शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हजारो कोटींच्या उत्पन्नाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:05 IST

औरंगाबाद : मागील चार दशकांत महापालिका प्रशासनाने आर्थिक स्रोत बळकट करण्याकडे लक्ष न दिल्याने विविध विकासकामांसाठीचा वाटा भरण्यासाठी मनपाला ...

औरंगाबाद : मागील चार दशकांत महापालिका प्रशासनाने आर्थिक स्रोत बळकट करण्याकडे लक्ष न दिल्याने विविध विकासकामांसाठीचा वाटा भरण्यासाठी मनपाला राज्य शासनाकडे झोळी पसरण्याची वेळ ओढावली आहे. एकीकडे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची ७८९ कोटी रुपये थकबाकी आहे, तर दुसरीकडे इतर छोट्या-छोट्या आर्थिक स्रोतांमधून मिळू शकणाऱ्या उत्पन्नाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उदासीनता आड येत असल्याचे चित्र आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी औरंगाबाद महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत महापालिकेने नेहमीप्रमाणे राज्य शासनासमोर झोळी पसरली. स्मार्ट सिटी योजनेत स्वतःचा वाटा टाकण्यासाठी महापालिकेकडे २५० कोटी रुपये नाहीत. कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये आपला वाटा टाकण्यासाठी २४ कोटी रुपये नाहीत. त्यामुळे महापालिकेने आपले आर्थिक स्रोत बळकट करावेत, असा सल्ला शिंदे यांनी दिला. राज्य शासनाकडून जीएसटीचा वाटा म्हणून दरमहा २४ कोटी रुपये प्राप्त होतात. त्यातून कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन आणि लाइट बिल ही जबाबदारी प्रशासन पार पाडत आहे. विकास कामांसाठी पैसेच शिल्लक राहत नाहीत.

थकबाकीचा डोंगर वाढतोय; पण...

मालमत्ता कराचे नागरिकांकडे ४६८ कोटी, पाणीपट्टीचे ३२१ थकीत आहेत. चालू आर्थिक वर्षाची मागणी वेगळीच आहे. जुनी थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर पाऊल प्रशासनाकडून उचलण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकही प्रतिसाद देत नाहीत.

आर्थिक उत्पन्नाचे लहान-मोठे स्रोत

- नगररचना विभागाकडून दरवर्षी किमान शंभर कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात ४० ते ५० कोटीच येतात. अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा कोणताही अंकुश नाही.

- शहरात होर्डिंग व्यवसायात दरवर्षी किमान २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल होते. महापालिकेच्या तिजोरीत १ कोटी रुपयेही येत नाहीत.

- शहरात महापालिकेच्या मालकीचे मार्केट उभारले आहेत. त्यातून महापालिकेला दरवर्षी एक कोटी रुपयेही भेटत नाहीत. भाडेकरूंकडे असलेली थकबाकी प्रचंड आहे. ज्या कोट्यवधी रुपयांच्या जागा भाडेतत्त्वावर दिल्या आहेत त्यातूनही मनपाला उत्पन्न शून्य आहे.

- मोबाइल कंपन्यांकडे ३४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ५८६ टाॅवर अनधिकृतपणे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेचा महसूल प्रचंड बुडत आहे.

सकारात्मक बदल लवकरच दिसतील

शहरातील सर्व मालमत्तांना शंभर टक्के कर लावणे, वसुली करणे, परवाना शुल्क वसुली, जुने भाडे करार रद्द करून नवीन दर आकारणी या प्रक्रिया आता सुरू झाल्या आहेत. लवकरच वसुलीत सकारात्मक बदल दिसून येतील.

अपर्णा थेटे, उपायुक्त, महापालिका.