शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

शहराची आपत्ती निवारण व्यवस्थापन टीम हवी

By admin | Updated: August 31, 2014 00:42 IST

नजीर शेख, औरंगाबाद शहराचे नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच अपघात आणि आग, असे धोके लक्षात घेऊन शहरातील नागरिकांनीच एकत्र येऊन ‘सिटी डिझास्टर मॅनेजमेंट टीम’ तयार करायला हवी.

नजीर शेख, औरंगाबादशहराचे नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच अपघात आणि आग, असे धोके लक्षात घेऊन शहरातील नागरिकांनीच एकत्र येऊन ‘सिटी डिझास्टर मॅनेजमेंट टीम’ तयार करायला हवी. स्वयंप्रेरित अशा किमान पाच हजार नागरिकांचा ‘टास्क फोर्स’ निर्माण करण्याची गरज असल्याचे मत विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातील प्रा. डॉ. पी. एस. वक्ते यांनी व्यक्त केले.‘माझ्या शहरात काय हवे’ यासंदर्भात डॉ. वक्तेयांनी आपल्या मुद्यांचे विश्लेषण करताना सांगितले की, आपल्या शहरात चांगल्या गोष्टी याव्यात याबाबत दुमत नाही. त्या येणे आवश्यकच आहे. या शहराचे नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे. काही दिवसांपूर्वी शेंद्रा येथे एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीचे वृत्त मी वर्तमानपत्रातून वाचले. महापालिकेचे अग्निशमन पथक किंवा इतर यंत्रणा तेथे पोहोचली. अशी यंत्रणा असली तरी येत्या काही काळात शहराचा होणारा विस्तार आपण लक्षात घेतला पाहिजे. विविध कंपन्या दाखल होतील. औद्योगिक क्षेत्रातील संभाव्य धोके लक्षात घेतले पाहिजेत. केवळ औद्योगिक क्षेत्रच नव्हे तर विविध प्रकारचे अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर काय संकटे येतील हे सांगता येत नाही. यासाठी आपल्या शहराची ‘सिटी डिझास्टर मॅनेजमेंट टीम’ असायला हवी. या टीममध्ये शहरातील युवक, युवती, महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, शिक्षक, निवृत्त जवान, पोलीस, डॉक्टर्स, अभियंते, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ, विविध तांत्रिक ज्ञान असणारी मंडळी, शासकीय अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम क्षेत्रातील जाणकार, इलेक्ट्रिक, प्लम्बिंग आदी विविध क्षेत्रातील नागरिकांचा समावेश असावा. या टीमची विभागणी आपल्याला शहराच्या विविध भागातही करता येऊ शकते. म्हणजे सेक्टरनिहाय ही टीम असू शकते. टीममधील सर्व सदस्यांचे मोबाईल फोन, ई-मेल आणि ती व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, असा डाटा जमा करता येऊ शकतो. सध्या मोबाईल, विविध अ‍ॅप्स, ई- मेल आणि संपर्काची विविध साधने निर्माण झाली आहेत. आपत्तीच्या प्रसंगी या साधनांचा वापर करून आवश्यक तितक्या लोकांना तेथे पाचारण करू शकतो. औद्योगिक क्षेत्रात तर प्रत्येक कंपनीनिहाय चार पाच व्यक्तींचा ग्रुप तयार करता येऊ शकतो. त्यातून औद्योगिक क्षेत्राचीही एक ‘डिझास्टर मॅनेजमेंट टीम’ तयार होऊ शकते.सुमारे पाच हजार नागरिकांचे आपत्ती निवारणासंबंधीचे प्रशिक्षणही व्हायला हवे. हे काम आव्हानात्मक आहे. परंतु सीएमआयएसारख्या किंवा इतर दोन-तीन संस्थांनी पुढाकार घेतल्यास हे सहज शक्य आहे. आपल्या शहराने आपल्याला खूप काही दिले. आपणही शहरासाठी काही करायला हवे, या जाणिवेतून ही आपत्ती निवारण टीम तयार करायला हवी.