शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

राष्ट्रीय पक्षांकडून ‘शेकाप’चे ‘हायजॅक’

By admin | Updated: September 30, 2014 01:30 IST

औरंगाबाद : जवळपास सर्वच राष्ट्रीय पक्षांनी पुरोगामी चळवळीचा पुरस्कार करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे कार्यक्रम ‘हायजॅक’ केल्यामुळेच आज हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार झाला आहे,

औरंगाबाद : जवळपास सर्वच राष्ट्रीय पक्षांनी पुरोगामी चळवळीचा पुरस्कार करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे कार्यक्रम ‘हायजॅक’ केल्यामुळेच आज हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार झाला आहे, अशी भूमिका उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचे (वाशी) प्रा. अभिमान माने यांनी मांडली. प्रा. अभिमान माने यांनी ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील शेतकरी कामगार पक्षाची भूमिका’ या विषयावर शोधप्रबंध पूर्ण केला. आज सोमवारी शोधप्रबंधावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात त्यांची खुली मुलाखत (ओपन व्हायवा) झाली.यावेळी प्रा. माने यांचे मार्गदर्शक म्हणून डॉ. विठ्ठल मोरे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. वाघमारे, बाह्य परीक्षक म्हणून डॉ. व्ही. एल. एरंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलाखतीमध्ये उपस्थित विद्यार्थी व परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिल्यानंतर विद्यापीठाने त्यांचा शोधप्रबंध स्वीकारला. त्यानंतर विद्यापीठाने प्रा. अभिमान माने यांना पीएच.डी. प्रदान केली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रा. माने यांना थेट प्रश्न केला की, महाराष्ट्राच्या राजकारणातून शेतकरी कामगार पक्ष हा निष्प्रभ झाला आहे. त्याच्या ऱ्हासाची कारणे कोणती? त्यावर ते म्हणाले, प्रामुख्याने १९९० नंतरपासून शेकाप हा महाराष्ट्राच्या राजकारणातून नामशेष होत गेला. १९९० मध्ये देशाने मंडल आयोग स्वीकारला. त्यानंतर देशभरात जातीय दंगलीचे लोण उसळले. तेव्हापासूनच राजकारणामध्ये हिंदुत्वावादी पक्षांचा शिरकाव झाला. तत्पूर्वी, फुले, शाहू, आंबेडकरी विचार घेऊन शेकापने लोकांच्या प्रश्नांवर चळवळ उभारली. अनेकदा संघर्ष केला. त्यातून सरकारला अनेक योजना स्वीकारणे भाग पडले. अलीकडे प्रस्थापित भाजपा, काँग्रेस व तत्सम राष्ट्रीय पक्षांनी उदारीकरण, मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले. प्रतिगामी विचाराचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणून भाजपाची ओळख आहे. या पक्षाने भांडवलदाराची भूमिका घेतली आहे. असे असले तरी या पक्षाने पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरूण सत्तेचे समीकरणे जुळवली आहेत. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षाने शेकापचे सारेच कार्यक्रम ‘हायजॅक’ केले. शिवाय, शेकापचे पक्षांतर्गत वैचारिक मतभेद, या बाबीमुळे शेकाप हा राजकारणातून नामशेष होत गेला. शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकऱ्यांना मुक्त आर्थिक धोरण मारक आहे. शेकापने या धोरणाला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. या धोरणाच्या विरोधात व लोकप्रश्नांवर राज्यातील समविचारी डाव्या पक्षांना बरोबर घेऊन शेकापला महाराष्ट्रात तिसरा पर्याय निर्माण करण्याची संधी आहे, असा निष्कर्ष पीएच.डी. प्राप्त प्रा. अभिमान माने यांनी मांडला.