शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

मिल प्रशासनाच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली

By admin | Updated: June 28, 2017 00:29 IST

नांदेड: उस्मानशाही मिल परिसरात गिरणी कामगार, कर्मचारी, मजुरांच्या मुलांसाठी १९५१ मध्ये उघडण्यात आलेल्या शाळेच्या इमारत जीर्ण झाल्याचे कारण पुढे करत

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: उस्मानशाही मिल परिसरात गिरणी कामगार, कर्मचारी, मजुरांच्या मुलांसाठी १९५१ मध्ये उघडण्यात आलेल्या शाळेच्या इमारत जीर्ण झाल्याचे कारण पुढे करत मिल प्रशासनाने ही शाळा बंद करण्याबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरु केला आहे़ परंतु ही शाळा बंद झाल्यास ३७६ विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून शाळेतील १८ कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार राहणार आहे़ उस्मानशाही मिल १९२८ मध्ये सुरु करण्यात आली़ त्यावेळी येथील गिरणी कामगार व कर्मचारी मराठी, तेलगू व उर्दू भाषिक होते़ या मुलांच्या शिक्षणासाठी याच परिसरात प्राथमिक शाळा सुरु करण्यात आली़ १९५१ मध्ये या शाळेची जिल्हा परिषदेत नोंदही घेण्यात आली़ त्यानंतर शाळेला शंभर टक्के अनुदानही मिळाले़ आजघडीला या शाळेत मराठी माध्यमाचे १ ते ७, तेलगू माध्यमाचे १ ते ४ व उर्दू माध्यमाचे १ ते ७ असे वर्ग चालतात़ त्यात ३७६ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यासाठी १८ कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत़परंतु सदरील शाळेची इमारत जीर्ण झाल्याचे कारण देत एनटीसीच्या व्यवस्थापकांनी शाळा बंद करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरु केला आहे़ ही शाळा बंद झाल्यास ३७६ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित होणार असून १८ कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे़ शाळेत येणारे सर्व विद्यार्थी ही गोरगरीब कुटुंबातून आलेले आहेत़ याबाबत कर्मचारी आणि पालकांनी मंगळवारी आ़हेमंत पाटील यांची भेट घेतली़ त्यांच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडले़ त्यावर आ़ पाटील यांनी ही शाळा बंद होऊ देणार नसून त्याबाबत वस्त्रोद्योगमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले़