शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नव्वद टक्के शेतकऱ्यांना बियाणे कंपनीकडून ठेंगा

By admin | Updated: November 10, 2014 23:57 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात यंदा खरीप पेरणीनंतर अनेक कंपन्यांचे सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी हजारो शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे केल्या होत्या

उस्मानाबाद : जिल्ह्यात यंदा खरीप पेरणीनंतर अनेक कंपन्यांचे सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी हजारो शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे केल्या होत्या. याची दखल घेत कृषी खात्याने २ हजार १९२ शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा केल्यानंतर बहुतांश ठिकाणी बियाणात दोष असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना बियाणाची किंमत अथवा बियाणे बदलून देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून संबधित कंपन्यांना देण्यात आल्या होत्या. यात केवळ २०५ शेतकऱ्यांना मदत मिळाली तर १ हजार ९८७ शेतकऱ्यांना कंपन्यानी बियाणे बदलून दिले नाहीत हे विशेष.जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र मोठया प्रमाणावर आहे. नगदी पीक म्हणून सोयाबिन या पिकाकडे पाहिले जाते. यंदाच्या हंगामात उशिराने पावसाने आगमन झाल्याने खरिपाच्या पेरण्यांनाही विलंब झाला होता. यातच त्यातच अनेक शेतकऱ्यांनी शेतात पेरलेले नामांकित कंपन्यांचे सोयाबीन बियाणेही न उगवल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. याबाबत कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होऊ लागल्यानंतर कृषी विभागाच्या वतीने तक्रार निवारण समितीकडून क्षेत्रीय पाहणी करुन न उगवलेल्या बियाणांचा पंचनामा करण्यात आला. या पाहणीवेळी बहुतांश ठिकाणी बियाणातच दोष असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना बियाणाची किंमत अथवा बियाणे बदलून देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून संबधित कंपन्यांना देण्यात आल्या होत्या. तसेच काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यास नकार दिल्याने कृषी खात्याकडून त्यांना नोटिसाही देण्यात आल्या होत्या. दरम्यान, जिल्ह्यातील ६८१ गावातून २ हजार १९२ शेतकऱ्यांनी बियाणांबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु, कृषी खात्याने दिलेल्या आदेशानुसार यातील केवळ १९५ शेतकऱ्यांना संबधित कंपन्यांनी बियाणे बदलून किंवा पैसे दिले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे अजूनही १ हजार ९८७ शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)