शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
5
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
6
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
7
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
8
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
9
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
10
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
12
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
13
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
14
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
15
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
16
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
17
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
18
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
19
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
20
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...

जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस

By admin | Updated: June 6, 2016 00:21 IST

जालना : शहराहसह जिल्ह्यात रविवारी दुपारी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. जालना, वालसावंगी, परतूर, पारडगाव, घनसावंगी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने

जालना : शहराहसह जिल्ह्यात रविवारी दुपारी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. जालना, वालसावंगी, परतूर, पारडगाव, घनसावंगी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. झाडे उन्मळून पडली. वीजपुरवठा खंडित झाला. रविवारी दुपारनंतर कडक ऊन असले तरी चार वाजेनंतर वातावरणात बदल होऊन पावसाला सुरूवात झाली. जालना शहरात हलकासा पाऊस झाला. वालसावंगी, परतूर, पारडगाव, घनसावंगी, सोनक पिंपळगाव, पारध, रामनगर, दुधना काळेगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने वालसावंगी, पारध आदी गावातील अनेक घरावरील पत्रे उडून गेली. पत्रे उडून गेल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती. शनिवारी मध्यरात्रीही जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. रविवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, पेरणीच्या कामांना वेग येईल अशी शक्यता शेतकरी वर्तवित आहेत. पावसामुळे ग्रामीण भागात सखल भागात चांगले पाणी साचले आहे. पत्रे उडून जाण्यासोबतच अनेक होर्डिगही तूटून पडले. आठवडी बाजारातही बाजारकरूंसह व्यापाऱ्यांचे मोठे हाल झाले. वेळेत पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह सर्व सामान्यांत समाधान व्यक्त होत आहे. काही शेतांमध्ये पाणी साचले आहे.आष्टी: परतूर तालुक्यातील आष्टीसह परिसरात दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे फुलवाडी येथील सोपान निवृत्ती वाघमारे यांची गट क्रमांक १९ मध्ये असलेली लिंबोणीची बाग उद्ध्वस्त झाली. यात ३५ झाडे उन्मळून पडली. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील गोठे तसेच शेती साहित्याचे नुकसान झाले.परतूर तालुक्यातील हातडी, श्रीष्टी, आष्टी ७० पेक्षा अधिक विजेचे खांब पडले आहेत. मुख्य वाहिनीचे दहा ते बारा वीज खांब पडले. दोन रोहित्रांचेही नुकसान झाले. परिणामी परिसरातील ४८ गावे अंधारात बुडाली आहेत. अंधारामुळे ग्रामस्थांचे हाल होत असून, महावितरण कंपनीने तात्काळ वीज खांबांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. बहुतांश ठिकाणी विजेच्या खांबांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने वादळी पावसात खांब जमीनदोस्त होत आहेत. विशेष म्हणजे रोहित्रेही कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठावर परिणाम झाला आहे. पिठाच्या गिरण्याही बंद आहेत.