शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी’कडून १०२ शेतकऱ्यांना प्रत्येकी १५ हजारांची मदत

By admin | Updated: May 31, 2016 00:09 IST

लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल वेल्फेअर विभागाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांंना रोख मदत देण्यात आली.

लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल वेल्फेअर विभागाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांंना रोख मदत देण्यात आली. लातूर जिल्ह्यातील १०२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना खरीप पेरणीसाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप सोमवारी करण्यात आले. मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात धनादेशाचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मंचावर माजी खा.डॉ.जनार्दन वाघमारे, आ. विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डी.एन. शेळके, बस्वराज पाटील नागराळकर, प्रा.एन.बी. शेख, अशोक गोविंदपूरकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भाग्यश्री क्षीरसागर, रेखा कदम, आशा भिसे, युवक अध्यक्ष चंदन पाटील, प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले, केंद्रात व राज्यात आलेले भाजपाचे सरकार शेतकरी विरोधी आहे. दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय झालेला नाही. देशाचे पंतप्रधान साडेसातशे दिवसांपैकी चारशे दिवस विदेश दौऱ्यावरच आहेत. महाराष्ट्र शासनाकडूनही दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला गेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक विभाग आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाऊन आला आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त १०२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना उद्याच्या पेरणीसाठी प्रत्येकी १५ हजारांची मदत दिली आहे. (प्रतिनिधी)