शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पक्षांकडून ‘शेकाप’चे ‘हायजॅक’

By admin | Updated: September 30, 2014 01:30 IST

औरंगाबाद : जवळपास सर्वच राष्ट्रीय पक्षांनी पुरोगामी चळवळीचा पुरस्कार करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे कार्यक्रम ‘हायजॅक’ केल्यामुळेच आज हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार झाला आहे,

औरंगाबाद : जवळपास सर्वच राष्ट्रीय पक्षांनी पुरोगामी चळवळीचा पुरस्कार करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे कार्यक्रम ‘हायजॅक’ केल्यामुळेच आज हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार झाला आहे, अशी भूमिका उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचे (वाशी) प्रा. अभिमान माने यांनी मांडली. प्रा. अभिमान माने यांनी ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील शेतकरी कामगार पक्षाची भूमिका’ या विषयावर शोधप्रबंध पूर्ण केला. आज सोमवारी शोधप्रबंधावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात त्यांची खुली मुलाखत (ओपन व्हायवा) झाली.यावेळी प्रा. माने यांचे मार्गदर्शक म्हणून डॉ. विठ्ठल मोरे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. वाघमारे, बाह्य परीक्षक म्हणून डॉ. व्ही. एल. एरंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलाखतीमध्ये उपस्थित विद्यार्थी व परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिल्यानंतर विद्यापीठाने त्यांचा शोधप्रबंध स्वीकारला. त्यानंतर विद्यापीठाने प्रा. अभिमान माने यांना पीएच.डी. प्रदान केली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रा. माने यांना थेट प्रश्न केला की, महाराष्ट्राच्या राजकारणातून शेतकरी कामगार पक्ष हा निष्प्रभ झाला आहे. त्याच्या ऱ्हासाची कारणे कोणती? त्यावर ते म्हणाले, प्रामुख्याने १९९० नंतरपासून शेकाप हा महाराष्ट्राच्या राजकारणातून नामशेष होत गेला. १९९० मध्ये देशाने मंडल आयोग स्वीकारला. त्यानंतर देशभरात जातीय दंगलीचे लोण उसळले. तेव्हापासूनच राजकारणामध्ये हिंदुत्वावादी पक्षांचा शिरकाव झाला. तत्पूर्वी, फुले, शाहू, आंबेडकरी विचार घेऊन शेकापने लोकांच्या प्रश्नांवर चळवळ उभारली. अनेकदा संघर्ष केला. त्यातून सरकारला अनेक योजना स्वीकारणे भाग पडले. अलीकडे प्रस्थापित भाजपा, काँग्रेस व तत्सम राष्ट्रीय पक्षांनी उदारीकरण, मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले. प्रतिगामी विचाराचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणून भाजपाची ओळख आहे. या पक्षाने भांडवलदाराची भूमिका घेतली आहे. असे असले तरी या पक्षाने पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरूण सत्तेचे समीकरणे जुळवली आहेत. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षाने शेकापचे सारेच कार्यक्रम ‘हायजॅक’ केले. शिवाय, शेकापचे पक्षांतर्गत वैचारिक मतभेद, या बाबीमुळे शेकाप हा राजकारणातून नामशेष होत गेला. शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकऱ्यांना मुक्त आर्थिक धोरण मारक आहे. शेकापने या धोरणाला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. या धोरणाच्या विरोधात व लोकप्रश्नांवर राज्यातील समविचारी डाव्या पक्षांना बरोबर घेऊन शेकापला महाराष्ट्रात तिसरा पर्याय निर्माण करण्याची संधी आहे, असा निष्कर्ष पीएच.डी. प्राप्त प्रा. अभिमान माने यांनी मांडला.