शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

मोंढा स्थलांतराचे काम गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:46 IST

जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचा सभापती होताच मागील १९ वर्षांपासून प्रलंबित मोंढा स्थलांतरास सकारात्मक गती मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचा सभापती होताच मागील १९ वर्षांपासून प्रलंबित मोंढा स्थलांतरास सकारात्मक गती मिळाली आहे. या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी खुद्द विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी झालेल्या बैठकीत संचालक, व्यापारी प्रतिनिधींनी एकत्र बसून नियोजनबद्ध आखणी करून स्थलांतर करण्याचा संकल्प सोडला.मागील आठवड्यात काँग्रेसचे संजय औताडे यांचा १३ विरुद्ध ४ मतांनी पराभव करीत भाजपचे राधाकिसन पठाडे हे कृउबा समितीचे सभापती झाले. मतदारसंघातील मोठी बाजार समिती ताब्यात आल्याने हरिभाऊ बागडे यांची जबाबदारी आणखी वाढली आहे.गणेश विसर्जन होताच दुसºया दिवशी त्यांनी आपल्या कार्यालयात सभापती, संचालक, व्यापारी संचालक व मोंढ्यातील व्यापारी प्रतिनिधींची बैठक बोलविली. यासंदर्भात सभापती पठाडे यांनी सांगितले की, हरिभाऊ बागडे यांनी जाधववाडी बाजार समितीच्या विकासासाठी मोंढ्यातील व्यापाºयांचे नियोजनबद्ध पद्धतीने स्थलांतर करण्याचा निर्णय या बैठकीतघेतला.४१३ रुपये रेडिरेकनर दराप्रमाणे प्रस्ताव तयार करून तो पणन संचालकांना पाठविण्याचे आदेश दिले. यानुसार पुढील आठवड्यात बाजार समितीच्या संचालकांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. त्यात स्थलांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल व तो प्रस्ताव पुणे येथील पणन संचालकांकडे परवानगीसाठी पाठविण्यात येईल. त्यांनी बारा-एकची परवानगी देताच, त्यानुसार स्थलांतरासंदर्भातील कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात येतील. कारण, यासंदर्भात न्यायालयात याचिका आहे. न्यायालयाने आदेश देताच जाधववाडीतील होलसेल किराणा मार्केटसाठीच्या प्लॉटचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर एक वर्षाच्या आत व्यापाºयांनी दुकानाचे बांधकाम करून तेथे प्रत्यक्ष व्यवहार सुरू करावेत, असा निर्णय बैठकीत झाला. यास व्यापाºयांनीही सहमती दर्शविली. बैठकीत नगरसेवक राजू शिंदे, उपसभापती भागचंद ठोंबरे, संचालक दामोदर नवपुते, राम शेळके, रघुनाथ काळे, गणेश दहीहंडे, व्यापारी संचालक प्रशांत सोकिया, हरिशंकर दायमा, सचिव-विजय शिरसाठ, मोंढ्यातील व्यापारी प्रतिनिधी आनंद सेठी, देवेंद्रसेठ, संजय कांकरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.२३ एकर जमिनीसाठी न्यायालयात लढामहाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असणारी बाजार समिती म्हणून जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखल्या जाते. येथे बाजार समितीच्या नावावर १७५ एकर जमीन आहे. मात्र, त्यातील २३ एकर जमिनीचा वाद न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. सर्व्हे क्र. १०, १२ व १३ मधील मिळूनही २३ एकर जमीन पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी बाजार समितीला न्यायालयात लढा द्यावा लागत आहे.आजघडीला बाजार समितीच्या २४ याचिका विविध न्यायालयात दाखल आहेत. यातील जमिनीच्या तीन याचिका सर्वोच्च न्यायालयात आहेत. तर अन्य २१ याचिका उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहेत. बाजार समितीच्या हातातून गेलेली जमीन पुन्हा मिळविण्यासाठी नवनिर्वाचित सभापती व संचालक मंडळाला परिश्रम घ्यावे लागणार आहेत.