शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
4
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
5
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
6
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
7
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
8
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
9
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
10
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
11
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
12
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
13
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
14
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
15
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
16
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
17
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
18
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
19
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
20
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:52 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१ चे रुंदीकरण करण्यासाठी भूसंपदानाची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे येत्या काही वर्षांत वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या हा महामार्ग खड्ड्यांनी इतका व्यापला की रोजच अपघात घडत आहेत. यात अनेकांचे बळी गेले अन् वाहतूक कोंडीचेही नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१ चे रुंदीकरण करण्यासाठी भूसंपदानाची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे येत्या काही वर्षांत वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या हा महामार्ग खड्ड्यांनी इतका व्यापला की रोजच अपघात घडत आहेत. यात अनेकांचे बळी गेले अन् वाहतूक कोंडीचेही नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत.दहा ते पंधरा दिवसांपूर्वी लागोपाठ पाच दिवस अपघातामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडले होते. त्यात एका अपघातात एकाचा बळीही गेला. मात्र मागील सहा महिन्यांत किमान दहा ते पंधरा जण कनेरगाव ते वारंगा रस्त्यावरील अपघातात दगावले आहेत. या रस्त्याला साईडपट्ट्या नाहीत अन् रस्ताही अरुंद आहे. साईड देताना जराही गल्लत झाली की, ट्रक थेट आडवाच होतो. त्यातही सोळा, अठरा व चोवीस टायरचे ट्रकही या मार्गावरून धावतात. त्यांची लांबी इतकी असते की, रस्ताच व्यापतो. त्यामुळे एका रात्री तब्बल चौदा तास वाहतूक खोळंबा सोसण्याची वेळ प्रवाशांवर आली होती. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने साईडपट्ट्यांची बाब मनावर घेतली नाही. दुरुस्ती अंदाजपत्रकात या साईडपट्ट्या होत्या, असे काहीजण सांगतात. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी भ्रमणध्वनीवरही प्रतिसाद देत नसल्याने काहीच कळायला मार्ग नाही. काही ठिकाणी पूर्ण रस्ताच खड्ड्यांनी व्यापला. कळमनुरीकडे काही खड्डे दुरुस्त केले. मात्र उदयोन्मुख खड्ड्यांकडे कुणी ढुंकूनही पाहात नाही. कनेरगाव नाका -हिंगोली रस्ता तर दुर्लक्षितच झाला आहे.