शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नवे २५ फौजदार, २५० जवान रुजू

By admin | Updated: June 16, 2016 00:16 IST

औरंगाबाद : २०१४ साली भरती झालेले सुमारे २५० पोलीस शिपाई एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून नव्याने पोलीस आयुक्तालयात नव्याने दाखल झाले आहेत.

औरंगाबाद : २०१४ साली भरती झालेले सुमारे २५० पोलीस शिपाई एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून नव्याने पोलीस आयुक्तालयात नव्याने दाखल झाले आहेत. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन आलेले २५ परीविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पोलीस आयुक्तालयात रुजू झाले आहेत. नव्याने दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे आयुक्तालयाचे मनुष्यबळ ३ हजार ५१७ झाले आहे.देशातील प्रमुख पर्यटन केंद्रापैकी एक असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराची लोकसंख्या १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच शहराचा चोहोबाजूने विस्तार होत आहे. विविध औद्योगिक वसाहतींसोबतच दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची यात भर पडली आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालयांतर्गत तीन पोलीस उपायुक्त, पाच सहायक पोलीस आयुक्त, ३५ पोलीस निरीक्षक आणि ५५ पोलीस उपनिरीक्षक, १५ पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल आणि विशेष शाखा कार्यरत आहे. दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रात्रंदिवस चार्ली पोलीस दुचाकीवर शहराच्या वेगवेगळ्या भागांत गस्तीवर असतात. त्यासोबतच पोलीस कं ट्रोल रूम मोबाईल या वातानुकू लित वाहनामधून गस्त सुरू करण्यात आली. या गस्तीमुळे शहरातील रस्त्यावरील मंगळसूत्र चोरीचे गुन्हे कमी झाले आहेत. पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध ठाण्यांत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असतात. त्यामुळे दरवर्षी भरतीचे आयोजन करण्यात येते. २०१४ साली भरती झालेले २५० पोलीस शिपाई नुकतेच प्रशिक्षण पूर्ण करून रुजू झाले. पोलीस आयुक्तालयात २५ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक रुजू झाले आहेत. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलीस उपनिरीक्षकांना राज्यातील विविध विभागांत नेमणुका देण्यात आल्या आहेत. १२ फौजदारांची पदावनतीपोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यांत कार्यरत असलेल्या १२ फौजदारांना १४ जून रोजी तडकाफडकी पदावनत करून सहायक फौजदार या मूळ पदावर त्यांना पदस्थापना देण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या या पदावनतीने फौजदारांमध्ये खळबळ उडाली आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत मंजूर एकूण पदांपैकी निम्मी पदे ही सरळसेवा भरती प्र्रक्रियेंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येतात. तर उर्वरित खात्यांतर्गत बढती देऊन भरली जातात. रिक्त असलेल्या एकूण ४२ पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार सहायक पोलीस उपनिरीक्षकांना तात्पुरत्या बढत्या देण्यात आल्या होत्या. २५ ताज्या दमाचे फौजदार आयुक्तालयात रुजू झाले. या फौजदारांना विविध ठिकाणी नेमणुका देण्यात येत आहेत. त्यांना नेमणुका देण्यासाठी पदे रिक्त करणे आवश्यक होते. म्हणून या पदावनती झाल्या.