शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

आता लोडशेडिंगचे चटके

By admin | Updated: May 20, 2016 00:39 IST

औरंगाबाद : उन्हामुळे हैराण झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना लोडशेडिंगचेही चटके बसत आहेत. विजेची उपलब्धता कमी झाल्यामुळे जिल्ह्यात दोन दिवसांपासून लोडशेडिंगची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

औरंगाबाद : उन्हामुळे हैराण झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना लोडशेडिंगचेही चटके बसत आहेत. विजेची उपलब्धता कमी झाल्यामुळे जिल्ह्यात दोन दिवसांपासून लोडशेडिंगची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ग्रामीण भागात पाच तासांपासून तब्बल नऊ तासांपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे ऐन उन्हात नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. औरंगाबाद शहर मात्र, लोडशेडिंगमुक्त घोषित झालेले असल्यामुळे येथील वीजपुरवठ्यावर तूर्तास कोणताही परिणाम होणार नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. काही महिन्यांपासून जिल्ह्यात लोडशेडिंग पूर्णपणे बंद झालेली होती. महावितरणकडे मागणीपेक्षाही जास्त वीज उपलब्ध होती. त्यामुळे तांत्रिक बिघाडाचा अपवाद वगळता कुठेही वीजपुरवठा खंडित होत नव्हता. मात्र दोन-तीन दिवसांतच या परिस्थितीत बदल झाला आहे. काही ऊर्जा निर्मिती केंद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे विजेची उपलब्धता कमी झाली असून, ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून दोन तीन दिवसांपासून ग्रामीण भागात लोडशेडिंग घेण्यात येत आहे. महावितरणच्या सूत्रांनी सांगितले की, महावितरण कंपनीकडे सध्या पुरेशी वीज उपलब्ध नाही. रोजची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. म्हणून ही तूट भरून काढण्यासाठी लोडशेडिंगची अंमलबजावणी सुरू झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी केली जाते. ज्या फिडरवर वीज गळती आणि थकबाकीचे प्रमाण जास्त आहे, तिथे जास्त प्रमाणावर लोडशेडिंग घेण्यात येत आहे. साधारणत: ज्या फिडरवर वीज गळती आणि थकबाकीचे प्रमाण ४२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तेथे अधिक वेळ लोडशेडिंग होत आहे. औरंगाबाद शहरात मात्र, अद्याप लोडशेडिंग लागू झालेली नाही. शासनाने राज्यातील महसुली मुख्यालयाची ठिकाणे याआधीच लोडशेडिंगमुक्त घोषित केलेली आहेत. त्यामुळे तूर्तास तरी अखंडितच पुरवठा राहील, असेही सांगण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या ३७ लाख इतकी आहे. त्यापैकी सुमारे २० लाख लोक हे ग्रामीण भागात राहतात. या २० लाख लोकसंख्येला सध्या लोडशेडिंगचे चटके बसत आहेत. उन्हाचा कहर कायम तापमान : ४३.४ अंश औरंगाबाद : शहरात गुरुवारीदेखील उन्हाचा कहर कायम राहिला. सूर्यकिरणांची प्रखरता वाढल्यामुळे दिवसभर उन्हाचे चटके बसत होते. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले होते. वाहतूकही रोडावली होती. चिकलठाणा वेधशाळेत गुरुवारी ४३.४ अंश सेल्शिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. बुधवारच्या तुलनेत हे तापमान ०.४ अंश सेल्शिअसने कमी होते, पण तरीदेखील हे तापमान सामान्य तापमानापेक्षा किती तरी जास्त असल्यामुळे उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत होता. त्यात किमान तापमान वाढून ते ३०.४ अंश सेल्शिअसवर पोहोचले होते. त्यामुळे वातावरणातील शुष्कपणा वाढला होता. परिणामी दिवसभर उन्हाच्या तीव्र झळा बसत होत्या. दुपारच्या वेळी सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याचे भासत होते. या सर्वाचा परिणाम कामकाजावरही जाणवला. दुपारनंतर लोकांनी बाहेर पडणे टाळले. त्यामुळे अनेक रस्ते ओस पडले होते. सायंकाळनंतर मात्र वातावरणात काहीसा बदल दिसून आला.