शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

पाच, दहा नव्हे तब्बल ८ हजार आजार दुर्मीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:02 IST

दुर्मीळ आजारांचे जन्मल्यानंतर काहींमध्ये लगेच निदान होते, तर वृद्ध झाल्यानंतर काहींमध्ये निदान होते; पण अनेकदा दुर्मीळ आजारांना आजार ...

दुर्मीळ आजारांचे जन्मल्यानंतर काहींमध्ये लगेच निदान होते, तर वृद्ध झाल्यानंतर काहींमध्ये निदान होते; पण अनेकदा दुर्मीळ आजारांना आजार म्हणून स्वीकारले जात नाही. शिवाय त्याचे निदानही योग्य वेळी होत नाही.

---

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी जागतिक दुर्मीळ आजार दिन (रिअर डिसिस डे) म्हणून पाळण्यात येतो. यावर्षी हा दिवस २८ फेब्रुवारी रोजी आहे. दुर्मीळ आजारांबाबत सर्वसामान्यांत जनजागृती व्हावी, हा यामागे उद्देश आहे. दुर्मीळ आजार हे अनुवंशिकतेशी निगडित असतात. या पार्श्वभूमिवर मराठवाड्यातील पहिल्या क्लिनिकल जेनटिसिस्ट डाॅ. अलका एकबोटे यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्रश्न : दुर्मीळ आजार कोणत्या आजाराला म्हटले जाते?

उत्तर : जगात प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळे दुर्मीळ आजार आणि त्यासंदर्भातील पाॅलिसी आहेत. भारतात एक हजार लोकांमध्ये एक रुग्ण आढळत असेल तर त्या आजाराला दुर्मीळ आजार म्हटले जाते. या दुर्मीळ आजारांत काही आजार नेहमी ऐकण्यात येतात; परंतु तरीही त्याचे प्रमाण कमी असल्याने ते दुर्मीळ आजार आहेत.

प्रश्न : आपल्याकडे किती प्रकारचे दुर्मीळ आजार आहेत?

उत्तर : आपल्याकडे ८ हजार आजार हे दुर्मीळ आजार म्हणून मान्य आहेत. हे आजार अनुवंशिकतेशी निगडित आहेत. यात सुमारे ३०० आजार हे आढळून येतात. त्यातही ३० आजार हे सर्वसामान्यांत काॅमन झाले आहेत. ॲनिमिया, थॅलेसिमिया, सिकलसेल हे त्यातील काही आजार आहेत. तरीही लोकसंख्येच्या तुलनेत त्याचे रुग्ण कमीच आहेत.

प्रश्न : दुर्मीळ आजार आढळलेल्या एखाद्या रुग्णाचा अनुभव सांगता येईल?

उत्तर : एका दाम्पत्याला दोन मुलं झाली; मात्र दुर्दैवाने दोन्ही जन्मत: मृत्यू पावली. तिसरे बाळ तीन महिन्याचे आहे, पण गतिमंद आहे, त्याला झटके येतात. नेमके असे का झाले, याचे तब्बल ९ वर्षांनंतर निदान झाले. जगभरात केवळ ५ ते ६ रुग्ण आढळलेल्या कंजेनाइटल डिसऑर्डर ऑफ ग्लाइकोसिलेशन (सीडीजी) या दुर्मीळ आजाराचे निदान झाले.

प्रश्न: कोरोना काळात दुर्मीळ आजारांच्या रुग्णांची काय स्थिती राहिली?

उत्तर : गर्भधारणेदरम्यानच तपासणी करून दुर्मीळ आजार असलेल्या बाळाला जन्म द्यायचा की नाही, याचा निर्णय पालक घेऊ शकतात. जन्मानंतर रुग्णांवर औषधोपचार करून उपचार केले जातात. कोरोना काळात रुग्ण रुग्णालयात पोहोचू शकले नाही; पण टेली हेल्थ म्हणजे आनलाइन पद्धतीने सल्ला देण्यात येत होता; परंतु झटके येणाऱ्या रुग्णांना म्हणजे उपचाराची गरज असलेल्यांची काहीही अडचण झाली नाही. टेली हेल्थचा जसा फायदा आहे, तसा तोटाही आहे.