शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

मनसेचे पदाधिकारी ताटकळून गेले निघून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:04 IST

घोषणाबाजी : सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत परवानगीची होती मागणी औरंगाबाद : जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष अधिकार वापरून लॉकडाऊनची ...

घोषणाबाजी : सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत परवानगीची होती मागणी

औरंगाबाद : जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष अधिकार वापरून लॉकडाऊनची वेळ दुपारी ४ ऐवजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत करावी, या मागणीसाठी मनसेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना भेटण्यासाठी शुक्रवारी गेले होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ न दिल्यामुळे तासभर ताटकळत बसलेल्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करीत कार्यालय सोडले.

राज्य सरकारने लॉकडाऊन संदर्भात नवीन नियमावली जाहीर केली. तीच नियमावली जिल्हा प्रशासनाने येथे लागू केली आहे. मागील ८ ते १० दिवसांपासून जिल्ह्यात व शहरात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत नाहीत. त्यामुळे १२ तास सर्व व्यवहारांना मुभा देण्याची गरज आहे. अशी परवानगी दिल्यास अनेक व्यापारी तसेच रोजंदारी कामगारांचे हाल होणार नाहीत. जनतेलादेखील खरेदी करण्यासाठी नियोजित वेळ मिळेल, अशी मागणी करीत मनसे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे, शहर प्रमुख सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी, अशोक पवार हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते.

नियम फक्त सामान्य नागरिकांनाच का?

पालकमंत्र्यांच्या हस्ते अनेक उद्घाटने होणार म्हणून जिल्ह्यात शासनाने जाहीर केलेली नियमावली एक दिवस उशिरा लागू केली. त्या उद्घाटनात सर्व नियमांची पायमल्ली करण्यात आली, असा आरोप करीत जिल्हाध्यक्ष दाशरथे म्हणाले, त्या वेळी कोरोना संसर्ग नव्हता काय? नियम हे फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत काय? जिल्हा प्रशासनाला वेळ मागूनही कुणी पुढे येत नसल्यामुळे प्रशासनाचा निषेध करीत आम्ही बाहेर पडलो.