शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

महापालिका स्मार्ट सिटीत १०० कोटींचा वाटा टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:05 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत नियमानुसार महापालिकेला २५ टक्के वाटा म्हणजेच अडीचशे कोटी रुपये टाकावे लागणार ...

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत नियमानुसार महापालिकेला २५ टक्के वाटा म्हणजेच अडीचशे कोटी रुपये टाकावे लागणार आहेत. मागील सहा वर्षांमध्ये महापालिकेने एक रुपयाही टाकला नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने स्मार्ट सिटीतील उर्वरित निधी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मार्च २०२२ पर्यंत महापालिका १०० कोटी रुपयांचा वाटा टाकणार असल्याचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी योजना २०१५ मध्ये सुरू झाली. महापालिकेने प्रारंभी एक हजार कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. त्यानुसार केंद्र शासनाने ५०० कोटी, राज्य शासनाचे अडीच कोटी गृहीत धरण्यात आले. महापालिकेला २५ टक्के म्हणून २५० कोटी रुपयांचा वाटा टाकण्याचे निर्देश देण्यात आले. मागील काही वर्षांपासून महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. महापालिकेने आजपर्यंत स्मार्ट सिटीत एक पैसा टाकला नाही. आतापर्यंत स्मार्ट सिटीला केंद्र आणि राज्य शासनाकडून ४३० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित ३२० कोटी रुपये मिळविण्यासाठी महापालिकेला आपला वाटा टाकावा लागेल, असे निर्देश केंद्र शासनाने दिले. महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपये स्मार्ट सिटीसाठी तरतूद करण्याचा मनोदय व्यक्त केला. मागील काही दिवसांपासून लेखा विभागाकडून अत्यंत सूक्ष्मरीत्या नियोजन करण्यात येत होते. जुलै महिन्यात महापालिका तब्बल ७० कोटी रुपयांचा वाटा स्मार्ट सिटीला देणार आहे. मार्च २०२२ पर्यंत उर्वरित ३० कोटींचा निधी टाकण्यात येईल. १०० कोटी रुपये टाकल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाकडून काही प्रमाणात रक्कम प्राप्त होईल, अशी अपेक्षा पाण्डेय यांनी व्यक्त केली.