शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

जिल्हा परिषदेत पडेल नवीन आठ गटांची भर

By admin | Updated: June 22, 2016 00:56 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा तर दोन ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्यामुळे आगामी जिल्हा परिषद

औरंगाबाद : जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा तर दोन ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला गटांची पुनर्रचना करावी लागणार आहे. सध्या जिल्हा परिषदेतून चार गट कमी झाले असले तरी मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये नव्याने किमान ८ गटांची भर पडेल, अशी शक्यता सदस्यांनी व्यक्त केली आहे. वर्षभरापूर्वी सोयगाव आणि फुलंब्री या दोन ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा मिळाला. दुसरीकडे, चार-पाच महिन्यांपूर्वी औरंगाबाद शहरालगत सातारा आणि देवळाई या दोन ग्रामपंचायती महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला गटांची पुनर्रचना करावीच लागेल. मागील निवडणुकीत सदस्यांचे आरक्षण आॅगस्टमध्ये जाहीर झाले होते. त्यामुळे फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी गटांचे आरक्षणही आॅगस्टमध्ये जाहीर होऊ शकते. सध्या औरंगाबाद जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६० आहे. अलीकडेच जिल्ह्यातील फुलंब्री आणि सोयगाव या दोन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळाला तर सातारा आणि देवळाई हे दोन गट महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे आगामी जि.प. निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे हे चार गट वगळले जातील. दुसरीकडे, सन २0११च्या जनगणनेनुसार जि.प. गटांसाठी आरक्षणाची सोडत निघाल्यास बाशिंग बांधून बसलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे राजकारण धोक्यात येऊ शकते. निवडणूक आयोगाला फुलंब्री, सोयगाव, देवळाई आणि सातारा या चार गटांची लोकसंख्या जिल्हा परिषद मतदारसंघातून वगळावी लागणार आहे. दुसरीकडे बऱ्याच गटांमध्ये लोकसंख्याही वाढलेली आहे. त्यामुळे मतदारसंघाची पुनर्रचना केल्यास नव्याने किमान ८ गट अस्तित्वात येतील. परिणामी, निवडणुकीनंतर ६४ सदस्य जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय होतील, असा कयासही सदस्यांनी बांधला आहेत, असे असले तरी जिल्हा निवडणूक विभागाने मात्र, यावर तूर्त बोलण्यास नकार दिला. निवडणूक आयोगाकडून अद्याप तरी गटांच्या पुनर्रचनेबद्दल कसल्याही सूचना नसल्याचे अधिकारी म्हणतात.नुकतेच सोडत पद्धतीने जि.प. अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. आगामी निवडणुकीनंतर औरंगाबाद जि.प.चे अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी (मार्च २०१७ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत अडीच वर्षांसाठी) राखीव असेल. मार्च २०१२ मध्ये अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव होते. अडीच वर्षांच्या खंडानंतर पुन्हा अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठीच राखीव झाले. त्यामुळे आरक्षण जाहीर करताना रोटेशन पाळले नसल्याची प्रतिक्रिया विद्यमान काही सदस्यांनी व्यक्त केली.