक्त केले. विद्यापीठातील आणि महाविद्यालयांतील अनेक गाईड असलेले प्राध्यापक विद्यार्थ्यांची आर्थिक छळवणूक करतात, यासंबंधी लोकमतने मार्च महिन्यात मालिका प्रसिद्ध केली होती. या विषयाचा ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला आहे. पीएच.डी.च्या घोटाळ्याप्रकरणी चार आजी, माजी कुलगुरूंची समिती नेमल्याचे जाहीर केले. या समितीत सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. माणिकराव साळुंके, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एम. माळी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. कमल सिंग यांचा समावेश असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली होती. याच विषयासंबंधी शुुक्रवारी अधिक माहिती घेतली असता विद्यापीठाने मागील तीन महिन्यांपासून समिती नेमल्याची पत्रे तयार करण्यातच वेळ घालवला. समितीत आता डॉ. साळुंके नसणार आहेत. त्याऐवजी अन्य एका माजी कुलगुरूंचा समावेश असणार आहे. मात्र त्याचे नाव समजू शकले नाही. ही पत्रे आता सोमवारी (दि. १३ जून) रोजी पाठविली जाणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पीएच.डी. घोटाळ्याप्रकरणी विद्यापीठाने तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ वाया घालविल्याची प्रतिक्रिया माजी कुलगुरू डॉ. घुगे यांनी व्यक्त केली. दोषींना शिक्षा व्हायलाच हवी असे सांगताना ते म्हणाले की, समितीमध्ये चार कुलगुरू हवेतच कशाला? चौकशी करायचीच असे ठरविले तर एका माजी कुलगुरूंकडूनही होऊ शकते. कुलगुरूंना त्यांची त्यांची कामे असू शकतात. शिवाय ते एकाच वेळी विद्यापीठात एकत्र येणेही अवघड असते. याचा विचार व्हायला हवा. कुलगुरूंनीही आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी करावी, असे ते म्हणाले. भारतीय विद्यार्थी सेनेचे विद्यापीठ प्रमुख तुकाराम सराफ म्हणाले की, पीएच.डी.चे घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, यामध्ये दुमत नाही. कुलगुरूंनी अजूनही ज्या गाईडविषयी विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत, त्यासाठी कक्ष स्थापन करावा. विद्यापीठात संशोधनाचा दर्जा राहण्यासाठी चौकशी समिती आवश्यकच आहे. सत्यशोधन अहवालाचे काय?जालना येथील एका प्राध्यापिकेने विद्यार्थिनीला रक्कम मागितल्यासंबंधी सादर झालेली ‘आॅडिओ क्लीप’ विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने तपासली. त्यावर संबंधित प्राध्यापिकेचे मतही घेतले गेले. हा अहवाल समितीने कुलगुरूंना सादर केला. त्यावर क्लीपमधील आवाज त्या प्राध्यापिकेचाच असल्यासंबंधी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अहवाल घेण्याचे कुलगुरूंनी सूचित केले होते. मात्र, खालच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबतीत काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे सत्यशोधन समितीच्या त्या अहवालावर काहीच कारवाई झाली नाही आणि सत्यशोधन समितीतील प्राध्यापकांचाही वेळ वाया गेला.