शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

गंगापुरातील ग्रामपंचायतींना महावितरणचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:05 IST

गंगापूर/लासूर स्टेशन : तालुक्यातील ८० टक्के ग्रामपंचायतींवर वीजबिले थकीत असल्यामुळे महावितरण कंपनीने कारवाईचा बडगा उगारला आहे. पाणीपुरवठ्याचे १२० ...

गंगापूर/लासूर स्टेशन : तालुक्यातील ८० टक्के ग्रामपंचायतींवर वीजबिले थकीत असल्यामुळे महावितरण कंपनीने कारवाईचा बडगा उगारला आहे. पाणीपुरवठ्याचे १२० कनेक्शन तोडण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बिले अदा केली नाहीत तर, पथदिव्यांसह इतर थकीत ग्रामपंचायतींचाही वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. तर तोडलेली वीज जोडणी पूर्ववत करून देण्याची मागणी आ. प्रशांत बंब यांनी महावितरणकडे केली आहे.

तालुक्यात ११० ग्रामपंचायती अंतर्गत १४८ पाणीपुरवठा जोडणीचे चालू वर्षाचे १ एप्रिलपासून १ कोटी रुपये थकले आहेत. यामुळे महावितरणने जोडण्या खंडित करण्याला सुरुवात केली आहे. गेल्या २ ते ३ वर्षांपासून महावितरणचे जवळपास १० कोटी ५० लाख रुपये थकीत आहेत. वेळोवेळी मागणी करूनसुद्धा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी थकीत बिले भरली नसल्याने वीजजोडणी खंडित होण्याची नामुष्की ओढवली आहे. तसेच पथदिव्यांचे ३३८ जोडणीची एकूण ३० कोटी थकबाकी असून चालू वर्षीचे १० कोटी येणे आहे. पैकी २५० पथदिव्यांचे कनेक्शन कट करण्यात आले आहे. ग्रामपंचायत व महावितरणच्या ओढाताणीचा दुहेरी फटका नागरिकांना बसत असून ऐन पावसाळ्यात गावांना तहानलेले व अंधारात राहण्याची वेळ आल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. शासनाच्या आदेशानुसार आम्ही काम करीत आहोत, बिल न भरल्यास वसुलीची मोहीम तीव्र करण्याचे संकेत महावितरणचे अभियंता रवींद्र गायकवाड यांनी दिले आहे. तर आ. बंब यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

कोट...

वसुली नसल्याने ग्रामपंचायतीस वीजबिल भरण्यास अडचण येत आहे. महावितरणने टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत दिल्यास आम्ही थकबाकी भरण्यास तयार आहोत; परंतु एकरकमी निधी उपलब्ध नसल्याने अडचण येत आहे. यामध्ये मागील अनेक वर्षांपासूनच्या थकबाकीचा समावेश आहे.

- हिराबाई मोरे, सरपंच, पुरी