शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

मनपा करणार २०० कोटींची वसुली!

By admin | Updated: April 9, 2016 00:53 IST

मुजीब देवणीकर, औरंगाबाद महापालिकेने आजपर्यंत नेहमीच तहान लागल्यानंतर विहीर खोदायचे काम केले आहे.

मुजीब देवणीकर, औरंगाबादमहापालिकेने आजपर्यंत नेहमीच तहान लागल्यानंतर विहीर खोदायचे काम केले आहे. स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द झाल्यानंतर पालिकेने मालमत्ता कर वसुलीवर अधिक भर दिला आहे. मागील १० ते १५ वर्षांमध्ये ज्या मालमत्ताधारकांनी थकबाकी भरलीच नाही, त्यांच्याकडून आता थकबाकी वसूल करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली असून, २०० कोटींहून अधिक रक्कम वसूल करण्यात येणार आहे.मागील तीन दशकांमध्ये मालमत्ता कर वसुलीकडे मनपाने कधीच लक्ष दिले नाही. जकात आणि त्यानंतर एलबीटीच्या माध्यमातून येणाऱ्या पैशांवर मनपाचा कारभार चालत होता. शासनाने एलबीटी कर वसुली बंद केल्यापासून मालमत्ता कर हा सर्वात मोठा आर्थिक स्रोत मानण्यात येत आहे. दरवर्षी डिसेंबर, जानेवारी महिन्यांत मनपाला मालमत्ता कर वसूल करण्याची आठवण येते. प्रत्येक मालमत्ताधारकाला चालू आर्थिक वर्षाची ‘डिमांड’ पाठविण्यात येते. प्रामाणिकपणे कर भरणारे नागरिक आढेवेढे न घेता कर भरून टाकतात. अनेक मालमत्ताधारक डिमांड नोटीसकडे दुर्लक्ष करतात. मालमत्ताधारकाने थकविलेल्या या रकमेची नोंद मनपा दप्तरी होते. मात्र, थकबाकीची वसुली कधीच होत नाही. थकबाकीचा हा डोंगर वर्षानुवर्षे वाढतच जातो. मागील १५ वर्षांमध्ये मालमत्ताधारकांनी किमान २०० कोटी रुपये थकविल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने बांधला आहे.प्रत्येक वॉर्ड कार्यालयातील १०० मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही यादी तयार झाल्यावर लगेचच सक्तीने वसुली करण्यात येईल. मालमत्ता सीलही करण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी वसुलीसाठी मायक्रोप्लॅनही तयार केला आहे. मनपाचा आर्थिक कणा मजबूत झाल्यास विकास कामे करता येतील, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. या दृष्टीने प्रशासन वाटचाल करीत आहे. मालमत्ता करासंदर्भात ठोस पाऊलही उचलण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.