शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

हजारो कोटींच्या उत्पन्नाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:05 IST

औरंगाबाद : मागील चार दशकांत महापालिका प्रशासनाने आर्थिक स्रोत बळकट करण्याकडे लक्ष न दिल्याने विविध विकासकामांसाठीचा वाटा भरण्यासाठी मनपाला ...

औरंगाबाद : मागील चार दशकांत महापालिका प्रशासनाने आर्थिक स्रोत बळकट करण्याकडे लक्ष न दिल्याने विविध विकासकामांसाठीचा वाटा भरण्यासाठी मनपाला राज्य शासनाकडे झोळी पसरण्याची वेळ ओढावली आहे. एकीकडे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची ७८९ कोटी रुपये थकबाकी आहे, तर दुसरीकडे इतर छोट्या-छोट्या आर्थिक स्रोतांमधून मिळू शकणाऱ्या उत्पन्नाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उदासीनता आड येत असल्याचे चित्र आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी औरंगाबाद महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत महापालिकेने नेहमीप्रमाणे राज्य शासनासमोर झोळी पसरली. स्मार्ट सिटी योजनेत स्वतःचा वाटा टाकण्यासाठी महापालिकेकडे २५० कोटी रुपये नाहीत. कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये आपला वाटा टाकण्यासाठी २४ कोटी रुपये नाहीत. त्यामुळे महापालिकेने आपले आर्थिक स्रोत बळकट करावेत, असा सल्ला शिंदे यांनी दिला. राज्य शासनाकडून जीएसटीचा वाटा म्हणून दरमहा २४ कोटी रुपये प्राप्त होतात. त्यातून कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन आणि लाइट बिल ही जबाबदारी प्रशासन पार पाडत आहे. विकास कामांसाठी पैसेच शिल्लक राहत नाहीत.

थकबाकीचा डोंगर वाढतोय; पण...

मालमत्ता कराचे नागरिकांकडे ४६८ कोटी, पाणीपट्टीचे ३२१ थकीत आहेत. चालू आर्थिक वर्षाची मागणी वेगळीच आहे. जुनी थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर पाऊल प्रशासनाकडून उचलण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकही प्रतिसाद देत नाहीत.

आर्थिक उत्पन्नाचे लहान-मोठे स्रोत

- नगररचना विभागाकडून दरवर्षी किमान शंभर कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात ४० ते ५० कोटीच येतात. अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा कोणताही अंकुश नाही.

- शहरात होर्डिंग व्यवसायात दरवर्षी किमान २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल होते. महापालिकेच्या तिजोरीत १ कोटी रुपयेही येत नाहीत.

- शहरात महापालिकेच्या मालकीचे मार्केट उभारले आहेत. त्यातून महापालिकेला दरवर्षी एक कोटी रुपयेही भेटत नाहीत. भाडेकरूंकडे असलेली थकबाकी प्रचंड आहे. ज्या कोट्यवधी रुपयांच्या जागा भाडेतत्त्वावर दिल्या आहेत त्यातूनही मनपाला उत्पन्न शून्य आहे.

- मोबाइल कंपन्यांकडे ३४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ५८६ टाॅवर अनधिकृतपणे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेचा महसूल प्रचंड बुडत आहे.

सकारात्मक बदल लवकरच दिसतील

शहरातील सर्व मालमत्तांना शंभर टक्के कर लावणे, वसुली करणे, परवाना शुल्क वसुली, जुने भाडे करार रद्द करून नवीन दर आकारणी या प्रक्रिया आता सुरू झाल्या आहेत. लवकरच वसुलीत सकारात्मक बदल दिसून येतील.

अपर्णा थेटे, उपायुक्त, महापालिका.