शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नवे २५ फौजदार, २५० जवान रुजू

By admin | Updated: June 16, 2016 00:16 IST

औरंगाबाद : २०१४ साली भरती झालेले सुमारे २५० पोलीस शिपाई एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून नव्याने पोलीस आयुक्तालयात नव्याने दाखल झाले आहेत.

औरंगाबाद : २०१४ साली भरती झालेले सुमारे २५० पोलीस शिपाई एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून नव्याने पोलीस आयुक्तालयात नव्याने दाखल झाले आहेत. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन आलेले २५ परीविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पोलीस आयुक्तालयात रुजू झाले आहेत. नव्याने दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे आयुक्तालयाचे मनुष्यबळ ३ हजार ५१७ झाले आहे.देशातील प्रमुख पर्यटन केंद्रापैकी एक असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराची लोकसंख्या १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच शहराचा चोहोबाजूने विस्तार होत आहे. विविध औद्योगिक वसाहतींसोबतच दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची यात भर पडली आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालयांतर्गत तीन पोलीस उपायुक्त, पाच सहायक पोलीस आयुक्त, ३५ पोलीस निरीक्षक आणि ५५ पोलीस उपनिरीक्षक, १५ पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल आणि विशेष शाखा कार्यरत आहे. दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रात्रंदिवस चार्ली पोलीस दुचाकीवर शहराच्या वेगवेगळ्या भागांत गस्तीवर असतात. त्यासोबतच पोलीस कं ट्रोल रूम मोबाईल या वातानुकू लित वाहनामधून गस्त सुरू करण्यात आली. या गस्तीमुळे शहरातील रस्त्यावरील मंगळसूत्र चोरीचे गुन्हे कमी झाले आहेत. पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध ठाण्यांत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असतात. त्यामुळे दरवर्षी भरतीचे आयोजन करण्यात येते. २०१४ साली भरती झालेले २५० पोलीस शिपाई नुकतेच प्रशिक्षण पूर्ण करून रुजू झाले. पोलीस आयुक्तालयात २५ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक रुजू झाले आहेत. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलीस उपनिरीक्षकांना राज्यातील विविध विभागांत नेमणुका देण्यात आल्या आहेत. १२ फौजदारांची पदावनतीपोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यांत कार्यरत असलेल्या १२ फौजदारांना १४ जून रोजी तडकाफडकी पदावनत करून सहायक फौजदार या मूळ पदावर त्यांना पदस्थापना देण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या या पदावनतीने फौजदारांमध्ये खळबळ उडाली आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत मंजूर एकूण पदांपैकी निम्मी पदे ही सरळसेवा भरती प्र्रक्रियेंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येतात. तर उर्वरित खात्यांतर्गत बढती देऊन भरली जातात. रिक्त असलेल्या एकूण ४२ पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार सहायक पोलीस उपनिरीक्षकांना तात्पुरत्या बढत्या देण्यात आल्या होत्या. २५ ताज्या दमाचे फौजदार आयुक्तालयात रुजू झाले. या फौजदारांना विविध ठिकाणी नेमणुका देण्यात येत आहेत. त्यांना नेमणुका देण्यासाठी पदे रिक्त करणे आवश्यक होते. म्हणून या पदावनती झाल्या.