शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

औरंगाबादमध्ये मुंडेंचा नित्य संपर्क

By admin | Updated: June 4, 2014 01:35 IST

औरंगाबाद : केंद्रीय ग्रामविकासमंत्री खा. गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याची राजधानी औरंगाबादवर विशेष प्रेम होते.

औरंगाबाद : केंद्रीय ग्रामविकासमंत्री खा. गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याची राजधानी औरंगाबादवर विशेष प्रेम होते. १९७२ साली ते समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. दुष्काळाच्या काळात मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत त्यांनी आंदोलन केले. तेव्हापासूनच त्यांची या शहराची नाळ जुळत गेली. भाजपाला औरंगाबादेत मोठे करण्यासाठी त्यांनी अनेक कटू निर्णय घेतले. १९८४ साली मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुणे मतदारसंघातून वेगळा झाल्यानंतर प्रचारासाठी त्यांनी मराठवाडा पिंजून काढला. मुंडे समर्थनगर येथील कार्यालयात जीपने पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. तेथूनच त्यांच्यातील खरा लढवय्या नेता औरंगाबादकरांना कळाला. त्यानंतर १९८८ सालची मनपाची निवडणूक, १९८९-९१ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी औरंगाबादेतील कार्यकर्त्यांची मोट बांधली. १९९३ साली त्यांनी संघर्षयात्रेचे नेतृत्व केले. त्या काळात शहरातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या विचारांशी जोडले गेले. १९९५ नंतर त्यांचे औरंगाबादेतील वास्तव्य आणखी वाढले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे युती सरकारच्या काळात होती. या काळातच माजी आ. श्रीकांत जोशी, माजी आ. हरिभाऊ बागडे, उद्योजक विवेकदेशपांडे, डॉ. भागवत कराड यांच्यासोबत त्यांच्या अनेक राजकीय मसलती होऊ लागल्या. रामा हॉटेलमध्येदेखील ते अनेकदा मुक्कामी असायचे. २००० साली झालेल्या मनपा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेसोबत युती करण्याऐवजी भाजपाला स्वतंत्र मैदानात आणले. १९८८ साली झालेल्या सेना-भाजपाच्या युतीच्या विरोधात प्रथमच मुंडेंनी थेट आव्हान दिले. त्यांच्या या आव्हानामुळे भाजपा एकसंघ लढली, मनपात भाजपाचे प्राबल्य वाढले. २००६ साली प्रमोद महाजन यांचे निधन झाल्यानंतर भाजपा आणि सेनेत जेव्हा-जेव्हा वाद झाले, ते वाद सोडविण्यासाठी मुंडे यांची मध्यस्थी महत्त्वाची असायची. २००७ साली डॉ. कराड यांना महापौरपदासाठी दुसर्‍यांदा संधी फक्त आणि फक्त खा. मुंडे यांच्यामुळेच मिळाली. पक्षातून विरोध असतानाही मुंडेंमुळे ते शक्य झाले होते. २०१० साली भाजपाने शिवसेनेकडून स्थायी समिती सभापतीपद हिसकावले. त्यावरून युती तुटण्यापर्यंत वातावरण निर्माण झाले होते. भाजपा शहराध्यक्षाला मारहाण आणि कार्यालयावर दगडफेक करण्यापर्यंत सेनेने वचपा काढला. तेव्हाही खा. मुंडे यांनी उद्योजक देशपांडे यांच्या घरी बैठक घेऊन तो वाद मिटविला होता. औरंगाबादचे राजकारण आणि समाजकारणात त्यांनी भाजपाला एक जबरदस्त प्लॅटफॉर्म मिळवून दिला होता.