शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आणखी नऊ उड्डाणपूल

By admin | Updated: July 17, 2016 00:35 IST

औरंगाबाद : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जालना रस्त्यावर चार नवीन उड्डाणपूल आणि तीन भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत.

औरंगाबाद : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जालना रस्त्यावर चार नवीन उड्डाणपूल आणि तीन भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत. याबरोबरच बीड बायपास रस्त्यावरही तीन उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. जालना रोड आणि बीड बायपास यांना दोन उड्डाणपुलांनी जोडले जाणार आहे. पावसाळ्यानंतर ही कामे सुरू होऊन दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे ७५० कोटी रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या या कामांचे मराठवाडा विकास मंडळात शुक्रवारी झालेल्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. खा. चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी निधी पांडे, महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यू. जे. चामरगोरे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अलोक वार्ष्णेय यांच्यासह रेल्वे, एसटी, लष्कर, महावितरण, बीएसएनएल, एमआयडीसी, सिडको या यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. ७५० कोटी रुपयांचा निधी मंजूरजालना रोड आणि बीड बायपास रस्त्यावर उड्डाणपूल, भुयारी मार्ग यांची कामे करण्यासाठी केंद्र सरकारने ७५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. चालू महिन्याच्या अखेरीस निविदा प्रक्रियेची कागदपत्रे मान्यतेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर केली जातील. आॅगस्ट महिन्यात या कामांच्या निविदा काढल्या जातील. पावसाळा संपल्यानंतर दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.कंत्राटदार असणार ‘ग्लोबल’या कामांसाठी जागतिक स्तरावर निविदा मागविल्या जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निधीचा तुटवडा नसतो. कामाच्या प्रगतीनुसार कंत्राटदारांस दरमहा ठराविक रक्कम अदा केली जाते. त्यामुळे जागतिक पातळीवरील कंत्राटदारांचीच या कामांसाठी निवड केली जाणार आहे.असा जोडणार जालना रोड आणि बायपास४वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी जालना रोड आणि बीड बायपास जोडला जाणार आहे. सिडकोतील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून ते थेट बीड बायपासपर्यंत शहरातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधला जाईल. शिवाजीनगर ते बीड बायपास असा आणखी एक उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. हा उड्डाणपूल शिवाजीनगरातून सुरू होऊन देवळाई चौकाच्या पुढे संपणार आहे. बायपासचे ‘ग्रहण’ सुटणार४बीड बायपास रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी आणि वाढत्या अपघातांचे ग्रहण सोडण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. त्यानुसार संग्रामनगरचा उड्डाणपूल संपताच नवा उड्डाणपूल बांधला जाणार आहे. ‘एमआयटी’ महाविद्यालयासमोर दुसरा आणि झाल्टा फाट्यावर तिसरा उड्डाणपूल बांधला जाईल.आधी सर्व्हिस रोडजालना रस्त्यावरील उड्डाणपुलांची कामे हाती घेण्यापूर्वी सर्व्हिस रोडची कामे पूर्ण केली जातील. ही कामेदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार असल्याची माहिती चामरगोरे यांनी दिली. ४जालना रोडच्या रुंदीकरणासाठी चार मालमत्ता संपादित कराव्या लागतील. मालमत्ताधारकांना ‘टीडीआर’ देऊन आठवडाभरात रुंदीकरणासाठी मार्किंगचे काम हाती घेतले जाईल, असे आयुक्त बकोरिया यांनी सांगितले.