शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

‘नो एलबीटी, नो आॅक्ट्रॉय’

By admin | Updated: June 12, 2014 01:35 IST

औरंगाबाद : जकात हटावी म्हणून एलबीटीला तात्पुरती मंजुरी दिली; पण एलबीटीची आकारणी जकातीसारखीच केली जात आहे.

औरंगाबाद : जकात हटावी म्हणून एलबीटीला तात्पुरती मंजुरी दिली; पण एलबीटीची आकारणी जकातीसारखीच केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या दंडेलशाहीला व्यापारी वैतागले आहेत. म्हणून राज्यभरातील व्यापाऱ्यांनी मनपाशी असहकार आंदोलन सुरू केले.मात्र, मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी ठाम भूमिका घेण्याऐवजी याचा निर्णय मनपा आयुक्त व महापौरांवर टाकला आहे. यावरून राज्य शासन एलबीटीप्रश्नी गंभीर नाही, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आम्हाला एलबीटी नको, जकातही नको, यामुळे मुख्यमंत्र्यांनी टाईमपास न करता अधिवेशनात एलबीटी रद्दची घोषणा करावी. जोपर्यंत स्थानिक कर हटत नाही, तोपर्यंत व्यापारी व उद्योजकांचे असहकार आंदोलन सुरूच राहील, असा दृढ निर्धार व्यापारी व उद्योजकांनी आज केला. एलबीटी रद्द व्हावा यासाठी राज्यातील २६ महानगरपालिकांच्या हद्दीतील व्यापाऱ्यांनी मनपाशी असहकार आंदोलन सुरू केले आहे. यात एलबीटीपोटी प्रत्येक व्यापारी दर महिन्याला १० रुपयेच भरत आहेत. यामुळे महानगरपालिकांचे बजेट बिघडले आहे. मंगळवारी १० रोजी या प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २६ महानगरपालिकांतील आयुक्त व महापौरांची मुंबईत बैठक घेतली व एलबीटी किंवा जकात आकारण्याचा निर्णय सर्वस्वी आयुक्त व महापौरांना घेण्यास सांगितले. या बैठकीला सीएमआयएचे अध्यक्ष राम भोगले, माजी अध्यक्ष मानसिंग पवार, मासिआचे अध्यक्ष भारत मोतिंगे, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा यांनी मार्गदर्शन केले. सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी एलबीटीप्रश्नी टाईमपास करणे सोडून द्यावे आणि एलबीटी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. जकात व एलबीटी हटवून त्याऐवजी व्हॅटची टक्केवारी वाढवावी यासह अन्य पर्यायांचा अहवाल सुबोधकुमार कमिटीने दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री ठोेस निर्णय घेण्याऐवजी टाईपपास करीत असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला.आम्हाला एलबीटी नको व जकातही नको, अशी भूमिका घेत व्यापारी व उद्योजकांनी असहकार आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय बैठकीत एकमुखाने घेतला. यावेळी सीएमआयएचे मुनीष शर्मा, महासंघाचे प्रफुल्ल मालाणी, अजय शहा, मदनभाई जालनावाला, मनोज राठी आदी पदाधिकारी उपस्थित होते.व्यापारी, उद्योजकांमध्ये संताप४मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे व्यापारी व उद्योजकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आज ११ रोजी दुपारी जिल्हा व्यापारी महासंघाने पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. यानंतर सायंकाळी सीएमआयए, मासिआ व जिल्हा व्यापारी महासंघाची एकत्र बैठक सीएमआयएच्या कार्यालयात घेण्यात आली.