शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

माल खरेदीसाठी चारच आडते बहुतांश माल खर्डा, बार्शीकडे

By admin | Updated: December 21, 2014 00:07 IST

भूम : मागील अनेक वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम नसल्यामुळे या तालुक्यातला बहुतांश शेतीचा माल खर्डा, बार्शीच्या बाजारपेठेत जात असल्याने

भूम : मागील अनेक वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम नसल्यामुळे या तालुक्यातला बहुतांश शेतीचा माल खर्डा, बार्शीच्या बाजारपेठेत जात असल्याने आजही कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे.तालुक्यातील ९६ गावे असून, हा तालुका रबीचा म्हणून ओळखला जातो. जवळपास रबीचे ३६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. येथील मुख्य पीक ज्वारी असून, ज्वारी खरेदी-विक्रीच्या माध्यमातून फार मोठी उलाढाल या तालुक्यात होते. असे असले तरी या कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्यातून एकदाच आडत व्यापार भरतो. यामध्ये पाच-सहा व्यापारी असतात. त्यामुळे मालाचा लिलाव होत नाही. अशा परिस्थितीत येथील बहुतांश माल इतर बाजारपेठेत जातो. या बाजार समितीत रोज आडत व्यापार सुरु करुन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. तालुक्यात यंदा परतीच्या पावसाने थोडीफार आशा दाखविल्याने सध्या तालुक्यातून कापूस विक्रीसाठी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी विक्री केंद्र नसल्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडे विक्री करावा लागत आहे. काही खाजगी व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याने कापसासाठी खरेदी-विक्री केंद्र सुरु करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)४वाशी : तालुका निर्मितीनंतर २००३ साली येथे बाजार समितीची स्थापना करण्यात आली. यानंतर तांदूळवाडी रोडलगत शासननियुक्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत चेडे यांनी आडत लाईन उभी केली. तेथे १२ गाळे उभारण्यात आले असले तरी आजघडीला या ठिकाणी केवळ ४ आडते शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करत आहेत. येथील आडतीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाचा लिलावच होत नसल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी हे कळंब किंवा बार्शी येथे आपला माल नेऊन विकत आहेत. लिलाव होत नसल्यामुळे येथील आडत दुकानादारही मालाची प्रत पाहून खरेदी करतात. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नसल्यामुळे येथील आडत दुकानात शेतकरी माल आणत नाहीत. तसेच येथील आडत बाजारात सक्षम असा मोठा व्यापारी नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालावर उचल मिळत नाही. त्यामुळेही अनेक शेतकरी इतरत्र आपला माल नेत आहेत. आडत बाजारात शेतकऱ्यांना आवश्यक सुविधाही मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे येथील आडत बाजार असून अडचण नसून खोळंबा असल्यासारखे आहे. तालुक्यात खरीप हंगामाची ३१ गावे असून, या गावांतून हायब्रीड, कापूस, मका, बाजरी आदी पिकाचे उत्पन्न घेण्यात येते. उत्पन्न बऱ्यापैकी येत असले तरी शेतकरी मात्र येथील आडतीला माल आणत नसल्याची खंत आडत दुकानदार नवनाथ कुंभार यांनी व्यक्त केली.