शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

सिंचन अनुशेष दूर करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:20 IST

हिंगोली : मागील अडीच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आ.तान्हाजी मुटकुळे यांना सिंचन अनुशेष मान्य करून घेण्यात यश मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील अडीच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आ.तान्हाजी मुटकुळे यांना सिंचन अनुशेष मान्य करून घेण्यात यश मिळाले आहे. आता तो दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने काही नवे प्रकल्प जिल्ह्यात उभे राहण्याची आशा पल्लवीत झाली आहे.हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला मुद्दा होता. त्यासाठी मागील अडीच वर्षांपासून आ.तान्हाजी मुटकुळे यांनीही जोरदार पाठपुरावा चालविला होता. त्यासाठी अनेकदा राज्यपाल के. विद्यासागर राव यांचीही त्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर या अनुशेषाला मान्यता देण्यासाठी मार्गदर्शक सूचना शासनाकडून राज्यपालांनी मागविल्या होत्या. ३ जुलै २0१७ रोजी त्याचाही मसुदा त्यांना सादर झाला आहे. आता हा अनुशेष दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात जलसंपदा व जलसंधारण विभागामार्फत हाती घ्यावयाच्या प्रकल्पांची यादी, प्रकल्प उभारणीचे वार्षिक नियोजन, प्रस्तावित केलेल्या प्रत्येक प्रकल्पाची सिंचनक्षमता, हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी अथवा वर्षे तसेच त्यासाठी लागणारा निधी याची माहिती राज्यपालांचे सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांच्याकडे मागितली आहे. तर जलसंपदा, जलसंधारण व रोहयो विभागासही ही बाब कळविली आहे.मागील काही दिवसांपासून या सिंचन अनुशेषावरून जोरदार चर्चा होत होती. नुसत्याच चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात होते. मात्र यात काहीच होणार नाही, अशीही पुस्तीही जोडली जात होती. मात्र अखेर त्यात एकेक पुढचे पाऊल पडत असल्याने त्या सर्व बाबींना छेद देणारी ही बाब असून ही प्रक्रिया वेळेत झाल्यास निदान अनुशेष व निधीची तरतूद तरी होईल, हे मात्र नक्की.