शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

वर्षभरानंतर घरमालकासह वॉचमनविरूद्ध खुनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 18:23 IST

जूनी इमारत पाडून बिल्डींग मटेरियल उचलण्याच्या कारणावरुन ठेकेदाराचा खून केल्याप्रकरणी घरमालक आणि वॉचमनविरूद्ध छावणी पोलीस ठाण्यात तब्बल सव्वा वर्षानंतर हत्या आणि अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. 

ठळक मुद्दे २३ मे २०१६ रोजी जालिंदर त्रिभुवन यांचे प्रेत छावणीतील लष्कर परिसरात सापडले  होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल नुकताच छावणी पोलिसांना प्राप्त झाला.मृताची पत्नी विजयमाला त्रिभुवन यांनी याविषयी छावणी पोलीस ठाण्यात खूनाची तक्रार नोंदविली.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. १० :  जूनी इमारत पाडून बिल्डींग मटेरियल उचलण्याच्या कारणावरुन ठेकेदाराचा खून केल्याप्रकरणी घरमालक आणि वॉचमनविरूद्ध छावणी पोलीस ठाण्यात तब्बल सव्वा वर्षानंतर हत्या आणि अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. 

घरमालक भास्कर क ोल्हे आणि वॉचमन संजय बागूल अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना छावणी  विभागाचे सहायक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर मुंढे यांनी सांगितले की, २३ मे २०१६ रोजी जालिंदर त्रिभुवन यांचे प्रेत छावणीतील लष्कर परिसरात सापडले  होते. तत्पूर्वी २० मे पासून ते बेपत्ता होते. पती हरवल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलिसांत नोंदविली होती. दरम्यान तीन दिवसाने त्यांचे प्रेत आढळल्यानंतर छावणी पोलिसांनी याप्रकरणी  अकस्मात मृत्यूची नोंद करून मृताचे शवविच्छेदन केले होते. त्यावेळी त्यांच्या शरिरातील काही भाग न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला होता. 

न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल नुकताच छावणी पोलिसांना प्राप्त झाला. घाटीतील शवविच्छेदन करणारे डॉक्टर आणि प्रयोगशाळेच्या अहवालानुसार मृताचा खून झाल्याचे समोर आले. ही बाब मृताच्या नातेवाईकांना कळवून त्यांचे काही म्हणने असल्याचे नोंदविण्यास सांगितले होते. तेव्हा मृताची पत्नी विजयमाला त्रिभुवन(रा. कबीरनगर, उस्मानपुरा) यांनी याविषयी छावणी पोलीस ठाण्यात ९ आॅगस्ट २०१७ रोजी खूनाची  तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी भास्कर क ोल्हे याच्या मालकीच्या मिटमिटा परिसरातील इमारत पाडण्याचे आणि तेथील मटेरियल उचलण्याचे कंत्राट मृत जालिंदर यांना त्यांनी तीन लाख रुपयांत दिले होते. ठरल्यानुसार मयताने इमारत पाडण्यास सुरवात केली. यावेळी इमारतीचे मटेरियल उचलण्यासाठी जालिंदर तेथे गेले असता आरोपींनी त्यांना मटेरियल उचलण्यास कोल्हे यांनी मज्जाव केला. कोल्हे यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून धमकावले आणि आणखी एक लाख रुपयांची मागणी केल्याचे नमूद केले. तसेच वॉचमन बागूल यानेही त्यांना धमकावले होते. 

या घटनेनंतर २० मेपासून जालिंदर बेपत्ता होते आणि २३ रोजी त्यांचे प्रेत आढळले. आरोपींनी त्यांच्या डोक्यात काहीतरी मारून  हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत छावणीतील मोकळ्या मैदानात असलेल्या लिंबाच्या झाडाखाली आणून टाकले असावे,असे तक्रारीत नमूद केले. या तक्रारीनुसार छावणी पोलीस ठाण्यात खून आणि अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंढे हे करीत आहे.