शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मनपा करणार २०० कोटींची वसुली!

By admin | Updated: April 9, 2016 00:53 IST

मुजीब देवणीकर, औरंगाबाद महापालिकेने आजपर्यंत नेहमीच तहान लागल्यानंतर विहीर खोदायचे काम केले आहे.

मुजीब देवणीकर, औरंगाबादमहापालिकेने आजपर्यंत नेहमीच तहान लागल्यानंतर विहीर खोदायचे काम केले आहे. स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द झाल्यानंतर पालिकेने मालमत्ता कर वसुलीवर अधिक भर दिला आहे. मागील १० ते १५ वर्षांमध्ये ज्या मालमत्ताधारकांनी थकबाकी भरलीच नाही, त्यांच्याकडून आता थकबाकी वसूल करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली असून, २०० कोटींहून अधिक रक्कम वसूल करण्यात येणार आहे.मागील तीन दशकांमध्ये मालमत्ता कर वसुलीकडे मनपाने कधीच लक्ष दिले नाही. जकात आणि त्यानंतर एलबीटीच्या माध्यमातून येणाऱ्या पैशांवर मनपाचा कारभार चालत होता. शासनाने एलबीटी कर वसुली बंद केल्यापासून मालमत्ता कर हा सर्वात मोठा आर्थिक स्रोत मानण्यात येत आहे. दरवर्षी डिसेंबर, जानेवारी महिन्यांत मनपाला मालमत्ता कर वसूल करण्याची आठवण येते. प्रत्येक मालमत्ताधारकाला चालू आर्थिक वर्षाची ‘डिमांड’ पाठविण्यात येते. प्रामाणिकपणे कर भरणारे नागरिक आढेवेढे न घेता कर भरून टाकतात. अनेक मालमत्ताधारक डिमांड नोटीसकडे दुर्लक्ष करतात. मालमत्ताधारकाने थकविलेल्या या रकमेची नोंद मनपा दप्तरी होते. मात्र, थकबाकीची वसुली कधीच होत नाही. थकबाकीचा हा डोंगर वर्षानुवर्षे वाढतच जातो. मागील १५ वर्षांमध्ये मालमत्ताधारकांनी किमान २०० कोटी रुपये थकविल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने बांधला आहे.प्रत्येक वॉर्ड कार्यालयातील १०० मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही यादी तयार झाल्यावर लगेचच सक्तीने वसुली करण्यात येईल. मालमत्ता सीलही करण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी वसुलीसाठी मायक्रोप्लॅनही तयार केला आहे. मनपाचा आर्थिक कणा मजबूत झाल्यास विकास कामे करता येतील, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. या दृष्टीने प्रशासन वाटचाल करीत आहे. मालमत्ता करासंदर्भात ठोस पाऊलही उचलण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.