शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

बदलानंतर चुका थांबल्या

By admin | Updated: November 19, 2014 01:00 IST

औरंगाबाद : परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले. त्यानंतर परीक्षेत होणाऱ्या चुका थांबल्या

औरंगाबाद : परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले. त्यानंतर परीक्षेत होणाऱ्या चुका थांबल्या. आता चारही जिल्ह्यांत परीक्षा सुरळीत असल्याची ग्वाही परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली. दरम्यान, बी.एस्सी.च्या सहाव्या सत्राची प्राणिशास्त्र विषयाची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार अद्याप झालेली नाही. ती उद्या बुधवारी व त्यानंतर शनिवारी असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लोकमत’शी बोलताना परीक्षा नियंत्रक डॉ. गायकवाड म्हणाले की, २७ आॅक्टोबरपासून पदवी, तर अलीकडच्या आठवड्याात पदव्युत्तर परीक्षा सुरू झाल्या. सुरुवातीला केमिस्ट्रीच्या पेपर सेटच्या कोडची खातरजमा न करताच ते पेपर केंद्रावर पाठविल्यामुळे जुन्या अभ्यासक्रमाचे पेपर विद्यार्थ्यांना मिळाले. ही बाब गांभीर्याने घेत परीक्षा विभागाने कसलाही विलंब न लावता तात्काळ मेलद्वारे दुसरे पेपर केंद्रांना पाठविले. या चुका नेमक्या कशामुळे झाल्या, याची तातडीने चौकशी केली, तेव्हा परीक्षा विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार घडल्याचे लक्षात आले, त्यामुळे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या आदेशान्वये परीक्षा विभागातील चार कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. तेव्हापासून आजपर्यंत परीक्षा प्रक्रियेत कसलीही चूक झालेली नाही. सर्वत्र परीक्षा व्यवस्थित सुरू आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर सहकेंद्र प्रमुख प्रश्नपत्रिका व अन्य परीक्षा प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे भरारी पथकेही गांभीर्याने सर्व केंद्रांना भेटी देत आहेत. बी.एस्सी.च्या परीक्षेत कसलाही गोंधळ झालेला नाही. तृतीय वर्षाच्या सहाव्या सत्राच्या प्राणिशास्त्र विषयाची परीक्षा अद्याप झालेली नाही. नियोजित वेळापत्रकानुसार ती उद्या बुधवारी व शनिवारी होणार आहे. प्राणिशास्त्र विषयाचे पेपर नजरचुकीने फोडले की कसे, याची खातरजमा करण्यासाठी मंगळवारी डॉ. संभाजी वाघमारे यांच्या भरारी पथकाला वैजापूर येथे, तर प्रा. संजय सांभाळकर यांच्या पथकाला सोयगाव येथे पाठवले. तेव्हा त्याठिकाणी ते पेपर कस्टडीत सीलबंद आढळून आले.