शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

हजारो कोटींच्या उत्पन्नाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:05 IST

औरंगाबाद : मागील चार दशकांत महापालिका प्रशासनाने आर्थिक स्रोत बळकट करण्याकडे लक्ष न दिल्याने विविध विकासकामांसाठीचा वाटा भरण्यासाठी मनपाला ...

औरंगाबाद : मागील चार दशकांत महापालिका प्रशासनाने आर्थिक स्रोत बळकट करण्याकडे लक्ष न दिल्याने विविध विकासकामांसाठीचा वाटा भरण्यासाठी मनपाला राज्य शासनाकडे झोळी पसरण्याची वेळ ओढावली आहे. एकीकडे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची ७८९ कोटी रुपये थकबाकी आहे, तर दुसरीकडे इतर छोट्या-छोट्या आर्थिक स्रोतांमधून मिळू शकणाऱ्या उत्पन्नाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उदासीनता आड येत असल्याचे चित्र आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी औरंगाबाद महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत महापालिकेने नेहमीप्रमाणे राज्य शासनासमोर झोळी पसरली. स्मार्ट सिटी योजनेत स्वतःचा वाटा टाकण्यासाठी महापालिकेकडे २५० कोटी रुपये नाहीत. कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये आपला वाटा टाकण्यासाठी २४ कोटी रुपये नाहीत. त्यामुळे महापालिकेने आपले आर्थिक स्रोत बळकट करावेत, असा सल्ला शिंदे यांनी दिला. राज्य शासनाकडून जीएसटीचा वाटा म्हणून दरमहा २४ कोटी रुपये प्राप्त होतात. त्यातून कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन आणि लाइट बिल ही जबाबदारी प्रशासन पार पाडत आहे. विकास कामांसाठी पैसेच शिल्लक राहत नाहीत.

थकबाकीचा डोंगर वाढतोय; पण...

मालमत्ता कराचे नागरिकांकडे ४६८ कोटी, पाणीपट्टीचे ३२१ थकीत आहेत. चालू आर्थिक वर्षाची मागणी वेगळीच आहे. जुनी थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर पाऊल प्रशासनाकडून उचलण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकही प्रतिसाद देत नाहीत.

आर्थिक उत्पन्नाचे लहान-मोठे स्रोत

- नगररचना विभागाकडून दरवर्षी किमान शंभर कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात ४० ते ५० कोटीच येतात. अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा कोणताही अंकुश नाही.

- शहरात होर्डिंग व्यवसायात दरवर्षी किमान २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल होते. महापालिकेच्या तिजोरीत १ कोटी रुपयेही येत नाहीत.

- शहरात महापालिकेच्या मालकीचे मार्केट उभारले आहेत. त्यातून महापालिकेला दरवर्षी एक कोटी रुपयेही भेटत नाहीत. भाडेकरूंकडे असलेली थकबाकी प्रचंड आहे. ज्या कोट्यवधी रुपयांच्या जागा भाडेतत्त्वावर दिल्या आहेत त्यातूनही मनपाला उत्पन्न शून्य आहे.

- मोबाइल कंपन्यांकडे ३४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ५८६ टाॅवर अनधिकृतपणे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेचा महसूल प्रचंड बुडत आहे.

सकारात्मक बदल लवकरच दिसतील

शहरातील सर्व मालमत्तांना शंभर टक्के कर लावणे, वसुली करणे, परवाना शुल्क वसुली, जुने भाडे करार रद्द करून नवीन दर आकारणी या प्रक्रिया आता सुरू झाल्या आहेत. लवकरच वसुलीत सकारात्मक बदल दिसून येतील.

अपर्णा थेटे, उपायुक्त, महापालिका.