शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

चौकशी समितीसाठी आता पुन्हा हालचाली

By admin | Updated: June 12, 2016 00:02 IST

नजीर शेख, औरंगाबाद पीएच.डी.च्या बाजारप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तीन महिने चालढकल केल्यानंतर शुक्रवारी समिती नेमण्याची हालचाल सुरू केली.

नजीर शेख, औरंगाबादपीएच.डी.च्या बाजारप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तीन महिने चालढकल केल्यानंतर शुक्रवारी समिती नेमण्याची हालचाल सुरू केली. ‘लोकमत’मध्ये यासंबंधीचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध होताच विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले. दरम्यान, विद्यापीठाच्या कुलगुरूंनी एकदा जाहीर केलेली गोष्ट करायला पाहिजे, आपली प्रतिष्ठा गमावू नये, असे मत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे यांनी व्यक्त केले. विद्यापीठातील आणि महाविद्यालयांतील अनेक गाईड असलेले प्राध्यापक विद्यार्थ्यांची आर्थिक छळवणूक करतात, यासंबंधी लोकमतने मार्च महिन्यात मालिका प्रसिद्ध केली होती. या विषयाचा ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला आहे. पीएच.डी.च्या घोटाळ्याप्रकरणी चार आजी, माजी कुलगुरूंची समिती नेमल्याचे जाहीर केले. या समितीत सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. माणिकराव साळुंके, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एम. माळी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. कमल सिंग यांचा समावेश असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली होती. याच विषयासंबंधी शुुक्रवारी अधिक माहिती घेतली असता विद्यापीठाने मागील तीन महिन्यांपासून समिती नेमल्याची पत्रे तयार करण्यातच वेळ घालवला. समितीत आता डॉ. साळुंके नसणार आहेत. त्याऐवजी अन्य एका माजी कुलगुरूंचा समावेश असणार आहे. मात्र त्याचे नाव समजू शकले नाही. ही पत्रे आता सोमवारी (दि. १३ जून) रोजी पाठविली जाणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पीएच.डी. घोटाळ्याप्रकरणी विद्यापीठाने तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ वाया घालविल्याची प्रतिक्रिया माजी कुलगुरू डॉ. घुगे यांनी व्यक्त केली. दोषींना शिक्षा व्हायलाच हवी असे सांगताना ते म्हणाले की, समितीमध्ये चार कुलगुरू हवेतच कशाला? चौकशी करायचीच असे ठरविले तर एका माजी कुलगुरूंकडूनही होऊ शकते. कुलगुरूंना त्यांची त्यांची कामे असू शकतात. शिवाय ते एकाच वेळी विद्यापीठात एकत्र येणेही अवघड असते. याचा विचार व्हायला हवा. कुलगुरूंनीही आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी करावी, असे ते म्हणाले. भारतीय विद्यार्थी सेनेचे विद्यापीठ प्रमुख तुकाराम सराफ म्हणाले की, पीएच.डी.चे घोटाळे करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, यामध्ये दुमत नाही. कुलगुरूंनी अजूनही ज्या गाईडविषयी विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत, त्यासाठी कक्ष स्थापन करावा. विद्यापीठात संशोधनाचा दर्जा राहण्यासाठी चौकशी समिती आवश्यकच आहे. सत्यशोधन अहवालाचे काय?जालना येथील एका प्राध्यापिकेने विद्यार्थिनीला रक्कम मागितल्यासंबंधी सादर झालेली ‘आॅडिओ क्लीप’ विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने तपासली. त्यावर संबंधित प्राध्यापिकेचे मतही घेतले गेले. हा अहवाल समितीने कुलगुरूंना सादर केला. त्यावर क्लीपमधील आवाज त्या प्राध्यापिकेचाच असल्यासंबंधी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अहवाल घेण्याचे कुलगुरूंनी सूचित केले होते. मात्र, खालच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबतीत काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे सत्यशोधन समितीच्या त्या अहवालावर काहीच कारवाई झाली नाही आणि सत्यशोधन समितीतील प्राध्यापकांचाही वेळ वाया गेला.