शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

मोदी सरकार शेतकरी विरोधी

By admin | Updated: October 7, 2014 00:16 IST

अहमदपूर : निसर्गाची साथ नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ त्यातच केंद्रातले मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताविरोधी आहे़ त्यामुळे शेतकरी उधवस्त झाला आहे़

अहमदपूर : निसर्गाची साथ नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ त्यातच केंद्रातले मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताविरोधी आहे़ त्यामुळे शेतकरी उधवस्त झाला आहे़ लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदिंनी मोठी आश्वासने दिली़ परंतु मोदींकडे शेतकऱ्यांच्या विकासाची दृष्टी नाही. त्यांना गुजरातच्या पुढे काही दिसतही नाही, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली़अहमदपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अहमदपुरात ते सोमवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव होते़ मंचावर उमेदवार बाबासाहेब पाटील, उदगीरचे उमेदवार संजय बनसोडे, निलंग्याचे उमेदवार बस्वराज पाटील नागराळकर, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डी़एऩ शेळके, अविनाश जाधव, भारत रेड्डी, भाग्यश्री क्षीरसागर, मिनाक्षी शिंगडे, शालुबाई कांबळे, शिवानंद हेंगणे, बाळासाहेब टाकळगावकर, मोजिद पटेल, निवृत्ती कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, शेतकरी, शेतमजुरांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत़ शेतीला जोडधंदा म्हणून मतदारसंघात दुग्धव्यवसाय, फळबागा आदी उद्योग उभारण्यात येतील़ सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले़ अध्यक्ष समारोप माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी केला़ यावेळी उमेदवार बाबासाहेब पाटील यांचेही भाषण झाले़४शेतकरी कुटुंबांशी आमची नाळ जुळली असल्याने आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठीच काम केले़ दिल्लीची सत्ता आता आमच्याकडे नाही, परंतु ती कशी वाकवायची हे तुमच्या हातात आहे़ या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही संधी आली आहे़ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत़ महाराष्ट्रात, देशात काय करणार हे सांगण्यापेक्षा ते आमच्यावर टिका करीत आहेत़ मी ७ वेळा विधानसभा आणि ७ वेळा लोकसभा अशा १४ निवडणुका जिंकल्या आहेत़ मग असा माणूस निवडणुकांना घाबरतो का, असेही शरद पवार म्हणाले़ गेल्या काही महिन्यात केंद्र सरकारने घेतलेले निर्णय शेतकऱ्याच्या हिताविरोधात आहेत़ साखरेचे अनुदान बंद केले आहे़ ऊसाचे भाव पडत आहेत़ सोयाबीन तेलाची आयात सुरु केल्याने ३८०० रूपयाचे सोयाबीन २८०० रुपयावर येऊन ठेपले आहे़ कांदा निर्यात बंद केली आहे़ त्यामुळे त्याचेही भाव घसरले़ कापसाचीही अशीच अवस्था आहे़ शेतकऱ्याच्या मालाला चार पैसे अधिक मिळावेत ही भावना सरकारची नाही़