शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

मोंढा स्थलांतराचे काम गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:46 IST

जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचा सभापती होताच मागील १९ वर्षांपासून प्रलंबित मोंढा स्थलांतरास सकारात्मक गती मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचा सभापती होताच मागील १९ वर्षांपासून प्रलंबित मोंढा स्थलांतरास सकारात्मक गती मिळाली आहे. या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी खुद्द विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी झालेल्या बैठकीत संचालक, व्यापारी प्रतिनिधींनी एकत्र बसून नियोजनबद्ध आखणी करून स्थलांतर करण्याचा संकल्प सोडला.मागील आठवड्यात काँग्रेसचे संजय औताडे यांचा १३ विरुद्ध ४ मतांनी पराभव करीत भाजपचे राधाकिसन पठाडे हे कृउबा समितीचे सभापती झाले. मतदारसंघातील मोठी बाजार समिती ताब्यात आल्याने हरिभाऊ बागडे यांची जबाबदारी आणखी वाढली आहे.गणेश विसर्जन होताच दुसºया दिवशी त्यांनी आपल्या कार्यालयात सभापती, संचालक, व्यापारी संचालक व मोंढ्यातील व्यापारी प्रतिनिधींची बैठक बोलविली. यासंदर्भात सभापती पठाडे यांनी सांगितले की, हरिभाऊ बागडे यांनी जाधववाडी बाजार समितीच्या विकासासाठी मोंढ्यातील व्यापाºयांचे नियोजनबद्ध पद्धतीने स्थलांतर करण्याचा निर्णय या बैठकीतघेतला.४१३ रुपये रेडिरेकनर दराप्रमाणे प्रस्ताव तयार करून तो पणन संचालकांना पाठविण्याचे आदेश दिले. यानुसार पुढील आठवड्यात बाजार समितीच्या संचालकांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. त्यात स्थलांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल व तो प्रस्ताव पुणे येथील पणन संचालकांकडे परवानगीसाठी पाठविण्यात येईल. त्यांनी बारा-एकची परवानगी देताच, त्यानुसार स्थलांतरासंदर्भातील कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात येतील. कारण, यासंदर्भात न्यायालयात याचिका आहे. न्यायालयाने आदेश देताच जाधववाडीतील होलसेल किराणा मार्केटसाठीच्या प्लॉटचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर एक वर्षाच्या आत व्यापाºयांनी दुकानाचे बांधकाम करून तेथे प्रत्यक्ष व्यवहार सुरू करावेत, असा निर्णय बैठकीत झाला. यास व्यापाºयांनीही सहमती दर्शविली. बैठकीत नगरसेवक राजू शिंदे, उपसभापती भागचंद ठोंबरे, संचालक दामोदर नवपुते, राम शेळके, रघुनाथ काळे, गणेश दहीहंडे, व्यापारी संचालक प्रशांत सोकिया, हरिशंकर दायमा, सचिव-विजय शिरसाठ, मोंढ्यातील व्यापारी प्रतिनिधी आनंद सेठी, देवेंद्रसेठ, संजय कांकरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.२३ एकर जमिनीसाठी न्यायालयात लढामहाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असणारी बाजार समिती म्हणून जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखल्या जाते. येथे बाजार समितीच्या नावावर १७५ एकर जमीन आहे. मात्र, त्यातील २३ एकर जमिनीचा वाद न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. सर्व्हे क्र. १०, १२ व १३ मधील मिळूनही २३ एकर जमीन पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी बाजार समितीला न्यायालयात लढा द्यावा लागत आहे.आजघडीला बाजार समितीच्या २४ याचिका विविध न्यायालयात दाखल आहेत. यातील जमिनीच्या तीन याचिका सर्वोच्च न्यायालयात आहेत. तर अन्य २१ याचिका उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहेत. बाजार समितीच्या हातातून गेलेली जमीन पुन्हा मिळविण्यासाठी नवनिर्वाचित सभापती व संचालक मंडळाला परिश्रम घ्यावे लागणार आहेत.