शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

चार दशकांपासून गाजतोय औरंगाबादच्या नामकरणाचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:06 IST

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा विषय मागील चार दशकांपासून गाजत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आजपर्यंत ...

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा विषय मागील चार दशकांपासून गाजत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आजपर्यंत स्वतःच्या हितासाठी नामकरणाचा सोयीस्करपणे वापर केला. औरंगाबाद महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेना संभाजीनगरच्या मुद्द्यावर भर देत आहे. आजपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेला चांगले यशही मिळाले. राज्यात शिवसेना पुन्हा एकदा सत्तेत आल्याने आता विरोधी पक्षांकडून संभाजीनगरच्या मुद्द्यावर शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

१९८०च्या दशकात शिवसेनेने औरंगाबादेत आपली पाळेमुळे घट्ट केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहरात अनेक झंझावती सभा घेतल्या. या सभांमध्ये त्यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याची घोषणा केली. तेव्हापासून आजपर्यंत शिवसेना याच मुद्द्यावर लढत आहे. १९९५मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी औरंगाबादच्या नामकरणाचा विषय हाताळला होता. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध माजी नगरसेवक मुश्ताक अहमद यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने नामकरणाला स्थगिती आदेश दिला होता. त्यानंतर मनोहर जोशी यांनी नामांतरासंदर्भात काढलेली अधिसूचना मागे घेतली होती.

१९८८पासून आजपर्यंत औरंगाबाद शहरात शिवसेनेने महापालिका निवडणुकीत संभाजीनगरच्या मुद्द्यावर भर दिला. त्यामुळे शिवसेनेला सत्ता मिळविणे सोपे गेले. १९ मे १९९५ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत औरंगाबादच्या नामकरणाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ४ जानेवारी २०११ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दुसरा नामांतराचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आला. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा हा विषय पेटविण्यात आला आहे. स्मार्ट सिटी प्रशासनाने मागील महिन्यात शहरातील टीव्ही सेंटर चौकात ‘सुपर संभाजीनगर’ नावाचा बोर्ड लावला. तेथून वादाची खरी ठिणगी उडाली. भाजपने संभाजीनगरच्या मुद्द्यावर शिवसेनेची चारही बाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला. सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसने या विषयाला कडाडून विरोध दर्शविला. एमआयएम पक्षाने नेहमीप्रमाणे आक्रमकपणे विरोध सुरू केला आहे.