शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

शहराच्या नामकरणाचा कुठलाही प्रस्ताव पाठविलेला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:05 IST

विभागीय प्रशासनाचे स्पष्टीकरण : मार्च २०२० मध्येच पाठविली माहिती औरंगाबाद : शहराच्या नामकरणाचा कुठलाही प्रस्ताव अलीकडच्या काही दिवसांत केंद्र ...

विभागीय प्रशासनाचे स्पष्टीकरण : मार्च २०२० मध्येच पाठविली माहिती

औरंगाबाद : शहराच्या नामकरणाचा कुठलाही प्रस्ताव अलीकडच्या काही दिवसांत केंद्र किंवा राज्य शासनाकडे पाठविलेला नाही, असे स्पष्टीकरण विभागीय प्रशासनाने दिले. मार्च २०२० मध्येच औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करण्याबाबत सद्य:स्थिती काय आहे, याबाबत राज्य शासनाने काही माहिती प्रशासनाकडून मागविली होती. आता नव्याने काहीही माहिती मागविलेली नाही.

शहराचे नामकरण करण्याबाबत न्यायालयात असलेल्या याचिका क्रमांक ५५६५/१९९५ ची काय परिस्थिती आहे. रेल्वेचा कोणता विभाग या क्षेत्रासाठी आहे. केंद्रीय टपाल खात्याची भूमिका कशी आहे. यासह विमानतळ प्राधिकरणाची एनओसी आहे काय? मनपाचा ठराव, यासह इतर विभागाच्या एनओसीची माहिती विभागीय प्रशासनामार्फत शासनाने मागविली होती. ती माहिती तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या काळात मागविली होती. चौधरी प्रशिक्षणासाठी परदेशात असल्यामुळे तत्कालील अप्पर जिल्हाधिकारी भास्कर पालवे यांनी ती माहिती विभागीय प्रशासनाला कळविली होती. विभागीय प्रशासनाने शासनाला माहिती पाठविली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनच आलेली माहिती पुढे पाठविली, त्यात नवीन अशी कोणतही टिप्पणी विभागीय आयुक्तालयाने दिलेली नाही. विभागीय प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली होती. त्यानुसार कोर्टाची ऑर्डर कशी आहे. कोणत्या विभागाच्या एनओसी मिळालेल्या आहेत. कोणत्या बाकी आहेत. याची माहिती शासनाला कळविली आहे. केंद्र शासन अखत्यारीत असलेल्या एनओसी येथून मिळणार नाहीत. त्या केंद्राकडून मिळतील. सद्य:परिस्थिती काय आहे, हेच त्यांनी विचारले होते. शेवटचा निर्णय केंद्र शासनाचा असला तरी राज्य शासनाने माहिती मागविली होती. तो काही नामकरणाचा प्रस्ताव नव्हता, ती फक्त माहिती होती, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विभागीय प्रशासनाची माहिती अशी

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले, अशात कोणती माहिती शासनाकडून विभागीय प्रशासनाकडे आलेली नाही. अंदाजे मार्च महिन्यांत शासनाने कोर्ट व इतर एनओसीबाबत फक्त माहिती विचारली होती. ती माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संकलित केली व शासनाकडे पाठविली.