शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

लॉकडाऊनबद्दलचा निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : जिल्ह्यात लॉकडाऊन करायचे की नाही, याचा शुक्रवारी निर्णय झालाच नाही. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीबद्दलचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : जिल्ह्यात लॉकडाऊन करायचे की नाही, याचा शुक्रवारी निर्णय झालाच नाही. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीबद्दलचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला. या व्हिडीओ कॉन्फरन्सला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिकुमार पांडेय आदी उपस्थित होते.

लॉकडाऊनबाबत शुक्रवारी निर्णय होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी मुख्यमंत्री आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. मात्र, निर्णय होऊ शकला नाही. प्राप्त माहितीनुसार लॉकडाऊन लावण्यावरुन प्रशासन द्विधा मन:स्थितीत आहे.

जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊनमध्ये शनिवार, रविवार असे दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन आहे. सोमवारी होळीच्या निमित्ताने शासकीय सुटी आहे. हे तीन दिवस वगळून एक आठवडा लॉकडाऊन करावे काय, याबाबत चर्चा सुरू आहे. पण याबाबत अधिकृतपणे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली नाही.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये वाढलेले रुग्ण, त्यांचे व्यवस्थापन, पॉझिटिव्ह केसेस कमी झाल्या पाहिजेत, बेड्सची उपलब्धता याबाबत शासनाकडून विचारणा झाली. लॉकडाऊनबाबतचा निर्णय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये झाला नाही. औरंगाबाद लॉकडाऊनच्या वळणावर आहे, मात्र ते लावण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

विभागीय आयुक्त म्हणाले...

विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी सांगितले, आता संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. चाचणी करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. लॉकडाऊन करायचे की नाही, या निर्णयाबद्दल जिल्हाधिकारी माहिती देतील.

चौकट...

समाजमाध्यमांतून जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शुक्रवारी सकाळी समाजमाध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या संदर्भाने नागरिकांची मते जाणून घेतली. यावेळी अनेक नागरिकांनी लॉकडाऊनच्या विरोधात मते व्यक्त केली. काही निवडक प्रश्नांची उत्तरे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊन करायचे झाल्यास सर्व बाजूंचा विचार करण्यात येणार आहे. लोकांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. होळी, धुळवड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. रुग्णांना असणाऱ्या लक्षणांवर त्याला कुठे ठेवायचे, याचा निर्णय होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

चौकट..

अंशत: लॉकडाऊनची स्थिती अशी

११ मार्चपासून ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये अशंत: लॉकडाऊन केलेले आहे. १६ मार्चच्या आदेशानुसार रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली. ४ एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे. दरम्यान, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या महावीर चौकातील एन. ए. प्रिंटर्स, सेव्हन हिल येथील जागृत पेट्रोल पंप व हर्सूल टी पाॅईंट येथील एच. पी. कंपनीचा पेट्रोल पंप सील करण्यात आले आहेत.