शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

शिष्यवृत्ती नव्हे ‘शिक्षा’

By admin | Updated: November 18, 2014 01:07 IST

सोमनाथ खताळ , बीड मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, आॅनलाईन अर्जप्रक्रिया धिम्या गतीने सुरु असल्याने

सोमनाथ खताळ , बीडमागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, आॅनलाईन अर्जप्रक्रिया धिम्या गतीने सुरु असल्याने शैक्षणिक वर्ष उलटत आले तरी ४० हजारांवर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तर मिळलाची नाही; परंतु हेळसांड, मनस्तापाची शिक्षा मात्र मिळाली आहे़ उल्लेखनीय असे की, ही स्थिती केवळ जिल्ह्यातच आहे, असे नाही तर राज्यातही याहून वेगळे चित्र नाही़मागासवर्गीय प्रवर्गतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन, उच्चशिक्षण घेता यावे, विद्यार्थ्यांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे हा उद्देश डोळ्यासमारे ठेवून सरकारने समाजकल्याण मार्फत भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना देण्याचे जाहिर केले.तीन वर्षापूर्वी अभ्यासक्रम व महाविद्यालयांचा डाटा आॅनलाईन करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्जही आॅनलाईन पद्धतीने भरले जावू लागले. मात्र यावर्षी सप्टेंबर, आॅक्टोबर मध्ये समाजकल्याणने पुन्हा महाविद्यालयांची माहिती मागविली आहे. आता ही माहिती गोळा करता करता महाविद्यालये आणि समाजकल्याणच्या नाके नऊ आले आहे. या शिष्यवृत्तीचे काम पुणे येथील एका खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. मात्र या कंपनीकडून हे काम संथगतीने सुरू असल्याचा अरोप होत असून त्यामुळेच आॅनलाईन अर्जाची गती कमी झाली आहे.‘आॅनलाईन’ ला फाटाजिल्ह्यात ४३६ महाविद्यालेय आहेत़ समाजकल्याण विभागाने महाविद्यालयांची माहिती आॅनलाईन मागविली आहे. मात्र आजही ३०० च्या आसपास महाविद्यालये आॅनलाईन नाहीत़ मंजूरीसाठी किमान दोन महिन्याचा अवधीमहाविद्यालये आॅनलाईन झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले जाणार. त्यानंतर महाविद्यालये या अर्जांची तपासणी करणार आणि मग समाजकल्याणची याला मंजूर मिळणार. अर्ज भरल्यापासून मंजूरीच्या प्रक्रियेला सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे प्राचार्य डॉॅ. नामेदव सानप यांनी सांगितले.पाठपुरावा सुरु समाजकल्याण सहायक आयुक्त आर.एम.शिंदे म्हणाले, यासंदर्भात बैठक घेतली आहे. यामध्ये सर्व्हरची कॅपेसीटी वाढविणे, अर्जामध्ये ‘एडीट’ आॅप्शन अ‍ॅड करणे, फॉर्मेट चेंज करण्यासंदर्भात निर्णय घेतले आहेत. लवकरच प्रक्रिया सुरळीत करण्यात येईल. विद्यार्थी वंचित राहणार नाहीत़विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी बीडच्या विद्यार्थी संघटना नेहमी आवाज उठवत असतात. मात्र शिष्यवृत्ती योजनेचा बोऱ्या वाजलेला असतानाही विद्यार्थी संघटनांना अद्यापही जाग आलेली नाही. यावरून या संघटनांबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. एक-दोन नाही तर हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हा प्रश्न आहे. या संघटनांनी आवाज उठविला तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़