शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
3
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
4
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
5
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
6
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
7
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
8
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
9
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
10
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
11
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
12
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
13
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
14
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
15
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
16
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
17
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
18
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
19
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
20
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल

औरंगाबादमध्ये मुंडेंचा नित्य संपर्क

By admin | Updated: June 4, 2014 01:35 IST

औरंगाबाद : केंद्रीय ग्रामविकासमंत्री खा. गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याची राजधानी औरंगाबादवर विशेष प्रेम होते.

औरंगाबाद : केंद्रीय ग्रामविकासमंत्री खा. गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याची राजधानी औरंगाबादवर विशेष प्रेम होते. १९७२ साली ते समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. दुष्काळाच्या काळात मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत त्यांनी आंदोलन केले. तेव्हापासूनच त्यांची या शहराची नाळ जुळत गेली. भाजपाला औरंगाबादेत मोठे करण्यासाठी त्यांनी अनेक कटू निर्णय घेतले. १९८४ साली मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुणे मतदारसंघातून वेगळा झाल्यानंतर प्रचारासाठी त्यांनी मराठवाडा पिंजून काढला. मुंडे समर्थनगर येथील कार्यालयात जीपने पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. तेथूनच त्यांच्यातील खरा लढवय्या नेता औरंगाबादकरांना कळाला. त्यानंतर १९८८ सालची मनपाची निवडणूक, १९८९-९१ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी औरंगाबादेतील कार्यकर्त्यांची मोट बांधली. १९९३ साली त्यांनी संघर्षयात्रेचे नेतृत्व केले. त्या काळात शहरातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या विचारांशी जोडले गेले. १९९५ नंतर त्यांचे औरंगाबादेतील वास्तव्य आणखी वाढले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे युती सरकारच्या काळात होती. या काळातच माजी आ. श्रीकांत जोशी, माजी आ. हरिभाऊ बागडे, उद्योजक विवेकदेशपांडे, डॉ. भागवत कराड यांच्यासोबत त्यांच्या अनेक राजकीय मसलती होऊ लागल्या. रामा हॉटेलमध्येदेखील ते अनेकदा मुक्कामी असायचे. २००० साली झालेल्या मनपा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेसोबत युती करण्याऐवजी भाजपाला स्वतंत्र मैदानात आणले. १९८८ साली झालेल्या सेना-भाजपाच्या युतीच्या विरोधात प्रथमच मुंडेंनी थेट आव्हान दिले. त्यांच्या या आव्हानामुळे भाजपा एकसंघ लढली, मनपात भाजपाचे प्राबल्य वाढले. २००६ साली प्रमोद महाजन यांचे निधन झाल्यानंतर भाजपा आणि सेनेत जेव्हा-जेव्हा वाद झाले, ते वाद सोडविण्यासाठी मुंडे यांची मध्यस्थी महत्त्वाची असायची. २००७ साली डॉ. कराड यांना महापौरपदासाठी दुसर्‍यांदा संधी फक्त आणि फक्त खा. मुंडे यांच्यामुळेच मिळाली. पक्षातून विरोध असतानाही मुंडेंमुळे ते शक्य झाले होते. २०१० साली भाजपाने शिवसेनेकडून स्थायी समिती सभापतीपद हिसकावले. त्यावरून युती तुटण्यापर्यंत वातावरण निर्माण झाले होते. भाजपा शहराध्यक्षाला मारहाण आणि कार्यालयावर दगडफेक करण्यापर्यंत सेनेने वचपा काढला. तेव्हाही खा. मुंडे यांनी उद्योजक देशपांडे यांच्या घरी बैठक घेऊन तो वाद मिटविला होता. औरंगाबादचे राजकारण आणि समाजकारणात त्यांनी भाजपाला एक जबरदस्त प्लॅटफॉर्म मिळवून दिला होता.