शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:52 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१ चे रुंदीकरण करण्यासाठी भूसंपदानाची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे येत्या काही वर्षांत वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या हा महामार्ग खड्ड्यांनी इतका व्यापला की रोजच अपघात घडत आहेत. यात अनेकांचे बळी गेले अन् वाहतूक कोंडीचेही नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१ चे रुंदीकरण करण्यासाठी भूसंपदानाची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे येत्या काही वर्षांत वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या हा महामार्ग खड्ड्यांनी इतका व्यापला की रोजच अपघात घडत आहेत. यात अनेकांचे बळी गेले अन् वाहतूक कोंडीचेही नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत.दहा ते पंधरा दिवसांपूर्वी लागोपाठ पाच दिवस अपघातामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडले होते. त्यात एका अपघातात एकाचा बळीही गेला. मात्र मागील सहा महिन्यांत किमान दहा ते पंधरा जण कनेरगाव ते वारंगा रस्त्यावरील अपघातात दगावले आहेत. या रस्त्याला साईडपट्ट्या नाहीत अन् रस्ताही अरुंद आहे. साईड देताना जराही गल्लत झाली की, ट्रक थेट आडवाच होतो. त्यातही सोळा, अठरा व चोवीस टायरचे ट्रकही या मार्गावरून धावतात. त्यांची लांबी इतकी असते की, रस्ताच व्यापतो. त्यामुळे एका रात्री तब्बल चौदा तास वाहतूक खोळंबा सोसण्याची वेळ प्रवाशांवर आली होती. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने साईडपट्ट्यांची बाब मनावर घेतली नाही. दुरुस्ती अंदाजपत्रकात या साईडपट्ट्या होत्या, असे काहीजण सांगतात. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी भ्रमणध्वनीवरही प्रतिसाद देत नसल्याने काहीच कळायला मार्ग नाही. काही ठिकाणी पूर्ण रस्ताच खड्ड्यांनी व्यापला. कळमनुरीकडे काही खड्डे दुरुस्त केले. मात्र उदयोन्मुख खड्ड्यांकडे कुणी ढुंकूनही पाहात नाही. कनेरगाव नाका -हिंगोली रस्ता तर दुर्लक्षितच झाला आहे.