शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

दारुबंदी चळवळीचा आवाज निमाला...!

By admin | Updated: March 14, 2016 00:46 IST

संजय तिपाले , बीड ‘बाबांनो, चिल्या-पिल्याकडं बघा, माया-माऊलींकडं बघा, दारुच्या नादी कशापायी लागता?’ असा भावनिक सवाल करुन व्यसनात आकंठ बुडालेल्यांची

संजय तिपाले , बीड‘बाबांनो, चिल्या-पिल्याकडं बघा, माया-माऊलींकडं बघा, दारुच्या नादी कशापायी लागता?’ असा भावनिक सवाल करुन व्यसनात आकंठ बुडालेल्यांची ‘नशा’ उतरविणाऱ्या राहीबाई कचराप्पा धुमाळ (वय ७९) यांचे रविवारी दुपारी अडीच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील दारुबंदीची चळवळ पोरकी झाली आहे.काळेगाव (हवेली) ता. बीड येथे वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी दारुची बाटली आडवी करुन अनेकांचे संसार सावरले होते. त्यानंतर त्यांनी चौसाळा, पिंपळनेर आदी गावांत दारुबंदीसाठी लढा उभारला होता;परंतु यात त्यांना यश मिळाले नव्हते, याची सल त्यांना शेवटपर्यंत जाणवत होती. राहीबाई हे नाव सर्वसामान्य;परंतु दारुबंदीचे नाव जरी निघाले तर त्यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख होतो, एवढे सगळे योगदान त्यांनी दिले होते. इतर महिलांप्रमाणेच त्या देखील आपल्या संसारात रममाण होत्या. पती, दोन विवाहित मुली, संग्राम, रमेश व रंजीत ही तीन मुले, सुना, नातवंडे अशा गोकुळात त्या वावरत होत्या. अख्खे कुटुंब शेतीत राबणारे, त्यांना स्वत:ला पुरेशी अक्षरओळखही नव्हती; परंतु त्या दारुबंदीच्या लढ्यात रणरागिणी बनून पुढे आल्या त्याला कारणही तसेच होते. त्यांच्या एका मुलाला दारुचे व्यसन लागले अन् घरातील शांतता भंग पावली. त्यामुळे राहीबाई व्यथित झाल्या. त्यांनी ठरवले माझ्या मुलासह अख्खे गाव दारुमुक्त करायचे. मात्र, पहिला विरोध झाला तो त्यांच्या घरातून! त्यांनी हिंमत केली, घराबाहेर पडल्या;पण पुढे नियमांचा अडसर आला. कारण गावातील दारुच्या दुकानाला परवाना होता. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय ते पिंपळनेर ठाणे, उत्पादन शुल्क कार्यालय, व जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले. कोणाला भेटायचे? अर्ज कसा करायचा? हे त्यांना माहीत नव्हते. तरीही त्या थकल्या नाहीत की हरल्याही नाहीत. कपाळावर ठसठसीत कुंकू, अंगात सुती पातळ, पायात तुटक्या चपला अशा साध्या राहणीमानातील राहीबाई रणरागिणी कधी बनल्या ते कळलेही नाही. कधी तिकिटाला पैसे आहेत तर झेरॉक्सला नाहीत अशा अनंत अडचणींना त्यांनी हिंमतीने तोंड दिले. अखेर प्रशासनाला झुकावे लागले अन् दारुबंदीसाठी मतदान घेण्यास त्यांनी भाग पाडले. घरोघर जाऊन महिलांची विणवणी केली, अन् दारुबंदीच्या लढ्यात विजय मिळविला. तत्कालीन जिल्हाधिकारी भारत सासणे यांनी गावात जाऊन राहीबार्इंचे कौतूक केले होते. हळव्या स्वभावाच्या राहीबाई...दारुबंदीच्या चळवळीशी कायमच्या जोडल्या गेलेल्या राहीबाई धुमाळ यांचे नाव प्रत्येक ठिकाणी आदराने घेतले जाई. दारु कशी घातक आहे हे त्या पोटतिडकीने सांगत. हळव्या स्वभावाच्या राहीबार्इंना अनेकदा अश्रू अनावर होत. उपस्थितांमध्ये दारुविरुद्ध चीड निर्माण करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती.शासनदरबारी उपेक्षाच !आयुष्याच्या सायंकाळी दारुबंदीविरुद्ध एल्गार पुकारणाऱ्या राहीबाई यांच्या पदरी शासनदरबारी मात्र उपेक्षाच पडली. दारुबंदीचा अवघड डोंगर सर करताना पावलोपावली नियमावर बोट ठेवणाऱ्या सरकारीबाबूंनी त्यांची शिफारस शासकीय पुरस्कारासाठी करणे तर दूरच;पण त्यांच्या लढ्याला बळ देण्याची तसदीही घेतली नाही. मनाने तरुण पण वयाने थकलेल्या राहीबाई हातात खुरपे घेऊन शेतात राबायच्या. त्यांना दम्याने गाठले होते. उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला.