शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
3
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
4
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
5
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
6
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
7
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
8
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
9
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
10
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
11
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
12
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
13
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
14
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
15
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला
16
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
17
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
18
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
19
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
20
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...

‘नांमका’ची कोट्यवधी रुपयांची थकबाकी थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:05 IST

बाबासाहेब धुमाळ वैजापूर : गंगापूर, वैजापूर व कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या नांदूर मधमेश्वर कालव्याची कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकली ...

बाबासाहेब धुमाळ

वैजापूर : गंगापूर, वैजापूर व कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या नांदूर मधमेश्वर कालव्याची कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे जवळपास दोन कोटी रुपयांची थकबाकी शेतकऱ्यांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांकडे अडकली आहे.

वैजापूर, गंगापूर व कोपरगाव या कायम दुष्काळी ठरलेल्या तालुक्यातील शेती सुजलाम सुफलाम व बागायती व्हावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून नाशिक जिल्ह्यातील मुकणे धरण समूहातून १२८ किलोमीटर कालव्याद्वारे कोपरगाव, वैजापूर व गंगापूर तालुक्यापर्यंत नांदूर मधमेश्वरचे पाणी आणण्यात आले आहे. हा कालवा तिनही तालुक्यांसाठी वरदान ठरला आहे. या कालव्यातून खरीप व रब्बी दोन्ही हंगामात सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. तसेच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येते. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार तर सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी आवर्तने सोडण्यात येतात. साधारणपणे दरवर्षी तीन ते चार पाणी आवर्तने सोडण्यात येतात. त्यासाठी शासनाकडून पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाणीपट्टी आकारणी करतात.

एकीकडे हे पाणी मिळत असले तरी पाटबंधारे विभागाचे शेतकरी व ग्रामपंचायतींकडे पाणीपट्टीपोटी कोट्यवधी रुपये थकलेले आहेत. या थकबाकीस पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची अनास्था कारणीभूत आहे. सिंचनासाठी शेतकऱ्यांसाठी पाणीपट्टीचे नाममात्र दर आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार पाणीपट्टी आकारणी करणे गरजेचे आहे. मात्र अधिकारी कागदोपत्री सिंचन दाखवतात. नांदूर मधमेश्वर कालव्याचे पूर्ण काम अद्याप झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात थेट पाणी मिळत नाही. केवळ कागदोपत्री सिंचन असल्याने शेतकरी पाणीपट्टी भरत नाही. दरवर्षी अधिकारी पाणी पट्टी आकारतात. थकबाकीचा आकडा दरवर्षी वाढत चालला आहे. अधिकारी मिळेल ती पट्टी वसूल करतात. काही अधिकारी शेतकऱ्यांना वसूल केलेल्या पट्टीची पावतीही देत नाहीत.

चौकट

पाणी वापर संस्थांना द्यावेत वसुलीचे अधिकार

कालवा लाभक्षेत्रात प्रत्येक वितरिकेवर पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. मात्र पाणी वापर संस्थांना वसुलीचे अधिकार देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. पाणी वापर संस्थांकडे पाणीपट्टी वसुलीचे अधिकार दिल्यास नियमित व अचूक वसुली होऊ शकते. अधिकारी मोघम स्वरुपात पाणीपट्टी आकारतात. अनेकवेळा ते शेतकऱ्यांना पावत्याही देत नाहीत. २०१५-१६ पासून शासनाने दिलेल्या उद्दिष्टाइतकी वसुली होऊ शकत नसल्याने अधिकारी ती शेतकऱ्यांकडे थकीत दाखवत आहेत. येणाऱ्या काळात ही थकबाकी शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरणार आहे.

चौकट

निधीअभावी उपलब्ध यंत्रणेवर पडतो ताण

पाणीपट्टी नियमित भरली जात नसल्याने पाटबंधारे विभागासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. वसुली होत नसल्याने वितरिका, मुख्य कालवा दुरूस्ती करणे, विकास कामे करणे यासाठी निधी उपलब्ध नसल्याने उपलब्ध यंत्रणेवरच शेतकऱ्यांपर्यंत पाणी आणि सुविधा पुरविण्याचे काम प्रशासनाला करावे लागत आहे.

फोटोसह

290721\screenshot_20200530_125722.jpg

ना.म.का फोटो