शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस

By admin | Updated: June 6, 2016 00:21 IST

जालना : शहराहसह जिल्ह्यात रविवारी दुपारी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. जालना, वालसावंगी, परतूर, पारडगाव, घनसावंगी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने

जालना : शहराहसह जिल्ह्यात रविवारी दुपारी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. जालना, वालसावंगी, परतूर, पारडगाव, घनसावंगी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. झाडे उन्मळून पडली. वीजपुरवठा खंडित झाला. रविवारी दुपारनंतर कडक ऊन असले तरी चार वाजेनंतर वातावरणात बदल होऊन पावसाला सुरूवात झाली. जालना शहरात हलकासा पाऊस झाला. वालसावंगी, परतूर, पारडगाव, घनसावंगी, सोनक पिंपळगाव, पारध, रामनगर, दुधना काळेगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने वालसावंगी, पारध आदी गावातील अनेक घरावरील पत्रे उडून गेली. पत्रे उडून गेल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती. शनिवारी मध्यरात्रीही जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. रविवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, पेरणीच्या कामांना वेग येईल अशी शक्यता शेतकरी वर्तवित आहेत. पावसामुळे ग्रामीण भागात सखल भागात चांगले पाणी साचले आहे. पत्रे उडून जाण्यासोबतच अनेक होर्डिगही तूटून पडले. आठवडी बाजारातही बाजारकरूंसह व्यापाऱ्यांचे मोठे हाल झाले. वेळेत पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह सर्व सामान्यांत समाधान व्यक्त होत आहे. काही शेतांमध्ये पाणी साचले आहे.आष्टी: परतूर तालुक्यातील आष्टीसह परिसरात दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे फुलवाडी येथील सोपान निवृत्ती वाघमारे यांची गट क्रमांक १९ मध्ये असलेली लिंबोणीची बाग उद्ध्वस्त झाली. यात ३५ झाडे उन्मळून पडली. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील गोठे तसेच शेती साहित्याचे नुकसान झाले.परतूर तालुक्यातील हातडी, श्रीष्टी, आष्टी ७० पेक्षा अधिक विजेचे खांब पडले आहेत. मुख्य वाहिनीचे दहा ते बारा वीज खांब पडले. दोन रोहित्रांचेही नुकसान झाले. परिणामी परिसरातील ४८ गावे अंधारात बुडाली आहेत. अंधारामुळे ग्रामस्थांचे हाल होत असून, महावितरण कंपनीने तात्काळ वीज खांबांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. बहुतांश ठिकाणी विजेच्या खांबांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने वादळी पावसात खांब जमीनदोस्त होत आहेत. विशेष म्हणजे रोहित्रेही कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठावर परिणाम झाला आहे. पिठाच्या गिरण्याही बंद आहेत.