शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

पावसाळ्यात धरणांची परिस्थिती उन्हाळ्यासारखीच

By admin | Updated: August 10, 2014 02:04 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात काहीशी वाढ झालेली दिसत असली, तरी मराठवाड्यातील इतर मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा मात्र खाली गेला आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात काहीशी वाढ झालेली दिसत असली, तरी मराठवाड्यातील इतर मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा मात्र खाली गेला आहे. त्यामुळे अर्ध्या पावसाळ्यानंतर विभागातील धरणांची एकत्रित पाणीसाठ्याची स्थिती मे महिन्यासारखीच आहे. सध्या विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी अवघा २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात पावसाने अवकृपा केली. संपूर्ण जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला तरी विभागातील धरणांतील पाणीसाठ्यात अद्याप वाढ झालेली नाही. उलट काही प्रकल्पांतील पाणीसाठा जून महिन्याच्या सुरुवातीला जेवढा होता, त्यापेक्षाही कमी झाला आहे. केवळ जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. नगर, नाशिक जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे जायकवाडीतील पाणीसाठा १४ टक्क्यांवर गेला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी २२ टक्के पाणीसाठा होता. मध्यंतरी हा साठा कमी झाला होता. मात्र, जायकवाडीतील वाढीमुळे सरासरी साठ्यात वाढ झाली. त्यामुळे आता पुन्हा एकदा हा साठा २२ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी धरणांची परिस्थिती उन्हाळ्यासारखीच आहे. पाच धरणे कोरडीठाकनिम्मा पावसाळा संपला तरी विभागातील सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव या पाच धरणांत शून्य टक्के उपयुक्त साठा आहे. जूनच्या सुरुवातीला यातील माजलगाव धरणात ६ टक्के साठा होता. उर्ध्व पेनगंगा धरणातील पाणीसाठाही ५० टक्क्यांवरून ४३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मनार धरणातील साठा २२ वरून १४ टक्क्यांवर, निम्न दुधनातील साठा ३५ वरून ३० टक्क्यांवर आणि येलदरी धरणातील साठा ४५ टक्क्यांवरू न ३९ टक्क्यांवर आला आहे.