शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

नोटीसधारकांची होतेय धावपळ

By admin | Updated: July 11, 2017 23:46 IST

सेनगाव : तहसील कार्यालयाने शहरातील ५०० हून अधिक नागरिकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्याने या कारवाईने शहरात खळबळ उडाली

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तहसील कार्यालयाने शहरातील ५०० हून अधिक नागरिकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्याने या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून, नोटीसधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नोटिसांचा खुलासा करण्यासाठी जुने पुरावे गोळा करण्यासाठी मोठी धावपळ उडाली आहे. येथील नगरपंचायत हद्दीत असणारा गट नं. ९५६ या जमिनीच्या क्षेत्रांची महसूल दप्तरी शासनाच्या नावाने नोंद आहे. या ४ हेक्टर ८५ आर जमिनीवर मागील ६० ते ७० वर्षांपासून जवळपास ३५० घरांचे इंदिरा नगर वसलेले आहे. त्याशिवाय शासकीय कार्यालये, नगरपंचायत, शाळा, आठवडी बाजार, नगरपंचायतीचे गाळेधारक आहेत. या सर्वांना तहसील कार्यालयाने ८ जुलै रोजी अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्या असून, या गटात उभारलेली घरे, दुकाने यासंबंधी आठ दिवसांत जागेचे पुरावे सादर करण्याचे दिले आहेत. १५ जुलैनंतर अतिक्रमणावर थेट कारवाई करण्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे. पुरावे सादर करण्याची मुदत चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा स्थितीत इंदिरा नगरातील गोरगरीब नागरिक, रोजमजुरी बुडवत जुने कागदपत्रे, पुरावे शोधण्यासाठी धावपळ करताना दिसत आहे. प्रशासनाने येथील नगरपंचायत कार्यालयाला नोटीस बजावून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. ६० ते ७० वर्षांपासून वास्तव्य असणाऱ्या गरीब कुटुंबांना या कारवाईत टारगेट करण्यात आल्याने नागरिकांत, व्यापाऱ्यांत या कारवाईने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण शहरात केवळ अतिक्रमणाच्या नोटिसीची चर्चा होत आहे. गट नं. ९५६ ही जमीन शहराच्या मध्यभागी असून, नगरपंचायत स्थापनेपूर्वी या जमीन क्षेत्रावर प्रत्यक्ष ग्रामपंचायत कार्यालयाचा ताबा राहीला. ग्रामपंचायत बरखास्तीनंतर ही जमीन नगरपंचायत कार्यालयाच्या अखत्यारित आली; परंतु महसूल रेकॉर्डला याची कोणतीही नोंद निर्धारित वेळेत झाली नसल्याने हा गोंधळ उडाला आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई या प्रकारामुळे वेगळ्या वळणावर गेली असून, आमच्या घरांचे काय होणार? असा एकच प्रश्न नागरिक विचारत आहेत.