शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

मनपाचे ई- टेंडर एनआयसीला

By admin | Updated: June 5, 2016 23:55 IST

औरंगाबाद : महापालिकेने ई-टेंडर सेवेचे दहा वर्षांपूर्वी बीओटी तत्त्वावर खाजगीकरण केले होते. बीओटीच्या कंत्राटदाराचा कालावधी समाप्त होताच मनपाने संपूर्ण सेवा स्वत: चालविण्यासाठी घेतली

औरंगाबाद : महापालिकेने ई-टेंडर सेवेचे दहा वर्षांपूर्वी बीओटी तत्त्वावर खाजगीकरण केले होते. बीओटीच्या कंत्राटदाराचा कालावधी समाप्त होताच मनपाने संपूर्ण सेवा स्वत: चालविण्यासाठी घेतली असून, शासनाच्या एनआयसी (नॅशनल इनफर्मेशन सेंटर) सोबत कनेक्ट करण्यात येत आहे. त्यामुळे ई-टेंडरमध्ये घोटाळे करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांच्या मक्तेदारीला चांगलाच लगाम लागणार आहे.महापालिकेत पूर्वी कोणत्याही विकासकामांच्या निविदा एका डब्यात जमा करण्यात येत होत्या. या प्रक्रियेमुळे कंत्राटदारांमध्ये उघडपणे रिंग होत होती. काही कंत्राटदारांना निविदा दाखल करण्यास मज्जावही करण्यात येत होता. निविदांमध्ये होणारा घोळ बंद व्हावा म्हणून दहा वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनी ई-टेंडर प्रक्रिया आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या वंश इन्फोटेक या संस्थेला दहा वर्षांसाठी ई-टेंडर यंत्रणा चालविण्याचे काम बीओटी तत्त्वावर देण्यात आले होते. एक टेंडर विकल्यावर संस्थेला ३०० रुपये देण्यात येत होते. संस्थेसोबतचा करार संपुष्टात आल्यावर मनपाने वंश इन्फोटेकचे काम थांबविले. संस्थेकडील सर्व संगणकीय साहित्य मनपाने आपल्या ताब्यात घेतले आहे. आता मनपा स्वत: ई-टेंडरची यंत्रणा सांभाळणार आहे. आॅनलाईन टेंडरची प्रक्रिया शासनाच्या एनआयसीसोबत कनेक्ट करण्यात येत असून, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांनाही आता मनपाची कामे मिळविता येतील. मागील चार दिवसांपासून या नवीन यंत्रणेची चाचणी घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ई-टेंडरमध्ये मनपाचे अधिकारी कोणाला काम द्यायचे किंवा नाही याचा निर्णय परस्पर घेत असत. कारण एकाच कंत्राटदाराची निविदा उघडायची आणि दुसऱ्यांची तांत्रिक कारणांमुळे उघडायची नाही. ही सर्व दुकानदारी आता बंद होणार आहे.नवीन सेवेचे फायदेपूर्वी मनपाचे कंत्राट खरेदी करण्यासाठी कंत्राटदारांना पैसे खर्च करावे लागत होते. आता नवीन यंत्रणेत मोफत टेंडर डाऊनलोड करून घेता येईल. ज्या कंत्राटदाराला टेंडर भरल्यानंतरही दरामुळे काम न मिळाल्यास अनामत रक्कम आपोआप आपल्या बँक खात्यात जमा होईल. एनआयसीसोबत मनपाचे ई-टेंडर सर्व्हर कनेक्ट झाल्यावर राष्ट्रीय व राज्यस्तरीय कंत्राटदारही कामे घेण्यासाठी येतील. कंत्राटदारांमध्ये जास्त स्पर्धा झाल्यास मनपाचा आर्थिक फायदा होईल. पूर्वी ई-टेंडर विभागाची सूत्रे मनपाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांकडे होती. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ही सूत्रे मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांच्याकडे सोपविली आहेत.