शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या शासकीय कर्करोग रुग्णालयाने दिली हजारो रुग्णांना नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 11:43 IST

शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्था सातव्या वर्षांत पदार्पण करीत आहे.

ठळक मुद्दे२००८ मध्ये रुग्णालयाला मंजुरी मिळाली आणि २१ सप्टेंबर २०१२ रोजी हे रुग्णालय रुग्णसेवेत दाखल झाले.औरंगाबादेत कर्क रोग रुग्णालय सुरू झाले आणि आता अर्ध्या राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी ते आता आशेचा किरण ठरत आहे.

औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्था सातव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून कर्करोगाचे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. अर्ध्या महाराष्ट्रातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी हे रुग्णालय आधारवड आणि नवसंजीवनी देणारे ठरत असून, ६ वर्षांच्या कालावधीत हजारो रुग्णांना येथील उपचारामुळे नवे जीवन मिळाले आहे.

घाटी रुग्णालयातील किरणोपचार विभागात कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार होत असताना रुग्णांसोबत अनेकदा त्यांचे नातेवाईकही घाटीच्या आवारात फुटपाथवर थांबलेले दिसत. कॅन्सर रुग्णांसाठी शासन स्तरावर केवळ मुंबईमध्ये रुग्णालय होते. त्यामुळे मुंबईला जाण्याची नामुष्की गोरगरिबांवर ओढावत होती. कर्करोगाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय औरंगाबादेत उभारावे, यासाठी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आणि मंजूर करून घेतला. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आमखास मैदानासमोरील जागाही मिळवून दिली. २००८ मध्ये रुग्णालयाला मंजुरी मिळाली आणि २१ सप्टेंबर २०१२ रोजी हे रुग्णालय रुग्णसेवेत दाखल झाले.

औरंगाबादेत कर्क रोग रुग्णालय सुरू झाले आणि आता अर्ध्या राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी ते आता आशेचा किरण ठरत आहे. रुग्णालयात मराठवाड्यासह धुळे, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, अहमदनगर, जळगाव,नाशिकसह १८ ते १९ जिल्ह्यांतून रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन रुग्णसेवेत भर पडत आहे.

रुग्णसंख्या २२ हजारांवरून ४७ हजारांवररुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात २०१३ मध्ये २२ हजार १२० रुग्णांवर उपचार क रण्यात आले. ही संख्या दरवर्षी वाढून २०१७ मध्ये ४७ हजार २२४ इतक्यावर पोहोचली. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे पुरुषांमध्ये मुखकर्करोगाचे प्रमाण अधिक आहे, तर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

रुग्णालयाची प्रगतीसहा वर्षांत रुग्णालयाची मोठी प्रगती झाली आहे. विस्तार होऊन राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा सुरूआहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार होत आहेत.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

अर्ध्या महाराष्ट्रातून रुग्णरुग्णालयात उपचारासाठी अर्ध्या महाराष्ट्रातून म्हणजे १८ ते १९ जिल्ह्यांतून रुग्ण येतात. राज्य कर्करोग रुग्णालयाच्या दर्जामुळे आगामी कालावधीत अद्ययावत यंत्रे दाखल होतील. त्यामुळे आणखी चांगली रुग्णसेवा देता येईल.- डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्यअधिकारी, शासकीय कर्करोग रुग्णालय

आकडेवारीत राज्य कर्करोग संस्थेचा आढावा : (२१ सप्टेंबर २०१२ ते ३० आॅगस्ट २०१८)बाह्यरुग्ण विभाग - २ लाख १२ हजार १६६आंतररुग्ण विभाग- २४ हजार ४४१लिनिअर एस्केलेटर - ४ हजार ८७कोबाल्ट युनिट - १ हजार ४२२ब्रेकी थेरपी - १ हजार ५३२डे केअर केमोथेरपी - ३८ हजार ४८४मोठ्या शस्त्रक्रिया - ४ हजार २३२छोट्या शस्त्रक्रिया - ३ हजार ६५

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य