शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

टिकून राहण्याचे मनसेपुढे आव्हान?

By admin | Updated: November 25, 2014 01:01 IST

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारपासून तीन दिवस शहरात मुक्कामी येत असून विधानसभा निवडणुकीत

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारपासून तीन दिवस शहरात मुक्कामी येत असून विधानसभा निवडणुकीत पक्षाची निष्प्रभ कामगिरी झाल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून टिकून राहण्याचे मोठे आव्हान पक्षापुढे आहे. महापलिकेच्या एप्रिल २०१५ मध्ये होणाऱ्या निवडणुकीची तयारी करण्याच्या हेतूने राज ठाकरे यांचा दौरा होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली होती. तिला प्रतिसादही चांगला मिळाला होता. मात्र, त्याचे रूपांतर मतांमध्ये झाले नाही. जिल्ह्यात सर्व नऊ मतदारसंघांत मनसेने उमेदवार उभे केले आणि त्या सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामुळे कार्यकर्तेही सैरभैर आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही मनसेचे अनेक कार्यकर्ते मात्र पक्षातच टिकून आहेत. कदाचित महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गळती लागू शकते त्या दृष्टीनेही राज ठाकरे यांचा दौरा पक्षासाठी महत्त्वाचा आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष तयारी करणार असला, तरी शहरात असलेल्या तीन विधानसभा मतदारसंघांत पक्षाची कामगिरी अगदीच सामान्य राहिली आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघात नगरसेवक असलेले राजवैभव वानखेडे यांना सुमारे पाच हजारांवर इतकी मते मिळाली. पूर्व मतदारसंघातील उमेदवार आणि शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांना तसेच पश्चिम या राखीव मतदारसंघात गौतम आमराव यांना दोन हजारांच्या आत मते मिळाली. खरे तर या तिन्ही मतदारसंघांत मनसेचे उमेदवार तुल्यबळ नव्हते, तरीही मनसेने एक परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, असे दिसते. २०१० च्या महापालिका निवडणुकीत एकच नगरसेवक निवडून आला. त्यानंतर मागील पाच वर्षांच्या काळात कार्यकर्त्यांनी विविध आंदोलने छेडून पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. महापालिकेच्या विरोधात तर पक्षाने रान उठविल्याचे चित्र दिसले. शैक्षणिक क्षेत्रात तसेच महिलांची अनेक आंदोलने झाली. मात्र, शिवसेना, काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी यांच्या गदारोळात ती विरून गेली. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत नाही. राज ठाकरे नव्याने चैतन्य निर्माण करतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे कोणता नवा मंत्र देतात, याबाबत कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता आहे.