शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
6
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
7
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
8
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
9
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
10
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
11
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
12
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
13
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
14
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
15
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
16
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
17
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
18
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
19
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
20
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!

मनपाचे ई- टेंडर एनआयसीला

By admin | Updated: June 5, 2016 23:55 IST

औरंगाबाद : महापालिकेने ई-टेंडर सेवेचे दहा वर्षांपूर्वी बीओटी तत्त्वावर खाजगीकरण केले होते. बीओटीच्या कंत्राटदाराचा कालावधी समाप्त होताच मनपाने संपूर्ण सेवा स्वत: चालविण्यासाठी घेतली

औरंगाबाद : महापालिकेने ई-टेंडर सेवेचे दहा वर्षांपूर्वी बीओटी तत्त्वावर खाजगीकरण केले होते. बीओटीच्या कंत्राटदाराचा कालावधी समाप्त होताच मनपाने संपूर्ण सेवा स्वत: चालविण्यासाठी घेतली असून, शासनाच्या एनआयसी (नॅशनल इनफर्मेशन सेंटर) सोबत कनेक्ट करण्यात येत आहे. त्यामुळे ई-टेंडरमध्ये घोटाळे करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांच्या मक्तेदारीला चांगलाच लगाम लागणार आहे.महापालिकेत पूर्वी कोणत्याही विकासकामांच्या निविदा एका डब्यात जमा करण्यात येत होत्या. या प्रक्रियेमुळे कंत्राटदारांमध्ये उघडपणे रिंग होत होती. काही कंत्राटदारांना निविदा दाखल करण्यास मज्जावही करण्यात येत होता. निविदांमध्ये होणारा घोळ बंद व्हावा म्हणून दहा वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनी ई-टेंडर प्रक्रिया आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या वंश इन्फोटेक या संस्थेला दहा वर्षांसाठी ई-टेंडर यंत्रणा चालविण्याचे काम बीओटी तत्त्वावर देण्यात आले होते. एक टेंडर विकल्यावर संस्थेला ३०० रुपये देण्यात येत होते. संस्थेसोबतचा करार संपुष्टात आल्यावर मनपाने वंश इन्फोटेकचे काम थांबविले. संस्थेकडील सर्व संगणकीय साहित्य मनपाने आपल्या ताब्यात घेतले आहे. आता मनपा स्वत: ई-टेंडरची यंत्रणा सांभाळणार आहे. आॅनलाईन टेंडरची प्रक्रिया शासनाच्या एनआयसीसोबत कनेक्ट करण्यात येत असून, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांनाही आता मनपाची कामे मिळविता येतील. मागील चार दिवसांपासून या नवीन यंत्रणेची चाचणी घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ई-टेंडरमध्ये मनपाचे अधिकारी कोणाला काम द्यायचे किंवा नाही याचा निर्णय परस्पर घेत असत. कारण एकाच कंत्राटदाराची निविदा उघडायची आणि दुसऱ्यांची तांत्रिक कारणांमुळे उघडायची नाही. ही सर्व दुकानदारी आता बंद होणार आहे.नवीन सेवेचे फायदेपूर्वी मनपाचे कंत्राट खरेदी करण्यासाठी कंत्राटदारांना पैसे खर्च करावे लागत होते. आता नवीन यंत्रणेत मोफत टेंडर डाऊनलोड करून घेता येईल. ज्या कंत्राटदाराला टेंडर भरल्यानंतरही दरामुळे काम न मिळाल्यास अनामत रक्कम आपोआप आपल्या बँक खात्यात जमा होईल. एनआयसीसोबत मनपाचे ई-टेंडर सर्व्हर कनेक्ट झाल्यावर राष्ट्रीय व राज्यस्तरीय कंत्राटदारही कामे घेण्यासाठी येतील. कंत्राटदारांमध्ये जास्त स्पर्धा झाल्यास मनपाचा आर्थिक फायदा होईल. पूर्वी ई-टेंडर विभागाची सूत्रे मनपाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांकडे होती. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ही सूत्रे मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांच्याकडे सोपविली आहेत.