शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

शिवसेना राबविणार आता कन्यादान योजना

By admin | Updated: January 30, 2016 00:23 IST

उस्मानाबाद : मागील चार वर्षापासून जिल्हा तीव्र दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी पक्ष नेहमीच अग्रभागी राहिल्याचे सांगत

उस्मानाबाद : मागील चार वर्षापासून जिल्हा तीव्र दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी पक्ष नेहमीच अग्रभागी राहिल्याचे सांगत, दुष्काळी परिस्थितीमुळे गांजलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम राबविण्यात येणार असून, या कन्यादान योजनेच्या माध्यमातून पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील १ हजार शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह लावून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी दिली. मागील कालावधीत मोठ्या प्रमाणात संघटनात्मक काम करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळेच पक्ष प्रमुखांनी आदेश दिल्यास शिवसेना यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढेल, असेही त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे. टंचाई परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मागील दीड वर्षाच्या काळात विविध उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी जिल्ह्यातील ५४ सर्कलमध्ये मागील वर्षी शेतकरी आत्महत्या बचाव जनजागरण दिंडी काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून सात दिवस जिल्ह्याच्या विविध भागात रथ घेऊन गेलो. तसेच पोवाडे, भारूड आदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उद्बोधन केले. जनजागरण दिंडीसोबत सात दिवस मुक्कामी राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला. एखाद्या पक्षाने अशा पद्धतीचा उपक्रम प्रथमच राबविल्याने या उपक्रमाला मोठे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. केवळ एवढ्यावरच न थांबता पक्षाच्या वतीने एक हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार अशी एक कोटीची मदत केली. या उपक्रमामुळे गरजू शेतकऱ्यांना पेरणी तसेच इतर किरकोळ कामासाठी रोख रक्कम देता आली. शेतकरी आत्महत्येची दुर्दैवी घटना पुढे आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी स्वत: जाऊन त्यांची भेट घेतली. अशा आत्महत्याग्रस्त २० शेतकऱ्यांना पक्षाच्या वतीने तात्काळ २५ ते ५० हजार रुपये रोख रक्कम दिल्याचे सांगत, याच उपक्रमाचा पुढचा भाग म्हणून आता जिल्ह्यात ‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने दुष्काळग्रस्त भागाचा अभ्यास केला. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी केवळ मुलीच्या विवाहासाठीच्या खर्चाच्या तणावातून आत्महत्या केल्याचे पुढे आले. त्यामुळेच पक्षाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे मोफत विवाह सामूदायिकरित्या राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. या सामूहिक विवाहात नावनोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याला फक्त मुलीच्या जन्म प्रमाणपत्राची प्रत द्यावी लागणार आहे. लग्नाचा सर्व खर्च पक्षाच्या वतीने करण्यात येणार असून, यासाठीची नोंदणी इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित भागातील शाखा प्रमुखाकडे करावयाची आहे. लग्नासाठीचे सर्व साहित्य तसेच जेवणाची व्यवस्थाही पक्षातर्फे करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)