शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

नियोजनच्या निधीला मागणीचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 23:53 IST

हिंगोली : यंदा जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारणसाठी १0८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र विविध विभागांना त्याची माहिती असूनही अद्याप निधीची मागणी करण्याचे नाव नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक व स्वच्छता विभागाने मात्र मोठा निधी लागणार असल्याने मागणी केल्याने २१.४३ कोटी रुपयांचे वितरण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारणसाठी १0८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र विविध विभागांना त्याची माहिती असूनही अद्याप निधीची मागणी करण्याचे नाव नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक व स्वच्छता विभागाने मात्र मोठा निधी लागणार असल्याने मागणी केल्याने २१.४३ कोटी रुपयांचे वितरण झाले आहे.हिंगोली जिल्ह्याला वार्षिक योजनेत यंदा दहा ते बारा कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे. मात्र दरवर्षीप्रमाणेच यंदाही अनेक विभागांनी मंजूर झालेल्या निधीचे नियोजन सुरू केले नाही म्हणून की काय अद्याप नियोजन विभागाकडे मात्र मागणी केली नाही. यात दोन विभागांचा तेवढा अपवाद आहे. यात कोट्यवधीची कामे मंजूर व काही आधीच सुरू झालेली असल्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागाने १३.६३ कोटींचा निधी मागितला होता. तो वितरित केला. तर सध्या जि.प.च्या स्वच्छता विभागाकडून शौचालय बांधकामांची कामे जोरात सुरू असल्याने या विभागाने ७.५0 कोटींचा निधी मागविला होता. तर ग्रामीण विकास विभागातर्फे प्रशिक्षणाच्या कार्यक्रमांसाठी ३0 लाखांची मागणी झाली.कृषी व संलग्न सेवांसाठी ४३.९७ कोटींचा निधी मंजूर आहे. यात पीकसंवर्धनास ९.४५ कोटी, फलोत्पादन-६ लाख, मृद व जलसंधारण-२६.३४ कोटी, पशुसंवर्धन-२.४७ कोटी, मत्स्यव्यवसायास २२.५0 लाख, वने व वन्यजीवनासाठी ३.४३ कोटी, सहकार विभागास २ कोटी असा निधी मंजूर आहे. त्यापैकी १५.९७ कोटी प्राप्त झाले. मात्र या विभागांनी अजूनही निधीची मागणी केली नाही.ग्रामविकास विभागात ग्रामीण रोजगारास ७७.२0 लाख मंजूर असून ३0 लाखांची मागणी झाली. सामूहिक विकासाच्या योजनांसाठी ३.५१ कोटी मंजूर असून मागणीच नाही. लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) ला ५.६५ कोटी तरतूद आली. तर परनियंत्रणास ३0 लाख आहेत. मात्र मागणीस नाही.सामाजिक सेवांमध्ये तर २५.२१ कोटी मंजूर व प्राप्त आहेत. मात्र स्वच्छता विभागाशिवाय कोणीही निधी मागणी केली नाही. तर यात शिक्षण-२.८९ कोटी, क्रीडा व युवक कल्याण-८६ लाख, कला व संस्कृती-६ लाख, कामगार कल्याण-३३ लाख, तंत्र शिक्षण-७ लाख, महसूल व गृहनिर्माण ५ लाख, सार्वजनिक आरोग्य ४.३३ लाख, पाणीपुरवठा व स्वच्छता १२.६९ लाख, नगरविकास-३.२0 लाख, मागासवर्गीयांचे कल्याण-२४ लाख, महिला व बालकल्याण-४८.९३ लाख अशी तरतूद आहे.उर्जा विकासासाठी ३.0१ कोटी प्राप्त आहेत. निधीअभावी कामे ठप्प ठेवली जात असली तरीही महावितरण निधीची मागणी करायला तयार नाही. ग्रामीण व लघुउद्योगांसाठी ५0 लाख, रस्ते व पूल विकासासाठी १५ कोटी मंजूर असून प्राप्त ७.६0 कोटीच आहेत. इमारतींसाठी ४.६३ कोटी मंजूर असून प्राप्त ७.४४ कोटी आहेत.यामध्ये कोट्यवधींचा निधी मिळणाºया मोठ्या यंत्रणाही सुस्तच राहात असल्याने ऐनवेळी त्याचे नियोजन व खर्च कसा होईल, याची काहीच चिंता नसते. पावसाळ्याच्या नावाखाली प्रशासकीय बाबीही पूर्ण केल्या जात नाहीत.