शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

जि.प.साठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी ?

By admin | Updated: January 15, 2017 01:10 IST

लातूर : काँग्रसे आणि राष्ट्रवादीच्या बिघाडीच्या चर्चा दररोज कानावर राज्यभरातून येत आहेत

लातूर : काँग्रसे आणि राष्ट्रवादीच्या बिघाडीच्या चर्चा दररोज कानावर राज्यभरातून येत आहेत. मात्र भाजपाचा वारु रोखायला लातूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकीचा मंत्र घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आघाडीचा निर्णय हा जवळपास ठरला असून आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांची सोमवारी ‘आशियाना’वर अंतिम बैठक होणार असल्याचे सूत्राने सांगितले. माजी मंत्री तथा आमदार दिलीपराव देशमुख यांनी लातूर जिल्हा परिषदेवर फडकणारा काँग्रेसचा झेंडा अबाधित ठेवण्यासाठी चाली रचण्याला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जिल्ह्यात आघाडी करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडल्याचे दिसते आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापसात संवादी भूमिका ठेवून प्राथमिक बोलणी केली आहेत. रविवारी दिवसभर प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापली मते मांडणार आहेत. यानंतर उद्या सोमवारी आशियानावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आघाडीबाबत अंतिम बोलणी होणार आहे. कामगार कल्याण मंत्री संभाजीराव पाटील यांनी भाजपात आमदार विनायकराव पाटील यांना घेऊन भाजपाला एका तालुका जोडला. त्यामुळे जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली आहे. आधीच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने आघाडी घेतल्याने मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसते आहे.प्राथमिक बोलणी यशस्वी झाली आहे. आता जागा वाटप होऊन आघाडीवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत दुजोरा देण्यास दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी नकार दिला. आमचे ठरले की पत्रकार परिषद घेऊन सांगतो अशी प्रतिक्रिया एका राष्ट्रवादीच्या नेत्याने दिली. परंतु, त्यांनी नकारही दिला नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता वाढली आहे. या निर्णयाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे़