शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
6
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
7
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
8
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
9
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
10
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
11
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
12
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
13
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
14
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
15
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
16
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
17
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
18
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
19
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
20
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख

महापालिका स्मार्ट सिटीत १०० कोटींचा वाटा टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:05 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत नियमानुसार महापालिकेला २५ टक्के वाटा म्हणजेच अडीचशे कोटी रुपये टाकावे लागणार ...

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत नियमानुसार महापालिकेला २५ टक्के वाटा म्हणजेच अडीचशे कोटी रुपये टाकावे लागणार आहेत. मागील सहा वर्षांमध्ये महापालिकेने एक रुपयाही टाकला नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने स्मार्ट सिटीतील उर्वरित निधी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मार्च २०२२ पर्यंत महापालिका १०० कोटी रुपयांचा वाटा टाकणार असल्याचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी योजना २०१५ मध्ये सुरू झाली. महापालिकेने प्रारंभी एक हजार कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. त्यानुसार केंद्र शासनाने ५०० कोटी, राज्य शासनाचे अडीच कोटी गृहीत धरण्यात आले. महापालिकेला २५ टक्के म्हणून २५० कोटी रुपयांचा वाटा टाकण्याचे निर्देश देण्यात आले. मागील काही वर्षांपासून महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. महापालिकेने आजपर्यंत स्मार्ट सिटीत एक पैसा टाकला नाही. आतापर्यंत स्मार्ट सिटीला केंद्र आणि राज्य शासनाकडून ४३० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित ३२० कोटी रुपये मिळविण्यासाठी महापालिकेला आपला वाटा टाकावा लागेल, असे निर्देश केंद्र शासनाने दिले. महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपये स्मार्ट सिटीसाठी तरतूद करण्याचा मनोदय व्यक्त केला. मागील काही दिवसांपासून लेखा विभागाकडून अत्यंत सूक्ष्मरीत्या नियोजन करण्यात येत होते. जुलै महिन्यात महापालिका तब्बल ७० कोटी रुपयांचा वाटा स्मार्ट सिटीला देणार आहे. मार्च २०२२ पर्यंत उर्वरित ३० कोटींचा निधी टाकण्यात येईल. १०० कोटी रुपये टाकल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाकडून काही प्रमाणात रक्कम प्राप्त होईल, अशी अपेक्षा पाण्डेय यांनी व्यक्त केली.