शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
3
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
4
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
5
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
6
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
7
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
8
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
9
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
10
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
11
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
12
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
13
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
14
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
15
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
16
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
17
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
18
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
19
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
20
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

मोदी सरकार शेतकरी विरोधी

By admin | Updated: October 7, 2014 00:16 IST

अहमदपूर : निसर्गाची साथ नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ त्यातच केंद्रातले मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताविरोधी आहे़ त्यामुळे शेतकरी उधवस्त झाला आहे़

अहमदपूर : निसर्गाची साथ नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ त्यातच केंद्रातले मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हिताविरोधी आहे़ त्यामुळे शेतकरी उधवस्त झाला आहे़ लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदिंनी मोठी आश्वासने दिली़ परंतु मोदींकडे शेतकऱ्यांच्या विकासाची दृष्टी नाही. त्यांना गुजरातच्या पुढे काही दिसतही नाही, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली़अहमदपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अहमदपुरात ते सोमवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव होते़ मंचावर उमेदवार बाबासाहेब पाटील, उदगीरचे उमेदवार संजय बनसोडे, निलंग्याचे उमेदवार बस्वराज पाटील नागराळकर, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डी़एऩ शेळके, अविनाश जाधव, भारत रेड्डी, भाग्यश्री क्षीरसागर, मिनाक्षी शिंगडे, शालुबाई कांबळे, शिवानंद हेंगणे, बाळासाहेब टाकळगावकर, मोजिद पटेल, निवृत्ती कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, शेतकरी, शेतमजुरांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत़ शेतीला जोडधंदा म्हणून मतदारसंघात दुग्धव्यवसाय, फळबागा आदी उद्योग उभारण्यात येतील़ सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले़ अध्यक्ष समारोप माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी केला़ यावेळी उमेदवार बाबासाहेब पाटील यांचेही भाषण झाले़४शेतकरी कुटुंबांशी आमची नाळ जुळली असल्याने आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठीच काम केले़ दिल्लीची सत्ता आता आमच्याकडे नाही, परंतु ती कशी वाकवायची हे तुमच्या हातात आहे़ या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही संधी आली आहे़ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत़ महाराष्ट्रात, देशात काय करणार हे सांगण्यापेक्षा ते आमच्यावर टिका करीत आहेत़ मी ७ वेळा विधानसभा आणि ७ वेळा लोकसभा अशा १४ निवडणुका जिंकल्या आहेत़ मग असा माणूस निवडणुकांना घाबरतो का, असेही शरद पवार म्हणाले़ गेल्या काही महिन्यात केंद्र सरकारने घेतलेले निर्णय शेतकऱ्याच्या हिताविरोधात आहेत़ साखरेचे अनुदान बंद केले आहे़ ऊसाचे भाव पडत आहेत़ सोयाबीन तेलाची आयात सुरु केल्याने ३८०० रूपयाचे सोयाबीन २८०० रुपयावर येऊन ठेपले आहे़ कांदा निर्यात बंद केली आहे़ त्यामुळे त्याचेही भाव घसरले़ कापसाचीही अशीच अवस्था आहे़ शेतकऱ्याच्या मालाला चार पैसे अधिक मिळावेत ही भावना सरकारची नाही़