शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

नियोजनच्या निधीला मागणीचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 23:53 IST

हिंगोली : यंदा जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारणसाठी १0८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र विविध विभागांना त्याची माहिती असूनही अद्याप निधीची मागणी करण्याचे नाव नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक व स्वच्छता विभागाने मात्र मोठा निधी लागणार असल्याने मागणी केल्याने २१.४३ कोटी रुपयांचे वितरण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारणसाठी १0८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र विविध विभागांना त्याची माहिती असूनही अद्याप निधीची मागणी करण्याचे नाव नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक व स्वच्छता विभागाने मात्र मोठा निधी लागणार असल्याने मागणी केल्याने २१.४३ कोटी रुपयांचे वितरण झाले आहे.हिंगोली जिल्ह्याला वार्षिक योजनेत यंदा दहा ते बारा कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे. मात्र दरवर्षीप्रमाणेच यंदाही अनेक विभागांनी मंजूर झालेल्या निधीचे नियोजन सुरू केले नाही म्हणून की काय अद्याप नियोजन विभागाकडे मात्र मागणी केली नाही. यात दोन विभागांचा तेवढा अपवाद आहे. यात कोट्यवधीची कामे मंजूर व काही आधीच सुरू झालेली असल्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागाने १३.६३ कोटींचा निधी मागितला होता. तो वितरित केला. तर सध्या जि.प.च्या स्वच्छता विभागाकडून शौचालय बांधकामांची कामे जोरात सुरू असल्याने या विभागाने ७.५0 कोटींचा निधी मागविला होता. तर ग्रामीण विकास विभागातर्फे प्रशिक्षणाच्या कार्यक्रमांसाठी ३0 लाखांची मागणी झाली.कृषी व संलग्न सेवांसाठी ४३.९७ कोटींचा निधी मंजूर आहे. यात पीकसंवर्धनास ९.४५ कोटी, फलोत्पादन-६ लाख, मृद व जलसंधारण-२६.३४ कोटी, पशुसंवर्धन-२.४७ कोटी, मत्स्यव्यवसायास २२.५0 लाख, वने व वन्यजीवनासाठी ३.४३ कोटी, सहकार विभागास २ कोटी असा निधी मंजूर आहे. त्यापैकी १५.९७ कोटी प्राप्त झाले. मात्र या विभागांनी अजूनही निधीची मागणी केली नाही.ग्रामविकास विभागात ग्रामीण रोजगारास ७७.२0 लाख मंजूर असून ३0 लाखांची मागणी झाली. सामूहिक विकासाच्या योजनांसाठी ३.५१ कोटी मंजूर असून मागणीच नाही. लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) ला ५.६५ कोटी तरतूद आली. तर परनियंत्रणास ३0 लाख आहेत. मात्र मागणीस नाही.सामाजिक सेवांमध्ये तर २५.२१ कोटी मंजूर व प्राप्त आहेत. मात्र स्वच्छता विभागाशिवाय कोणीही निधी मागणी केली नाही. तर यात शिक्षण-२.८९ कोटी, क्रीडा व युवक कल्याण-८६ लाख, कला व संस्कृती-६ लाख, कामगार कल्याण-३३ लाख, तंत्र शिक्षण-७ लाख, महसूल व गृहनिर्माण ५ लाख, सार्वजनिक आरोग्य ४.३३ लाख, पाणीपुरवठा व स्वच्छता १२.६९ लाख, नगरविकास-३.२0 लाख, मागासवर्गीयांचे कल्याण-२४ लाख, महिला व बालकल्याण-४८.९३ लाख अशी तरतूद आहे.उर्जा विकासासाठी ३.0१ कोटी प्राप्त आहेत. निधीअभावी कामे ठप्प ठेवली जात असली तरीही महावितरण निधीची मागणी करायला तयार नाही. ग्रामीण व लघुउद्योगांसाठी ५0 लाख, रस्ते व पूल विकासासाठी १५ कोटी मंजूर असून प्राप्त ७.६0 कोटीच आहेत. इमारतींसाठी ४.६३ कोटी मंजूर असून प्राप्त ७.४४ कोटी आहेत.यामध्ये कोट्यवधींचा निधी मिळणाºया मोठ्या यंत्रणाही सुस्तच राहात असल्याने ऐनवेळी त्याचे नियोजन व खर्च कसा होईल, याची काहीच चिंता नसते. पावसाळ्याच्या नावाखाली प्रशासकीय बाबीही पूर्ण केल्या जात नाहीत.