शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

आता लोडशेडिंगचे चटके

By admin | Updated: May 20, 2016 00:39 IST

औरंगाबाद : उन्हामुळे हैराण झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना लोडशेडिंगचेही चटके बसत आहेत. विजेची उपलब्धता कमी झाल्यामुळे जिल्ह्यात दोन दिवसांपासून लोडशेडिंगची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

औरंगाबाद : उन्हामुळे हैराण झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना लोडशेडिंगचेही चटके बसत आहेत. विजेची उपलब्धता कमी झाल्यामुळे जिल्ह्यात दोन दिवसांपासून लोडशेडिंगची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ग्रामीण भागात पाच तासांपासून तब्बल नऊ तासांपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे ऐन उन्हात नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. औरंगाबाद शहर मात्र, लोडशेडिंगमुक्त घोषित झालेले असल्यामुळे येथील वीजपुरवठ्यावर तूर्तास कोणताही परिणाम होणार नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. काही महिन्यांपासून जिल्ह्यात लोडशेडिंग पूर्णपणे बंद झालेली होती. महावितरणकडे मागणीपेक्षाही जास्त वीज उपलब्ध होती. त्यामुळे तांत्रिक बिघाडाचा अपवाद वगळता कुठेही वीजपुरवठा खंडित होत नव्हता. मात्र दोन-तीन दिवसांतच या परिस्थितीत बदल झाला आहे. काही ऊर्जा निर्मिती केंद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे विजेची उपलब्धता कमी झाली असून, ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून दोन तीन दिवसांपासून ग्रामीण भागात लोडशेडिंग घेण्यात येत आहे. महावितरणच्या सूत्रांनी सांगितले की, महावितरण कंपनीकडे सध्या पुरेशी वीज उपलब्ध नाही. रोजची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. म्हणून ही तूट भरून काढण्यासाठी लोडशेडिंगची अंमलबजावणी सुरू झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी केली जाते. ज्या फिडरवर वीज गळती आणि थकबाकीचे प्रमाण जास्त आहे, तिथे जास्त प्रमाणावर लोडशेडिंग घेण्यात येत आहे. साधारणत: ज्या फिडरवर वीज गळती आणि थकबाकीचे प्रमाण ४२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तेथे अधिक वेळ लोडशेडिंग होत आहे. औरंगाबाद शहरात मात्र, अद्याप लोडशेडिंग लागू झालेली नाही. शासनाने राज्यातील महसुली मुख्यालयाची ठिकाणे याआधीच लोडशेडिंगमुक्त घोषित केलेली आहेत. त्यामुळे तूर्तास तरी अखंडितच पुरवठा राहील, असेही सांगण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या ३७ लाख इतकी आहे. त्यापैकी सुमारे २० लाख लोक हे ग्रामीण भागात राहतात. या २० लाख लोकसंख्येला सध्या लोडशेडिंगचे चटके बसत आहेत. उन्हाचा कहर कायम तापमान : ४३.४ अंश औरंगाबाद : शहरात गुरुवारीदेखील उन्हाचा कहर कायम राहिला. सूर्यकिरणांची प्रखरता वाढल्यामुळे दिवसभर उन्हाचे चटके बसत होते. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले होते. वाहतूकही रोडावली होती. चिकलठाणा वेधशाळेत गुरुवारी ४३.४ अंश सेल्शिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. बुधवारच्या तुलनेत हे तापमान ०.४ अंश सेल्शिअसने कमी होते, पण तरीदेखील हे तापमान सामान्य तापमानापेक्षा किती तरी जास्त असल्यामुळे उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत होता. त्यात किमान तापमान वाढून ते ३०.४ अंश सेल्शिअसवर पोहोचले होते. त्यामुळे वातावरणातील शुष्कपणा वाढला होता. परिणामी दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा बसत होत्या. दुपारच्या वेळी सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याचे भासत होते. या सर्वाचा परिणाम कामकाजावरही जाणवला. दुपारनंतर लोकांनी बाहेर पडणे टाळले. त्यामुळे अनेक रस्ते ओस पडले होते. सायंकाळनंतर मात्र वातावरणात काहीसा बदल दिसून आला.