शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पक्षांकडून ‘शेकाप’चे ‘हायजॅक’

By admin | Updated: September 30, 2014 01:30 IST

औरंगाबाद : जवळपास सर्वच राष्ट्रीय पक्षांनी पुरोगामी चळवळीचा पुरस्कार करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे कार्यक्रम ‘हायजॅक’ केल्यामुळेच आज हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार झाला आहे,

औरंगाबाद : जवळपास सर्वच राष्ट्रीय पक्षांनी पुरोगामी चळवळीचा पुरस्कार करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे कार्यक्रम ‘हायजॅक’ केल्यामुळेच आज हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार झाला आहे, अशी भूमिका उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचे (वाशी) प्रा. अभिमान माने यांनी मांडली. प्रा. अभिमान माने यांनी ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील शेतकरी कामगार पक्षाची भूमिका’ या विषयावर शोधप्रबंध पूर्ण केला. आज सोमवारी शोधप्रबंधावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात त्यांची खुली मुलाखत (ओपन व्हायवा) झाली.यावेळी प्रा. माने यांचे मार्गदर्शक म्हणून डॉ. विठ्ठल मोरे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. वाघमारे, बाह्य परीक्षक म्हणून डॉ. व्ही. एल. एरंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलाखतीमध्ये उपस्थित विद्यार्थी व परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिल्यानंतर विद्यापीठाने त्यांचा शोधप्रबंध स्वीकारला. त्यानंतर विद्यापीठाने प्रा. अभिमान माने यांना पीएच.डी. प्रदान केली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रा. माने यांना थेट प्रश्न केला की, महाराष्ट्राच्या राजकारणातून शेतकरी कामगार पक्ष हा निष्प्रभ झाला आहे. त्याच्या ऱ्हासाची कारणे कोणती? त्यावर ते म्हणाले, प्रामुख्याने १९९० नंतरपासून शेकाप हा महाराष्ट्राच्या राजकारणातून नामशेष होत गेला. १९९० मध्ये देशाने मंडल आयोग स्वीकारला. त्यानंतर देशभरात जातीय दंगलीचे लोण उसळले. तेव्हापासूनच राजकारणामध्ये हिंदुत्वावादी पक्षांचा शिरकाव झाला. तत्पूर्वी, फुले, शाहू, आंबेडकरी विचार घेऊन शेकापने लोकांच्या प्रश्नांवर चळवळ उभारली. अनेकदा संघर्ष केला. त्यातून सरकारला अनेक योजना स्वीकारणे भाग पडले. अलीकडे प्रस्थापित भाजपा, काँग्रेस व तत्सम राष्ट्रीय पक्षांनी उदारीकरण, मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले. प्रतिगामी विचाराचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणून भाजपाची ओळख आहे. या पक्षाने भांडवलदाराची भूमिका घेतली आहे. असे असले तरी या पक्षाने पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरूण सत्तेचे समीकरणे जुळवली आहेत. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षाने शेकापचे सारेच कार्यक्रम ‘हायजॅक’ केले. शिवाय, शेकापचे पक्षांतर्गत वैचारिक मतभेद, या बाबीमुळे शेकाप हा राजकारणातून नामशेष होत गेला. शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकऱ्यांना मुक्त आर्थिक धोरण मारक आहे. शेकापने या धोरणाला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. या धोरणाच्या विरोधात व लोकप्रश्नांवर राज्यातील समविचारी डाव्या पक्षांना बरोबर घेऊन शेकापला महाराष्ट्रात तिसरा पर्याय निर्माण करण्याची संधी आहे, असा निष्कर्ष पीएच.डी. प्राप्त प्रा. अभिमान माने यांनी मांडला.