शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

आता रेशन कार्डधारक सर्व रुग्णांना मिळणार मोफत उपचार

By admin | Updated: June 16, 2014 01:10 IST

औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार घेण्यासाठी रेशन कार्डवर जारी केल्याची तारीख बंधनकारक असलेली अट रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला.

औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार घेण्यासाठी रेशन कार्डवर जारी केल्याची तारीख बंधनकारक असलेली अट रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला. या निर्णयामुळे केशरी, पिवळे रेशन कार्ड असलेल्या सर्व कुटुंबांना आता मोफत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केवळ रेशन कार्डवर तारीख नाही, म्हणून लाखो रुग्ण कालपर्यंत उपचारापासून वंचित राहिले होते.राज्य शासनाने राज्यातील सर्व रेशन कार्डधारक कुटुंबांचा आरोग्य विमा उतरविला आहे. या योजनेंतर्गत रेशन कार्ड असलेल्या सर्व कुटुंबांना एक लाख रुपये खर्चापर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध केली आहे. कॅन्सर, हृदयविकार, मेंदूविकार, किडनीविकार या गंभीर आजारांवरील उपचारांसाठीही वेगवेगळे पॅकेज दिलेले आहेत. या योजनेमुळे राज्यातील गरीब रुग्णांना दिलासा मिळाला होता. मात्र, योजनेची अंमलबजावणी करताना घातलेल्या किरकोळ अटीमुळे सामान्य रुग्ण उपचारांपासून वंचित राहत होते. याविषयी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. घाटीसारख्या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात केवळ १० टक्के रुग्णांनाच जीवनदायी योजनेचा लाभ मिळत असल्याचे वृत्त दिले होते. ११७७ खाटांच्या या रुग्णालयात प्रत्यक्षात त्याहून अधिक रुग्ण अ‍ॅडमिट असतात. बाह्यरुग्ण विभागात १ हजार ८०० हून अधिक रुग्ण रोज दाखल होतात. मात्र, रेशन कार्डवर तारीख नाही या किरकोळ कारणामुळे रुग्णांना योजनेचा लाभ मिळत नव्हता. रुग्णांना रेशन कार्डवर तारीख लिहून आणा, असे सांगितले जाते. तेव्हा त्यांना तहसील कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या खेट्या माराव्या लागत. त्यातही दलालांकडून त्यांची आर्थिक लूट होते. त्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होते. तेव्हा भीक नको, पण कुत्रे आवर, या म्हणीप्रमाणे रुग्ण जीवनदायी योजनेचे उपचार नको, असे म्हणू लागले होते. दरम्यान, शासनाने जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेण्यासाठी रेशन कार्डवरील तारखेची अट रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.