शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

माणसांपेक्षा बैलांची काळजी अधिक?

By admin | Updated: December 12, 2014 00:55 IST

अशोक कारके, औरंगाबाद उसाला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकरी दरवर्षी ठिकठिकाणी आंदोलन करतात. ऊसतोड कामगार योग्य मोबदला, सेवासुविधा आणि सुरक्षा मिळावी म्हणून आंदोलन करताना दिसतात.

अशोक कारके, औरंगाबाद उसाला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकरी दरवर्षी ठिकठिकाणी आंदोलन करतात. ऊसतोड कामगार योग्य मोबदला, सेवासुविधा आणि सुरक्षा मिळावी म्हणून आंदोलन करताना दिसतात. जगण्यासाठी झगडणाऱ्या या माणसांकडे दुर्लक्ष करून बैलांची काळजी घेण्याचे आदेश साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांना दिले आहेत. मुक्या प्राण्यांवर अत्याचार करू नयेत हे खरे असले तरी मानवाचाही ‘माणुसकी’ने विचार करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.राज्यातील शेतकरी आणि ऊसतोड कामगार काहीतरी पदरात पडावे म्हणून अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. त्यांच्या मागण्यांवर वर्षानुवर्षे निर्णय घेण्यात येत नाही. ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या रखडलेल्या आहेत. त्या पूर्ण करण्याकडे प्रशासन लक्ष देत नाही; पण पुणे येथील साखर आयुक्तांनी नुकतेच प्राणी क्रूरता अधिनियमानुसार (ओझे वाहणारे व कष्टकरी प्राणी अधिनियम १९६५) राज्यातील साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या बैलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी आदेश काढले आहेत. यामध्ये बैलांवर अति वजन टाकू नये, असमान बैलांना गाडीस जुंपू नये, कामाच्या वेळेचे बंधन, बैलांना विश्रांती, वयस्कर आणि आजारी बैलांकडून काम करून घेऊ नये, त्यांना आरोग्यसेवा द्यावी, नाल मारण्यासाठी योग्य जागा बनवावी, प्रशिक्षित व्यक्तीकडून नाल मारावी, वजन काट्यांवर बैल घसरू नये याची काळजी घ्यावी, स्वच्छता ठेवावी, पाणी, निवाऱ्याची व्यवस्था करावी या मुद्यांचा समावेश आहे.